शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

राज्य शासनाकडून फुटबॉलपटूंना किक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 06:28 IST

शिवछत्रपती पुरस्कार; वीस वर्षात केवळ चौघांचाच सन्मान

- सचिन भोसले 

कोल्हापूर : राज्य शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलपटू काही केल्या पात्रतेच्या निकषांत यंदाही बसले नाहीत. त्यामुळे २० वर्षांपासून सुरू असलेला पुरस्कारापर्यंतचा प्रवास काही केल्या संपेनासा झाला आहे. राज्य शासनाने पुरस्काराबाबतचे निकष बदलावेत, अशी मागणी फुटबॉल जाणकारांकडून होत आहे.

राज्य शासनातर्फे दरवर्षी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, मार्गदर्शकांना हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. ‘फुटबॉल’ या खेळात खेळाडूंना संतोष ट्रॉफीसारख्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य अशी पदके सलग चार वर्षे मिळवावी लागतील अथवा आंतरराष्ट्रीय वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, तरच हा पुरस्कार मिळेल, असा निकष आहे. संघटक-कार्यकर्त्यांना हा पुरस्कार हवा असल्यास देशभरात सातत्याने सराव शिबिर, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे दौरे आयोजित केले पाहिजेत. त्यांचे प्रशिक्षकपद भूषविले पाहिजे. राष्ट्रीय स्पर्धाही भरविल्या पाहिजेत; तरच हा पुरस्कार त्यांना मिळेल. प्रशिक्षकांनी तर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले पाहिजेत, असे निकष आहेत. एकूणच पुरस्कार छाननी समिती निकषानुसार हा पुरस्कार फुटबॉलपटूंना मिळणे कठीण दिसते. त्यामुळे राज्य शासनाने निकष बदलले तरच फुटबॉलपटूंना पुढील वर्षी ‘शिवछत्रपती’ पुरस्कार मिळेल.

पुरस्कार सुरू झाल्यापासून १९९० ला महाराष्ट्र संघाने केरळवर १-० ने मात केली. या संघात गॉडश्री परेरा, अखिल अन्सारी यांना खेळाडू म्हणून, तर प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू डेरिक डिसूझा (पूर्वीचा दादोजी कोंडदेव पुरस्कार) आणि कार्यकर्ता-संघटक म्हणून शिवाजी पाटील यांना १९९७ साली पुरस्कार मिळाला आहे.फुटबॉल खेळासाठी बदलले निकषजलतरण, हॉकी, नेमबाजी, कुस्ती, वेट लिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, खो-खो, मल्लखांब यांतील खेळाडू व संघटकांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते.विशेषत: कुस्ती, नेमबाजी या खेळांना पुरस्कारात झुकते माप दिले जाते. मात्र, फुटबॉलसाठी वेगळे निकष लावल्याने या खेळात सरकारच्या निकषांत बसणारे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक मिळणे कठीण आहे. 

पुरस्कारातील कोटा पद्धत बंद करावी, यासह महाराष्ट्रातील खेळाडूंची किमान दोन महिन्यांची लीग सुरू करावी. त्यातून खेळाडूंची निवड करावी. मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ता, आदींबाबत निकष बदलण्याबाबत विचार करावा.- शिवाजी पाटील, शिवछत्रपतीपुरस्कार विजेते