शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

१० हजार घरकूल झाले प्रकाशमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:36 IST

सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे.

ठळक मुद्देमोफत वीज पुरवठा : एका महिन्यात दिल्या जोडण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे.जगाच्या विकासात विजेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हे जरी मान्य केले तरी गडचिरोली जिल्ह्यातील काही गावे विजेपासून वंचित आहेत. तर गरीब नागरिक वीज पुरवठ्यासाठी पैसे भरून वीज पुरवठा घेऊ शकत नाही. अशा कुटुंबांना वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब नागरिकांना वीज विभागाकडून मोफत वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील ९ हजार ८६९ कुटुंबांना विजेची सेवा उपलब्ध झाली आहे. यात आलापल्ली विभागातील सर्वाधिक ९ हजार ३२० कुटुंब आहेत. तर गडचिरोली विभागातील ५४९ कुटुंबांचा समावेश आहे. शासनाच्या मदतीने महावितरणने गरीब नागरिकांना वीज पुरवठा उपलब्ध करून देत सामाजिक दायित्त्व पार पाडले आहेत.आलापल्ली विभागांतर्गत एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी हे तालुके येतात. या तालुक्यांमध्ये ९० टक्के क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे वीज लाईन टाकताना फार मोठी अडचण निर्माण होते. या बाबीवर मात करीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांनी दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचविली. आता या कुटुंबांना मोफत वीज पुरवठा दिला जात आहे. विशेष म्हणजे या कुटुंबांना दिवाळीपूर्वीच वीज जोडणी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे.काही प्रमाणात साहित्यही मोफतसौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणीचा लाभ देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीज जोडणी विनाशुल्क आहे. तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. योजनेत वीज पुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बिल भरणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चारर्जिंग पार्इंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना आदी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलांनाही वीज पुरवठा दिला आहे. 

टॅग्स :electricityवीज