शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वीज ग्राहकांकडे १० कोटी थकले

By admin | Updated: October 10, 2016 00:55 IST

गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत.

सहा महिने मुदत : अभय योजनेंतर्गत ग्राहकांना मिळणार वीज बिलात सूटगडचिरोली : गडचिरोली वीज मंडळाअंतर्गत ३९ हजार ५३ वीज ग्राहकांकडे मागील अनेक वर्षांपासून १० कोटी २० लाख रूपयांचे वीज बिल थकले आहेत. या ग्राहकांकडून वीज बिलाचे पैसे काढण्यासाठी आता वीज विभागाने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बिल थकीत ठेवलेल्या ग्राहकांना काही सूट दिली जाणार आहे. सदर अभय योजना १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातही प्रत्येक महिन्याला वीज बिल पाठविले जाते. सदर वीज बिल प्रत्येक महिन्याला भरणे अपेक्षित असले तरी काही वीज ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नाही. एक महिना वीज बिल न भरल्यास वीज कंपनी कोणतीही कारवाई करीत नसली तरी दोन महिन्याचे वीज बिल न भरल्यास संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवून वीज बिल भरण्यात यावे, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला जातो. मात्र आर्थिक अडचणीत सापडलेले ग्राहक वीज बिल भरत नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित केला जातो. वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेले गडचिरोली मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागातील १४ हजार ६८८ ग्राहकांकडे ४ कोटी रूपयांची रक्कम थकीत आहे. ब्रह्मपुरी विभागातील ८ हजार ५२४ ग्राहकांकडे १ कोटी ८६ लाख व गडचिरोली विभागातील १५ हजार ८४१ ग्राहकांकडे ४ कोटी ३० लाख रूपये थकले आहेत, असे एकूण गडचिरोली वीज मंडळातील ३९ हजार ५३ ग्राहकांकडे १० कोटी २० लाख रूपये थकले आहेत. चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत गडचिरोली मंडळ येते. चंद्रपूर परिमंडळातील ७४ हजार ५१५ ग्राहकांकडे २४ कोटी ५ लाख रूपये थकले आहेत. १ हजार ७४९ ग्राहकांकडे १ कोटी ९९ लाख, १४ कुकुटपालन व्यावसायिकांकडे २ लाख ३२ हजार, ९२० सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे ४५ लाख ९ हजार, ६३ हजार ८३० ग्राहकांकडे १७ कोटी ४३ लाख, ७१ ग्रामपंचायतींकडे ७ लाख ७१ हजार रूपये थकले आहेत. अभय योजनेंतर्गत या सर्व ग्राहकांना २ कोटी ६३ लाख रूपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज विभागाच्या मार्फतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)अभय योजनेची प्रमुख वैशिष्ट्येवीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी महावितरण कंपनीने २०१६-१७ या वर्षासाठी अभय योजना सुरू केली आहे. सदर योजना १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अभय योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदरांना ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम माफ होणार आहे. पहिल्या तीन महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. पुढील तीन महिने ते सहा महिन्यापर्यंत मूळ थकबाकी भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. अभय योजनेच्या पहिल्याच महिन्यात ज्या थकबाकीदार ग्राहकांनी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना मूळ थकबाकीतील ५ टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. थकबाकीतून मुक्त झालेल्यांना त्वरित नवीन वीज जोडणी दिली जाणार आहे. सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चॉर्जेस, रिकनेक्शन चॉर्जमधून सूट दिली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी ग्राहकाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना किती रक्कम भरायची आहे, याची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. न्याय प्रविष्ठ असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातीलही ग्राहकांना अभय योजनेत सहभागी केले जाणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली न्यायालयीन परवानगी प्रक्रिया व त्याचा खर्च थकबाकीदारांना करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.