शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

फराळ झाल्यावर तळलेले तेल बरेच उरले तर काय करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 11:41 IST

दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं?

- मंजिरी कुलकर्णी

दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं? कुणी म्हणतं ते तेल भाजीआमटीला वापरून टाकावे, कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळते, कुणी ते तेल न खाता सरळ फेकून देते. यातलं खरं-खोटं काय? तळलेल्या तेलाचं नेमकं करायचं काय? आणि मुळात म्हणजे एकदा पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का?

तर त्या प्रश्नांचं एकच उत्तर, की एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरलं तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असू शकते. त्यामुळे तळताना अंदाजाने मापात तेल घ्यावे, कारण उरलेले तेल टाकून देणं जीवावर येणं साहजिकच आहे. मात्र आरोग्याचा विचार करता एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करून पदार्थ तळणे हे हिताचे नाही.

तळलेले तेल पुन्हा पुन्हा का वापरू नये?>> तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असू शकते. त्या तेलाच्या पुनर्वापराने कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते.>> पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते.>> पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलात कॅन्सर कॉजिंग एजंट, पॉलिसायकलिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात, ते हानीकारक घटक असतात. त्यानं कर्करोग होण्याचा धोका बळावतो.>> अनेकदा गरम केल्यानं तेलात विषारी प्रक्रिया सुरु होते.>> त्यातले चांगले घटक कमी होतात.>> म्हणून पुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते. ते वापरू नये.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :foodअन्न