शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

भारताची अपराजित मोहीम कायम, म्यानमारला २-२ ने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:36 IST

दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

मडगाव : दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या दोघांच्या गोलमुळे भारताने आपली अपराजित मोहीम कायम राखली. गेल्या १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताने एकही सामना गमावलेला नाही. भारताने ११ सामन्यांत विजय आणि दोन सामन्यांत बरोबरी साधली आहे. आता भारताचा पुढील सामना मार्चमध्ये किर्गिस्तानविरुद्ध होईल.येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एएफसी आशिया चषक २०१८ च्या पात्रता फेरीतील सामना खेळविण्यात आला. या सामन्यात म्यानमारने पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवून भारतीय संघाला धक्का दिला होता. हा गोल नेंग ओ याने नोंदवला. त्यानंतर क्याऊ को को याने १९ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली होती. भारताकडून सुनील छेत्रीने १३ व्या मिनिटाला गोल नोंदवून १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर जेजे याने ६९ व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली.भारताची सुरुवात निराशाजक राहिली. कारण, १७ व्या सेकंदालाच म्यानमारने आघाडी घेतली. हा फुटबॉल इतिहासातील सर्वात जलद गोलपैकी एक गोल ठरला. फातोर्डा स्टेडियमवर चेंडूला एकच किक लागली होती. अशा अवस्थेत म्यानमारने केलेली सुरुवात भारताला धक्का देणारी ठरली. थीन थान विन याने डाव्या बाजूने यान नेंग याच्याकडे चेंडू क्रॉस केला. त्याने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात ढकलला. हा गोल पाहणाºया ५५०० प्रेक्षकांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. त्यानंतर भारतीय संघाने बरोबरी साधण्यात वेळ दवडला नाही. १२ व्या मिनिटाला हिलियांग बो बो याने छेत्रीला बॉक्सच्या आत पाडले. त्यामुळे भारताला पेनल्टी मिळाली. यावर कर्णधारछेत्रीने सहजरीत्या गोल नोंदवला. छेत्रीचा हा भारताकडून ५७ वा गोल ठरला. त्यानंतर ६ मिनिटांच्या अंतराने म्यानमारने गोल नोंदवून आघाडी घेतली. या वेळी भारतीय गोलरक्षक गुरुप्रीत सिंह याच्याकडूनही चूक झाली. तो चेंडूला समजू शकला नाही. लांबवरून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याने म्यानमारला संधी दिली. भारतीय संघ मध्यंतरापर्यंत २-१ अशा पिछाडीवर होता. याचदरम्यान भारताला २९ व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची संधी होती. मात्र, त्यावेळी छेत्री एकटाच चेंडू घेऊन धावत होता. अखेर त्याने चेंडू जरमनप्रीतकडे सोपवला. त्याने मारलेला फटका दिशाहीन ठरला. भारताला ८७ व्या मिनिटाला आणखी संधी मिळाली होती. छेत्रीने चेंडूला गोलजाळ्यातही टाकले होते. मात्र रेफरीने गोल देण्यास नकार दिला. कारण ही सरळ फ्री किक नव्हती.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतMyanmarम्यानमार