शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रेक्षकांविना खेळणे दुर्दैवीच; कोरोना संकटावर एटीके कोच हब्बास यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 18:32 IST

पणजी : ‘आयएसएल’चा अंतिम सामना गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात आला. फुटबॉल हा राज्य खेळ असलेल्या गोव्यातील या स्टेडियमची प्रेक्षकसंख्या ...

पणजी : ‘आयएसएल’चा अंतिम सामना गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात आला. फुटबॉल हा राज्य खेळ असलेल्या गोव्यातील या स्टेडियमची प्रेक्षकसंख्या २० हजारांहून अधिक आहे. त्यामुळे देश-विदेशांतील चाहते गर्दी करतील, असा विश्वास आयोजकांना होता. म्हणून त्यांनी फायनलसाठी या मैदानाची निवड केली. मात्र, कोरोना व्हायरसमुळे सामना प्रेक्षकांविना खेळविण्यात आला. यावर फुटबॉलप्रेमींबरोबरच यंदाचा चॅम्पियन ठरलेल्या एटीके कोलकाता संघाचे प्रशिक्षक अ‍ॅन्टोनिया हब्बास यांनीही दु:ख व्यक्त केले.

प्रेक्षकांविना खेळण्याचा तुमचा अनुभव कसा होता, या प्रश्नावर अब्बास यांनी थोडा दम धरला. ते म्हणाले, फुटबॉल आणि चाहते हे अत्यंत जवळचे समीकरण आहे. खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे काम प्रेक्षकच करीत असतात. प्रेक्षकांचा आवाज सतत कानावर पडत असतो. अशा तुडुंब भरलेल्या वातावरणात खेळण्याची मजाही वेगळीच असते. आज मात्र चित्र वेगळे होते, याची आम्हाला कल्पना असली तरी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. प्रेक्षकांविना खेळणे हे दुर्दैवी ठरले. मात्र, खेळाच्या पलीकडेही लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाची भीती पसरली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्याला सामोरे जायला हवे.

दरम्यान, हब्बास यांच्या मागदर्शनाखाली एटीके कोलकाताने दुसऱ्यांचा चषक उंचावला. एटीकेचा हा तिसरा चषक आहे. २०१४ मध्ये त्यांना चेन्नईयन संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा वचपा त्यांनी शनिवारी काढला. दुसरीकडे, एटीकेचा कर्णधार तथा स्ट्रायकर कृष्णा यानेही प्रेक्षकांविना सामना खेळविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तो म्हणाला, प्रेक्षकांपुढे खेळणे हे नेहमीच आनंददायी असते. मात्र, लोकांचे आरोग्य लक्षात घेता, या निर्णयाचा आदर व्हायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोनाFootballफुटबॉलIndiaभारत