शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

फराळ झाल्यावर तळलेले तेल बरेच उरले तर काय करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 11:41 IST

दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं?

- मंजिरी कुलकर्णी

दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं? कुणी म्हणतं ते तेल भाजीआमटीला वापरून टाकावे, कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळते, कुणी ते तेल न खाता सरळ फेकून देते. यातलं खरं-खोटं काय? तळलेल्या तेलाचं नेमकं करायचं काय? आणि मुळात म्हणजे एकदा पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का?

तर त्या प्रश्नांचं एकच उत्तर, की एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरलं तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असू शकते. त्यामुळे तळताना अंदाजाने मापात तेल घ्यावे, कारण उरलेले तेल टाकून देणं जीवावर येणं साहजिकच आहे. मात्र आरोग्याचा विचार करता एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करून पदार्थ तळणे हे हिताचे नाही.

तळलेले तेल पुन्हा पुन्हा का वापरू नये?>> तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असू शकते. त्या तेलाच्या पुनर्वापराने कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते.>> पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते.>> पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलात कॅन्सर कॉजिंग एजंट, पॉलिसायकलिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात, ते हानीकारक घटक असतात. त्यानं कर्करोग होण्याचा धोका बळावतो.>> अनेकदा गरम केल्यानं तेलात विषारी प्रक्रिया सुरु होते.>> त्यातले चांगले घटक कमी होतात.>> म्हणून पुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते. ते वापरू नये.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :foodअन्न