शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

आशियाई कप फुटबॉल स्पर्धा आजपासून, भारताची सलामीला गाठ थायलंडसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 02:15 IST

भारतीय संघ शनिवारी प्रारंभ होत असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत २०११ ची निराशाजनक कामगिरी विसरण्यास प्रयत्नशील आहे.

अबूधाबी : भारतीय संघ शनिवारी प्रारंभ होत असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत २०११ ची निराशाजनक कामगिरी विसरण्यास प्रयत्नशील आहे. त्याचसोबत २०२६ च्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग करणार आहे.आशियाई फुटबॉल महासंघातर्फे (एएफसी) आयोजित या स्पर्धेसाठी पात्रता मिळवणाऱ्या संघांची संख्या आता १६ वरून २४ झाली आहे. जायद स्पोर्टस् सिटी स्टेडियममध्ये यजमान संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि बहरीन यांच्यादरम्यान ‘अ’ गटातील लढतीने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.भारताचा याच गटात समावेश असून त्यात यजमान संघाचा समावेश आहे. भारताची सलामी लढत रविवारी अल नाहयान स्टेडियममध्ये थायलंडसोबत होणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील अखेरचा सहभाग आठ वर्षांपूवी होता. त्यावेळी भारताला आशियातील पॉवर हॉऊस आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व बहरीन या संघांकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ चौथ्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे. ही १७ वी स्पर्धा आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये २४ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली होती. २०१५ मध्ये भारताला स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली नाही. त्यावेळी यजमान आॅस्ट्रेलिया संघ विजेता ठरला होता. भारतीय संघ दक्षिण कोरिया किंवा आॅस्ट्रेलिया या संघांप्रमाणे मजबूत नाही, पण त्यांना बहरीन, थायलंड व यूएई यांच्यासारख्या संघांकडून कडवे आव्हान मिळेल.भारताचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कांस्टेनटाईन संघाच्या कामगिरीबाबत सकारात्मक आहेत. कारण संघाला सलग १३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला नाही. यादरम्यान संघाने स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आणि फिफा मानांकनामध्ये आपले दुसरे सर्वोत्तम स्थान मिळवले. भारतीय संघ सध्या मानांकनामध्ये ९७ व्या स्थानी आहे तर एकवेळ भारतीय संघ १७३व्या स्थानापर्यंत पिछाडीवर होता.भारतीय संघ २३ पाहुण्या संघांमध्ये यूएईच्या राजधानीत दाखल होणार पहिला संघ ठरला. भारतीय संघ येथे २० डिसेंबरला दाखल झाला होता. २८ सदस्यीय संघ येथील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी सरावात व्यस्त आहे. आशिया कप स्पर्धेत खडतर आव्हानाला समोरे जावे लागणार असून भारतीय संघाला त्याची कल्पना आहे. कांस्टेनटाईन यांनी स्पर्धेपूर्वी बोलताना सांगितले की, ‘आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत. २३ खेळाडू आमच्यासाठी चांगला खेळ करतील, अशी आशा आहे. ’आॅस्ट्रेलियन संघ जेतेपद कायम राखण्यासाठी स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्यांनी २०१५ मध्ये मायदेशात या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया व जपान हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी उत्सुक आहेत. दक्षिण कोरियन संघ ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीचीप्रतीक्षा संपविण्यास प्रयत्नशील आहे तर जपानने २०१८ च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाºया बेल्जियमला रशियात राऊंड १६ च्या लढतीतकडवे आव्हान दिले होते. २००७ मध्ये जेतेपद पटकावणारा इराक संघही चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Footballफुटबॉल