शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भारतासाठी चषक जिंकला, पण मणिपूरमध्ये गमावलं हक्काचं घर; कर्णधार राहतोय Relief Camp मध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 20:28 IST

गेल्या आठवड्यात थिम्पू येथे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन SAFF १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावले.

मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरूच आहे, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीत १७० हून अधिक जणांनी जीव गमावला आहे, तर हजारांहून अधिक जणं बेघर झाली आहेत. या बेघरांमध्ये भारताचा स्टार फुटबॉलपटूही आहे. गेल्या आठवड्यात थिम्पू येथे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन SAFF १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताला चषक जिंकून देणाऱ्या संघाचा सदस्य असलेला न्गामगौहो माटे ( Ngamgouhou Mate ) मणिपूरमध्ये जेव्हा परतला तेव्हा त्याचं हक्काचं घर उध्वस्त झालं होतं. त्याला आता रिलीफ कॅम्पमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. 

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार टेंगनौपाल जिल्ह्यातील आहे आणि त्याचे घर आता राहिलेले नाही. येथील जातीय हिंसाचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे घर जाळल्यामुळे त्याला कांगपोकपी जिल्ह्यातील एका मदत शिबिरात ठेवण्यात आले होते. राहण्यासाठी घर नसतानाही, त्याने आता मणिपूरमध्ये शांततेची अपेक्षा केली आहे. "माझ्या सभोवतालचे लोक सुरक्षित आहेत याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आमच्या राज्याला या मोठ्या हिंसाचाराचा फटका बसला आहे आणि आता मला वाटते की आपण शांततेची अपेक्षा केली पाहिजे," असे त्याने पत्रकारांना सांगितले. 

काल कांगपोकपी येथे माटे आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. "आम्हाला आमच्या Meitei सहकाऱ्यांवर प्रेम आहे. आम्ही मैत्रीपूर्ण आहोत आणि जसे आम्ही एकत्र ट्रॉफी उचलली, आम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी आहे," असे भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाचे सदस्य वुम्लेनलाल हँगशिंग म्हणाले.    

टॅग्स :FootballफुटबॉलManipur Violenceमणिपूर हिंसाचार