शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

वीज ग्राहकांकडे १० कोटी थकले

By admin | Updated: October 10, 2016 00:55 IST

गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत.

सहा महिने मुदत : अभय योजनेंतर्गत ग्राहकांना मिळणार वीज बिलात सूटगडचिरोली : गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत. या ग्राहकांकडून वीज बिलाचे पैसे काढण्यासाठी आता वीज विभागाने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बिल थकीत ठेवलेल्या ग्राहकांना काही सूट दिली जाणार आहे. सदर अभय योजना १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातही प्रत्येक महिन्याला वीज बिल पाठविले जाते. सदर वीज बिल प्रत्येक महिन्याला भरणे अपेक्षित असले तरी काही वीज ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नाही. एक महिना वीज बिल न भरल्यास वीज कंपनी कोणतीही कारवाई करीत नसली तरी दोन महिन्याचे वीज बिल न भरल्यास संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवून वीज बिल भरण्यात यावे, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला जातो. मात्र आर्थिक अडचणीत सापडलेले ग्राहक वीज बिल भरत नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित केला जातो. वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेले गडचिरोली मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागातील १४ हजार ६८८ ग्राहकांकडे ४ कोटी रूपयांची रक्कम थकीत आहे. ब्रह्मपुरी विभागातील ८ हजार ५२४ ग्राहकांकडे १ कोटी ८६ लाख व गडचिरोली विभागातील १५ हजार ८४१ ग्राहकांकडे ४ कोटी ३० लाख रूपये थकले आहेत, असे एकूण गडचिरोली वीज मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहकांकडे १० कोटी २० लाख रूपये थकले आहेत. चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत गडचिरोली मंडळ येते. चंद्रपूर परिमंडळातील ७४ हजार ५१५ ग्राहकांकडे २४ कोटी ५ लाख रूपये थकले आहेत. १ हजार ७४९ ग्राहकांकडे १ कोटी ९९ लाख, १४ कुकुटपालन व्यावसायिकांकडे २ लाख ३२ हजार, ९२० सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे ४५ लाख ९ हजार, ६३ हजार ८३० ग्राहकांकडे १७ कोटी ४३ लाख, ७१ ग्रामपंचायतींकडे ७ लाख ७१ हजार रूपये थकले आहेत. अभय योजनेंतर्गत या सर्व ग्राहकांना २ कोटी ६३ लाख रूपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज विभागाच्या मार्फतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)अभय योजनेची प्रमुख वैशिष्ट्येवीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी महावितरण कंपनीने २०१६-१७ या वर्षासाठी अभय योजना सुरू केली आहे. सदर योजना १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अभय योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदरांना ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम माफ होणार आहे. पहिल्या तीन महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. पुढील तीन महिने ते सहा महिन्यापर्यंत मूळ थकबाकी भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. अभय योजनेच्या पहिल्याच महिन्यात ज्या थकबाकीदार ग्राहकांनी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना मूळ थकबाकीतील ५ टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. थकबाकीतून मुक्त झालेल्यांना त्वरित नवीन वीज जोडणी दिली जाणार आहे. सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चॉर्जेस, रिकनेक्शन चॉर्जमधून सूट दिली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी ग्राहकाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना किती रक्कम भरायची आहे, याची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. न्याय प्रविष्ठ असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातीलही ग्राहकांना अभय योजनेत सहभागी केले जाणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली न्यायालयीन परवानगी प्रक्रिया व त्याचा खर्च थकबाकीदारांना करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.