शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हिंगोलीच्या मोंढ्यात सोयाबीनची विक्रमी आवक; शेडमध्ये जागा अपुरी पडल्याने माल रस्त्यावर

By रमेश वाबळे | Updated: November 21, 2023 19:07 IST

२१९० क्विंटलची आवक झाली,४८०० ते ५२०० रुपये मिळाला भाव

हिंगोली : तीन दिवसांच्या बंदनंतर मंगळवारपासून हिंगोलीच्या मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. या दिवशी सोयाबीनची यंदाच्या वर्षातील विक्रमी २ हजार १९० क्विंटल आवक झाली. त्यामुळे टिनशेडमध्ये जागा अपुरी पडल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर टाकावा लागला. ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपये भाव मिळाला.

जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा एकूण क्षेत्राच्या अर्ध्याहून अधिक होतो. तर उर्वरित क्षेत्रात हळद, कापूस, तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. यंदा समाधानकारक पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे उडीद, मुगासह सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले.

उत्पादन घटल्यामुळे सोयाबीनला किमान ६ हजारांचा तरी भाव मिळेल अशी अपेक्षा असताना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाच हजारांचा पल्लाही सोयाबीन गाठत नव्हते. परंतु, दिवाळीत आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावे लागले. दीपावलीनंतर मात्र भावात किंचित वाढ झाली असून, १६ नोव्हेंबरपासून २०० ते २५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भावात आणखी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

हिंगोलीचा मोंढा १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान इज्तेमामुळे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी मोंढा सुरू होताच आवक मोठ्या प्रमाणात वाढली. तब्बल २ हजार १९० क्विंटल सोयाबीन विक्रीस आले होते. या दिवशी शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा होती. मात्र, ५ हजार २०० वर भाव गेले नाहीत. तर आवक वाढल्यामुळे टिनशेडमध्ये जागा अपुरी पडल्याने जवळपास ३० ते ४० शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर टाकावे लागले.

माल रस्त्यावर असल्याने नाराजी काही व्यापाऱ्यांनीही खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्या मोंढ्यातील टिनशेडमध्ये ठेवल्या आहेत. आधीच जागा अपुरी आणि त्यात व्यापाऱ्यांचा माल पडून राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल टाकण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर पडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली