शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

भारताची अपराजित मोहीम कायम, म्यानमारला २-२ ने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:36 IST

दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

मडगाव : दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या दोघांच्या गोलमुळे भारताने आपली अपराजित मोहीम कायम राखली. गेल्या १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताने एकही सामना गमावलेला नाही. भारताने ११ सामन्यांत विजय आणि दोन सामन्यांत बरोबरी साधली आहे. आता भारताचा पुढील सामना मार्चमध्ये किर्गिस्तानविरुद्ध होईल.येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एएफसी आशिया चषक २०१८ च्या पात्रता फेरीतील सामना खेळविण्यात आला. या सामन्यात म्यानमारने पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवून भारतीय संघाला धक्का दिला होता. हा गोल नेंग ओ याने नोंदवला. त्यानंतर क्याऊ को को याने १९ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी दुप्पट केली होती. भारताकडून सुनील छेत्रीने १३ व्या मिनिटाला गोल नोंदवून १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर जेजे याने ६९ व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली.भारताची सुरुवात निराशाजक राहिली. कारण, १७ व्या सेकंदालाच म्यानमारने आघाडी घेतली. हा फुटबॉल इतिहासातील सर्वात जलद गोलपैकी एक गोल ठरला. फातोर्डा स्टेडियमवर चेंडूला एकच किक लागली होती. अशा अवस्थेत म्यानमारने केलेली सुरुवात भारताला धक्का देणारी ठरली. थीन थान विन याने डाव्या बाजूने यान नेंग याच्याकडे चेंडू क्रॉस केला. त्याने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात ढकलला. हा गोल पाहणाºया ५५०० प्रेक्षकांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. त्यानंतर भारतीय संघाने बरोबरी साधण्यात वेळ दवडला नाही. १२ व्या मिनिटाला हिलियांग बो बो याने छेत्रीला बॉक्सच्या आत पाडले. त्यामुळे भारताला पेनल्टी मिळाली. यावर कर्णधारछेत्रीने सहजरीत्या गोल नोंदवला. छेत्रीचा हा भारताकडून ५७ वा गोल ठरला. त्यानंतर ६ मिनिटांच्या अंतराने म्यानमारने गोल नोंदवून आघाडी घेतली. या वेळी भारतीय गोलरक्षक गुरुप्रीत सिंह याच्याकडूनही चूक झाली. तो चेंडूला समजू शकला नाही. लांबवरून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याने म्यानमारला संधी दिली. भारतीय संघ मध्यंतरापर्यंत २-१ अशा पिछाडीवर होता. याचदरम्यान भारताला २९ व्या मिनिटाला गोल नोंदवण्याची संधी होती. मात्र, त्यावेळी छेत्री एकटाच चेंडू घेऊन धावत होता. अखेर त्याने चेंडू जरमनप्रीतकडे सोपवला. त्याने मारलेला फटका दिशाहीन ठरला. भारताला ८७ व्या मिनिटाला आणखी संधी मिळाली होती. छेत्रीने चेंडूला गोलजाळ्यातही टाकले होते. मात्र रेफरीने गोल देण्यास नकार दिला. कारण ही सरळ फ्री किक नव्हती.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतMyanmarम्यानमार