शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अफगाणिस्तानविरुद्ध भारताला विजयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 04:17 IST

फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे.

दुशाम्बे (ताजिकिस्तान): फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे. ई गटात समावेश असलेल्या भारताकडे केवळ दोन गुण असून गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. पुढील फेरी गाठण्यासाठी संघाला विजयाची गरज असेल. पराभव झाला तर मात्र पुढील फेरीची आशा संपुष्टात येईल. युद्धजन्य अफगाणने मायदेशातील सामन्यासाठी ताजाकिस्तानच्या दुशाम्बे शहराची निवड केली हे विशेष.भारताने पात्रता फेरीची सुरुवात ओमानविरुद्ध मिळालेल्या १-२ या पराभवासह केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दोहा येथे आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्यने बरोबरीत रोखले. दोन्ही सामन्यातील कामगिरीमुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तथापि १५ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे शेजारी बांगला देशविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटताच उत्साहावर विरजण पडले. प्रतिस्पर्धी संघाकडून आदिलखान याने ८८ व्या मिनिटाला हेडरवर गोल नोंदवून सॉल्टलेकवर उपस्थित भारतीय चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले होते. अफगाण संघ फिफा क्रमवारीत १४९ व्या तर भारत १०६ व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानने गटात एक विजय आणि दोन पराभवांसह तिसरे स्थान पटकावले.भारतीय प्रशिक्षक इगोर स्टीमक कुठल्याही स्थितीत सामना गमविण्याच्या विचारात नाहीत. स्टीमक म्हणाले, ‘संघाने कामगिरीच्या बळावर कुठल्याही स्थितीत येथे विजय मिळवायलाच हवा.’ हा सामना अत्यंत थंड वातावरणात कृत्रिम टर्फवर खेळला जाणार असल्याने स्टीमक यांच्या अडचणीत भर पडली. भारतीय खेळाडू अशा परिस्थितीश्ी एकरुप नाहीत. येथील तापमान शून्यापर्यंत असते. (वृत्तसंस्था)>रेकॉर्ड भारताच्या बाजूने...रेकॉर्डवर नजर टाकल्यास भारताचे पारडे अफगाणिस्तावर जड आहे. उभय संघ ८ वेळा परस्परांविरुद्ध खेळले. त्यातील ६ सामने भारताने जिंकले. एक सामना अफगाणिस्तानने जिंकला तर एक सामना अनिर्णीत राहीला होता. उभय संघ २०१३ च्या सॅफ गेममध्ये अखेरचा सामना खेळले. त्यावेळी अफगाणिस्तान संघ २-० ने विजयी ठरला होता. अफगाण संघाने मागच्या गटातील सामन्यात बांगला देशवर १-० ने मात केली होती. तथापि ओमानकडून त्यांचा ०-३ ने आणि कतारकडून ०-६ ने पराभव झाला होता. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक ४८ आंतरराष्टÑीय सामने खेळणारा हारुन आमिरी हा भारतीय खेळाडूंसाठी परिचित आहे. तो इंडियन सुपर लीगसाठी २०१४ मध्ये गोव्याकडून खेळला. यंदा तो आय लीगमध्ये गोकुलम केरळ एफसीचा खेळाडू होता.>बांगला देशविरुद्ध ज्या चुका झाल्या त्या टाळून सहकाऱ्यांना संधीचा लाभ घ्यावा लागेल. भारताचा बचाव फळीतील खेळाडू अनस इडाथेडिका याच्या आईचे निधन झाल्यामुळे तो भारतात परतला आहे. याश्विाय रॉलिन बोंर्जेस हा जखमी आहे. - सुनील छेत्री