शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Shocking: भारताचे दिग्गज फुटबॉलपटू Chuni Goswani यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 18:40 IST

बंगाल रणजी संघाचेही नेतृत्व त्यांनी सांभाळले.

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चूनी गोस्वामी यांचे ८२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९६२च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे ते कर्णधार होते. शिवाय त्यांनी बंगाल क्रिकेट संघाचेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज सायंकाळी ५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९६२ साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १९६४ मध्ये उपविजेतापर्यंत मजल मारली. क्लब फुटबॉलमध्ये त्यांनी मोहन बागानचे प्रतिनिधित्व केले. महाविद्यालयीन स्पर्धेत त्यांनी कोलकाता युनिव्हर्सिटी संघाचे नेतृत्व सांभाळले. त्यांनी क्रिकेट संघाचेही प्रतिनिधित्व केले. 

१९५७ मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. राष्ट्रीय संघातील ते एक स्टार खेळाडू होते. पण, वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. 

१९६६ मध्ये त्यांनी आणि सुब्रतो गुहा यांनी विक्रमी कामगिरी करताना गॅरी सोबर्स यांच्या वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला. गोस्वामी यांनी ८ विकेट्स घेतल्या. 

१९७१-७२ च्या रणजी करंडक मोसमात बंगाल संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनी बंगाल संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून दिली, परंतु मुंबईकडून त्यांना हार मानावी लागली.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघFootballफुटबॉल