शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई कप फुटबॉल स्पर्धा आजपासून, भारताची सलामीला गाठ थायलंडसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 02:15 IST

भारतीय संघ शनिवारी प्रारंभ होत असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत २०११ ची निराशाजनक कामगिरी विसरण्यास प्रयत्नशील आहे.

अबूधाबी : भारतीय संघ शनिवारी प्रारंभ होत असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत २०११ ची निराशाजनक कामगिरी विसरण्यास प्रयत्नशील आहे. त्याचसोबत २०२६ च्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग करणार आहे.आशियाई फुटबॉल महासंघातर्फे (एएफसी) आयोजित या स्पर्धेसाठी पात्रता मिळवणाऱ्या संघांची संख्या आता १६ वरून २४ झाली आहे. जायद स्पोर्टस् सिटी स्टेडियममध्ये यजमान संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि बहरीन यांच्यादरम्यान ‘अ’ गटातील लढतीने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.भारताचा याच गटात समावेश असून त्यात यजमान संघाचा समावेश आहे. भारताची सलामी लढत रविवारी अल नाहयान स्टेडियममध्ये थायलंडसोबत होणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील अखेरचा सहभाग आठ वर्षांपूवी होता. त्यावेळी भारताला आशियातील पॉवर हॉऊस आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व बहरीन या संघांकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ चौथ्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे. ही १७ वी स्पर्धा आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये २४ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली होती. २०१५ मध्ये भारताला स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली नाही. त्यावेळी यजमान आॅस्ट्रेलिया संघ विजेता ठरला होता. भारतीय संघ दक्षिण कोरिया किंवा आॅस्ट्रेलिया या संघांप्रमाणे मजबूत नाही, पण त्यांना बहरीन, थायलंड व यूएई यांच्यासारख्या संघांकडून कडवे आव्हान मिळेल.भारताचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कांस्टेनटाईन संघाच्या कामगिरीबाबत सकारात्मक आहेत. कारण संघाला सलग १३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला नाही. यादरम्यान संघाने स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आणि फिफा मानांकनामध्ये आपले दुसरे सर्वोत्तम स्थान मिळवले. भारतीय संघ सध्या मानांकनामध्ये ९७ व्या स्थानी आहे तर एकवेळ भारतीय संघ १७३व्या स्थानापर्यंत पिछाडीवर होता.भारतीय संघ २३ पाहुण्या संघांमध्ये यूएईच्या राजधानीत दाखल होणार पहिला संघ ठरला. भारतीय संघ येथे २० डिसेंबरला दाखल झाला होता. २८ सदस्यीय संघ येथील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी सरावात व्यस्त आहे. आशिया कप स्पर्धेत खडतर आव्हानाला समोरे जावे लागणार असून भारतीय संघाला त्याची कल्पना आहे. कांस्टेनटाईन यांनी स्पर्धेपूर्वी बोलताना सांगितले की, ‘आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत. २३ खेळाडू आमच्यासाठी चांगला खेळ करतील, अशी आशा आहे. ’आॅस्ट्रेलियन संघ जेतेपद कायम राखण्यासाठी स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्यांनी २०१५ मध्ये मायदेशात या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया व जपान हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी उत्सुक आहेत. दक्षिण कोरियन संघ ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीचीप्रतीक्षा संपविण्यास प्रयत्नशील आहे तर जपानने २०१८ च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाºया बेल्जियमला रशियात राऊंड १६ च्या लढतीतकडवे आव्हान दिले होते. २००७ मध्ये जेतेपद पटकावणारा इराक संघही चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Footballफुटबॉल