शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

हिंगोलीच्या मोंढ्यात सोयाबीनची विक्रमी आवक; शेडमध्ये जागा अपुरी पडल्याने माल रस्त्यावर

By रमेश वाबळे | Updated: November 21, 2023 19:07 IST

२१९० क्विंटलची आवक झाली,४८०० ते ५२०० रुपये मिळाला भाव

हिंगोली : तीन दिवसांच्या बंदनंतर मंगळवारपासून हिंगोलीच्या मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. या दिवशी सोयाबीनची यंदाच्या वर्षातील विक्रमी २ हजार १९० क्विंटल आवक झाली. त्यामुळे टिनशेडमध्ये जागा अपुरी पडल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर टाकावा लागला. ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपये भाव मिळाला.

जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा एकूण क्षेत्राच्या अर्ध्याहून अधिक होतो. तर उर्वरित क्षेत्रात हळद, कापूस, तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. यंदा समाधानकारक पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे उडीद, मुगासह सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले.

उत्पादन घटल्यामुळे सोयाबीनला किमान ६ हजारांचा तरी भाव मिळेल अशी अपेक्षा असताना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाच हजारांचा पल्लाही सोयाबीन गाठत नव्हते. परंतु, दिवाळीत आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावे लागले. दीपावलीनंतर मात्र भावात किंचित वाढ झाली असून, १६ नोव्हेंबरपासून २०० ते २५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भावात आणखी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

हिंगोलीचा मोंढा १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान इज्तेमामुळे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी मोंढा सुरू होताच आवक मोठ्या प्रमाणात वाढली. तब्बल २ हजार १९० क्विंटल सोयाबीन विक्रीस आले होते. या दिवशी शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा होती. मात्र, ५ हजार २०० वर भाव गेले नाहीत. तर आवक वाढल्यामुळे टिनशेडमध्ये जागा अपुरी पडल्याने जवळपास ३० ते ४० शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर टाकावे लागले.

माल रस्त्यावर असल्याने नाराजी काही व्यापाऱ्यांनीही खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्या मोंढ्यातील टिनशेडमध्ये ठेवल्या आहेत. आधीच जागा अपुरी आणि त्यात व्यापाऱ्यांचा माल पडून राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल टाकण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर पडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली