शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

भारताची अपराजित मोहीम कायम, म्यानमारला २-२ ने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:36 IST

दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

मडगाव : दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या दोघांच्या गोलमुळे भारताने आपली अपराजित मोहीम कायम राखली. गेल्या १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताने एकही सामना गमावलेला नाही. भारताने ११ सामन्यांत विजय आणि दोन सामन्यांत बरोबरी साधली आहे. आता भारताचा पुढील सामना मार्चमध्ये किर्गिस्तानविरुद्ध होईल.येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एएफसी आशिया चषक २०१८ च्या पात्रता फेरीतील सामना खेळविण्यात आला. या सामन्यात म्यानमारने पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवून भारतीय संघाला धक्का दिला होता. हा गोल नेंग ओ याने नोंदवला. त्यानंतर क्याऊ को को याने १९ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली होती. भारताकडून सुनील छेत्रीने १३ व्या मिनिटाला गोल नोंदवून १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर जेजे याने ६९ व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली.भारताची सुरुवात निराशाजक राहिली. कारण, १७ व्या सेकंदालाच म्यानमारने आघाडी घेतली. हा फुटबॉल इतिहासातील सर्वात जलद गोलपैकी एक गोल ठरला. फातोर्डा स्टेडियमवर चेंडूला एकच किक लागली होती. अशा अवस्थेत म्यानमारने केलेली सुरुवात भारताला धक्का देणारी ठरली. थीन थान विन याने डाव्या बाजूने यान नेंग याच्याकडे चेंडू क्रॉस केला. त्याने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात ढकलला. हा गोल पाहणाºया ५५०० प्रेक्षकांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. त्यानंतर भारतीय संघाने बरोबरी साधण्यात वेळ दवडला नाही. १२ व्या मिनिटाला हिलियांग बो बो याने छेत्रीला बॉक्सच्या आत पाडले. त्यामुळे भारताला पेनल्टी मिळाली. यावर कर्णधारछेत्रीने सहजरीत्या गोल नोंदवला. छेत्रीचा हा भारताकडून ५७ वा गोल ठरला. त्यानंतर ६ मिनिटांच्या अंतराने म्यानमारने गोल नोंदवून आघाडी घेतली. या वेळी भारतीय गोलरक्षक गुरुप्रीत सिंह याच्याकडूनही चूक झाली. तो चेंडूला समजू शकला नाही. लांबवरून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याने म्यानमारला संधी दिली. भारतीय संघ मध्यंतरापर्यंत २-१ अशा पिछाडीवर होता. याचदरम्यान भारताला २९ व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची संधी होती. मात्र, त्यावेळी छेत्री एकटाच चेंडू घेऊन धावत होता. अखेर त्याने चेंडू जरमनप्रीतकडे सोपवला. त्याने मारलेला फटका दिशाहीन ठरला. भारताला ८७ व्या मिनिटाला आणखी संधी मिळाली होती. छेत्रीने चेंडूला गोलजाळ्यातही टाकले होते. मात्र रेफरीने गोल देण्यास नकार दिला. कारण ही सरळ फ्री किक नव्हती.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतMyanmarम्यानमार