शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

अफगाणिस्तानविरुद्ध भारताला विजयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 04:17 IST

फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे.

दुशाम्बे (ताजिकिस्तान): फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे. ई गटात समावेश असलेल्या भारताकडे केवळ दोन गुण असून गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. पुढील फेरी गाठण्यासाठी संघाला विजयाची गरज असेल. पराभव झाला तर मात्र पुढील फेरीची आशा संपुष्टात येईल. युद्धजन्य अफगाणने मायदेशातील सामन्यासाठी ताजाकिस्तानच्या दुशाम्बे शहराची निवड केली हे विशेष.भारताने पात्रता फेरीची सुरुवात ओमानविरुद्ध मिळालेल्या १-२ या पराभवासह केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दोहा येथे आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्यने बरोबरीत रोखले. दोन्ही सामन्यातील कामगिरीमुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तथापि १५ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे शेजारी बांगला देशविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटताच उत्साहावर विरजण पडले. प्रतिस्पर्धी संघाकडून आदिलखान याने ८८ व्या मिनिटाला हेडरवर गोल नोंदवून सॉल्टलेकवर उपस्थित भारतीय चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले होते. अफगाण संघ फिफा क्रमवारीत १४९ व्या तर भारत १०६ व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानने गटात एक विजय आणि दोन पराभवांसह तिसरे स्थान पटकावले.भारतीय प्रशिक्षक इगोर स्टीमक कुठल्याही स्थितीत सामना गमविण्याच्या विचारात नाहीत. स्टीमक म्हणाले, ‘संघाने कामगिरीच्या बळावर कुठल्याही स्थितीत येथे विजय मिळवायलाच हवा.’ हा सामना अत्यंत थंड वातावरणात कृत्रिम टर्फवर खेळला जाणार असल्याने स्टीमक यांच्या अडचणीत भर पडली. भारतीय खेळाडू अशा परिस्थितीश्ी एकरुप नाहीत. येथील तापमान शून्यापर्यंत असते. (वृत्तसंस्था)>रेकॉर्ड भारताच्या बाजूने...रेकॉर्डवर नजर टाकल्यास भारताचे पारडे अफगाणिस्तावर जड आहे. उभय संघ ८ वेळा परस्परांविरुद्ध खेळले. त्यातील ६ सामने भारताने जिंकले. एक सामना अफगाणिस्तानने जिंकला तर एक सामना अनिर्णीत राहीला होता. उभय संघ २०१३ च्या सॅफ गेममध्ये अखेरचा सामना खेळले. त्यावेळी अफगाणिस्तान संघ २-० ने विजयी ठरला होता. अफगाण संघाने मागच्या गटातील सामन्यात बांगला देशवर १-० ने मात केली होती. तथापि ओमानकडून त्यांचा ०-३ ने आणि कतारकडून ०-६ ने पराभव झाला होता. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक ४८ आंतरराष्टÑीय सामने खेळणारा हारुन आमिरी हा भारतीय खेळाडूंसाठी परिचित आहे. तो इंडियन सुपर लीगसाठी २०१४ मध्ये गोव्याकडून खेळला. यंदा तो आय लीगमध्ये गोकुलम केरळ एफसीचा खेळाडू होता.>बांगला देशविरुद्ध ज्या चुका झाल्या त्या टाळून सहकाऱ्यांना संधीचा लाभ घ्यावा लागेल. भारताचा बचाव फळीतील खेळाडू अनस इडाथेडिका याच्या आईचे निधन झाल्यामुळे तो भारतात परतला आहे. याश्विाय रॉलिन बोंर्जेस हा जखमी आहे. - सुनील छेत्री