शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

यंग इंडिया बंगळुुरूमध्ये १६ आॅगस्टपासून करणार सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:52 IST

देशात पहिल्यांदाच होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेसाठी आता अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भारताची ‘यंग इंडिया’ही तयारीला लागली आहे.

- सचिन कोरडे गोवा : देशात पहिल्यांदाच होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेसाठी आता अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भारताची ‘यंग इंडिया’ही तयारीला लागली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून संघ नवनियुक्त प्रशिक्षक लुईस नॉर्टन द मातोस यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरू येथे १६ आॅगस्टपासून खास शिबिर आयोजिण्यात आले आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात यंग इंडिया गोव्यात सराव सुरू करेल, असे सूत्रांनी सांगितले.फुटबॉलच्या महासंग्रामाला आॅक्टोबरपासून सुरुवात होईल. भारत या स्पर्धेचा यजमान असल्यामुळे ही स्पर्धा भारतीयांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भारतीय संघ कुठेही कमी पडू नये, म्हणून विविध प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय संघाने नुकताच मेक्सिकोचा दौरा केला होता. हा दौरा संमिश्र यश देणारा ठरला. चार देशांच्या संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतासह कोलंबिया, चिली, मेक्सिकोचा समावेश होता. स्पर्धेत यंग इंडियाला मेक्सिकोकडून ५-१ ने, कोलंबियाकडून ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. चिलीविरुद्ध भारताने १-१ ने बरोबरी साधली होती. तीच समाधानाची बाब ठरली. त्यामुळे विश्वचषकात भारतापुढे आव्हान असेल, हे स्पष्ट आहे.दरम्यान, भारतीय संघ ज्या गटात आहे त्या गटात कोलंबिया, अमेरिका आणि घाना या संघांचा समावेश आहे. भारताचा शुभारंभीचा सामना दिल्ली येथे ६ आॅक्टोबर रोजी अमेरिकाविरुद्ध होणार आहे.मातोस यांची गोव्याला पसंती...बंगळुरू येथे सराव शिबिर आटोपल्यानंतर ‘यंग इंडिया’ सप्टेंबर महिन्यात सरळ गोव्यात येईल. फुटबॉलचे वातावरण आणि साधन-सुविधा याचा विचार करता पोर्तुगीज प्रशिक्षक मातोस यांनी गोव्याला पसंती दिली. फातोर्डा किंवा टिळक स्टेडियमवर हा संघ सराव करेल. फिटनेस, तंत्र, कौशल्य आणि क्षमता यावर अधिक भर देण्यात येईल. येथील सरावानंतर सप्टेंबरच्या शेवटच्य आठवड्यात भारतीय संघ दिल्लीला रवाना होईल. तेथे संघ ग्रुप सामने खेळणार आहे.मातोस यांच्याकडून आशा : १६ वर्षांखालील एएफसी चषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले निकोल अ‍ॅडम्स यांची हकालपट्टी झाल्यानंतर पोर्तुगीज प्रशिक्षक मातोस यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघासोबतचा त्यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर एआयएफएफने तातडीने मातोस यांची निवड केली.