शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही अन्न गरम करताय की अन्नात विष कालवताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:27 IST

जेवण गरम असायला हवं हे मान्यच. परंतु केलेला स्वयंपाक वारंवार गरम करणं कितपत योग्य आहे? जेवणातील काही पदार्थ गरम केलेत तर काही बिघडत नाही, मात्र काही पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील घटकांची रासायनिक प्रक्रि या होऊन विष तयार होऊ शकतं, म्हणूनच जेवण वाढताना अन्न पुन्हा गरम करत असाल तर नीट विचार करा.

ठळक मुद्दे* भात गरमच खाल्ला पाहिजे असाच हा पदार्थ. त्यामुळेच तो हमखास पुन्हा गरम करूनच वाढला जातो. परंतु, एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम केला तर धोका निर्माण होऊ शकतो.* शिजवलेले बटाटे उघड्यावर राहिले आणि पुन्हा गरम केले गेले तर त्यापेक्षा वाईट विष काही नसतं.* पालक किंवा अन्य पालेभाज्या एकदा शिजवून पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यातील कार्सिजनिक घटक आरोग्यास घातक ठरु शकतात. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण देणारं विष देखील यामुळे तयार होऊ शकतं.

-सारिका पूरकर-गुजराथी‘तू हात-पाय धुवून घे, मी जेवण गरम करते ’ किंवा ‘तुम मुँह-हाथ धो लो, मै खाना गरम करती हूँ’’ हे केवळ मराठी, हिंदी चित्रपटातील आईच्या तोंडचे संवाद नाहीयेत तर आपल्या रोजच्या जेवणाच्या सवयी, खाद्यसंस्कृतीशी निगडित अविभाज्य बाब आहे.. स्वयंपाक केल्याकेल्या घरातील सर्वजण जेवत नाहीत. प्रत्येकाच्या कामाच्या वेळेनुसार जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. साहजिकच तयार करून ठेवलेला स्वयंपाक घरातील प्रत्येक सदस्य जेवतो तोवर गार होतो. मग जेवायला बसताना तो गरम करूनच पानात वाढला जातो. कारण आमटी, भात, भाज्या यांची चव गरमच छान लागते. किंवा मग असंही होतं की, उरलेलं अन्न फ्रीजमध्ये साठवून पुन्हा वापरताना ते गरम केलं जातं.जेवण गरम असायला हवं हे मान्यच..परंतु केलेला स्वयंपाक वारंवार गरम करणं कितपत योग्य आहे?जेवणातील काही पदार्थ गरम केलेत तर काही बिघडत नाही, मात्र काही पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील घटकांची रासायनिक प्रक्रि या होऊन विष तयार होऊ शकतं, त्यातील पोषक मुल्यांचा-हास होऊ शकतो आणि यामुळे साहजिकच तुमच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच जेवण वाढताना अन्न पुन्हा गरम करत असाल तर नीट विचार करा. त्याआधी कोणते पदार्थ सारखे गरम का करू नये हे समजून घ्या!1) भातभात गरमच खाल्ला पाहिजे असाच हा पदार्थ. त्यामुळेच तो हमखास पुन्हा गरम करूनच वाढला जातो. परंतु, एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम केला तर धोका निर्माण होऊ शकतो. भात शिजवण्यासाठी लागणा-या कच्च्या तांदळात विविध जीवाणू असतात. ते भात शिजल्यानंतर देखील कायम राहू शकतात. त्यामुळे शिजवलेला भात जर रुम टेंपरेचरला म्हणजेच उघड्यावर राहिला तर या जीवाणूंची संख्या खूप वाढू शकते. आणि या वाढलेल्या जीवाणूंमुळे अतिसार, उलट्या असा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच उघड्यावर जास्त वेळ शिजवून ठेवलेला भात पुन्हा गरम करु नका.

 

 

2) बटाट्याचे पदार्थबटाटा तर सर्वांचा लाडका असतो. बटाट्याची भाजी द्या नाही तर पराठे, समोसा. काहीही. केव्हाही चालतं. त्यामुळेच बटाट्याची भाजी तर हमखास गरम करूनच वाढली जाते. परंतु, यामुळे बटाट्यातील पौष्टिक तत्वांचा नाश तर होतोच शिवाय पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे बटाट्यातील बोटुलिझम या बॅक्टेरियात वाढ होते. आणि त्यामुळे अनेक आजार बळावू शकतात. शिजवलेले बटाटे उघड्यावर राहिले आणि पुन्हा गरम केले गेले तर त्यापेक्षा वाईट विष काही नसतं. म्हणूनच जास्तीचे शिजवलेले बटाटे, भाजी उरली तर लगेचच फ्रीजमध्ये झाकून ठेवा. आणि पुन्हा फ्रीजमधून बाहेर काढून एकतासाच्या आतच त्याचा वापर करावा.

 

 

3) मशरूम्स

प्रोटीन्सचा खजिना असलेले मशरूम्स ज्यांना आवडतात त्यांनी मशरूम्सचे पदार्थ एकदा शिजवल्यावर वारंवार ते गरम करु नयेत. कारण यामुळे मशरूम्स आपली नैसर्गिक संरचना बदलतात आणि त्यामुळेच दरदरून घाम येणं, पोटाच्या समस्या असे विकार होऊ शकतात.

 

 

4) बीटरूट

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट नेहमी खाल्ले जाते. मात्र त्यापासून तयार केलेले पदार्थ देखील पुन्हा गरम केल्यास बीटरुटपासून आरोग्यास लाभ नाही तर उलट धोकाच पोहाचतो. कारण बीटरूटमध्ये असलेले नायट्रेट्र्सचं रूपांतर गरम केल्यानंतर नाइट्रेट्समध्ये होतं आणि ते शरीरास खूप हानिकारक असतं.

 

 

5) हिरव्या पालेभाज्यापालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. पालक किंवा अन्य पालेभाज्या एकदा शिजवून पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यातील कार्सिजनिक घटक आरोग्यास घातक ठरु शकतात. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण देणारं विष देखील यामुळे तयार होऊ शकतं. म्हणनूच पालकाची भाजी करताना ती केल्याकेल्या लगेच पानात वाढा. किंवा पालक शक्यतो कच्चा खाण्यावर भर द्या. आणखी एक पर्याय म्हणजे पालकाची भाजी करून ठेवली असल्यास ती गरम न करता थंडच खा.

6) गाजर

गाजराचा हलवा हमखास पुन्हा पुन्हा गरम केला जातो. पण तसं अजिबातच करु नका. पालेभाज्याप्रमाणेच गाजराचे पदार्थ पुन्हा गरम केल्यास हानिकारक ठरु शकतात.अन्न वाया न घालवणं, तसेच गरम-गरम जेवण वाढणं हे जरी योग्य असलं तरी ते पुन्हा गरम करताना आपण आपल्या शरीरात विष तर ढकलत नाहीये ना? याचा विचारही व्हायला हवा.