शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

भाजीत मीठ जास्त झालय : चिंता नको, करा हे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 18:48 IST

भाजीत मीठ जास्त झालं की काहीही करू शकत नाही असा गृहिणींचा भाव असतो. हे आहेत घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भाजीची चव बदलण्याचे उपाय. 

पुणे : भाजीत मीठ जास्त झालं की काहीही करू शकत नाही असा गृहिणींचा भाव असतो. मीठ जास्त झालेल्या भाजीला अनेकदा कचऱ्याची कुंडीही दाखवली जाते. पण आता काळजी नको, खारटपणा कमी करण्यासाठीचे हे उपाय वापरा आणि भाजीची चव बदला. हे आहेत घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भाजीची चव बदलण्याचे उपाय. 

बटाटा : हा खारटपणा कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. सहसा बटाटा सर्व भाज्यांमध्ये घातला जातो. त्यामुळे भाजीत पाणी घालून कच्च्या बटाट्याच्या फोडी घालून शिजवा. बटाटा आपोआप मीठ शोषून घेईल. 

कणकेचा उंडा : वाचायला विचित्र वाटलं तरी कणकेचा घट्ट गोळा उकळत्या रश्श्यात टाका. छान १० मिनिटे उकळी आल्यावर गोळा बाहेर काढून टाका. हा गोळा मीठ आणि मसाला पण शोषून घेतो. नंतर भाजीची चव बघून आवश्यकता असल्यास मसाला घाला. 

लिंबू :लिंबूदेखील खारटपणा कमी करण्याचा नामी उपाय आहे. विशेषतः पोहे, उपीट, सांजा अशा पदार्थात मीठ अधिक झाल्यास लिंबाचे  थेंब टाका. लिंबू प्रमाणात टाकावे नाहीतर पदार्थ आंबट होऊ शकतो. 

दही व साय  : अनेक मसालेदार भाज्यांमध्ये मीठ जास्त झाल्यास हा हमखास चालणारा उपाय आहे. फार आंबट नसलेले दही आणि साय एकत्र  करून भाजीत टाकल्यास खारटपणा आणि जळजळीतपणाही कमी होतो. 

टॅग्स :Receipeपाककृतीfoodअन्न