शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
3
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
4
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
5
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
6
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
7
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
8
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
9
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
10
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
11
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
12
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
13
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
14
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
15
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
16
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
17
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
18
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
19
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
20
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
Daily Top 2Weekly Top 5

Mango: हाताचा आंब्याचा वास संध्याकाळपर्यंत हाेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 12:45 IST

Mango: मागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो.

- संजय मोने, अभिनेतेमागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो. लहानपणी दरवर्षी गावाला जात होतो. माझ्या आईने आमचे सगळे नातेसंबंध जपून ठेवले होते. वडिलांना अमुक एक भाऊ किंवा बहीण आणि इतर नाती असावीत, असा अंदाज असायचा. त्यामुळे कधीतरी ‘अहो! आत्ते नाही मामेभाऊ आहे तुमचा. नाव अशोक नाही सदानंद आहे’, असा आईचा आवाज कानावर पडायचा. त्यावर ‘तोच तो!’, असं बाबा म्हणायचे. आजही तीच परंपरा मी चालवली आहे आणि माझी पत्नी तशीच सुधारणा करत असते. असो! तर रत्नागिरीला प्रयोग होता. मी गावाला गेलो होतो. आता माझी आई हयात नाही; पण माझ्या सगळ्या काकू ती उणीव जाणवू देत नाही. मोठी काकू (तिचे नाव सुधा होते) होती, त्यानंतर शोभाकाकू मग रोहिणीकाकू आणि अनघाकाकू. सगळ्यांचा स्वयंपाक जणू माझ्या आईच्या धाकट्या बहिणी असल्यासारखा उत्कृष्ट आणि एकसाची होता. मी जरा ब्राम्हणी आमटीच्या बाबतीत फारच चिकित्सक आहे; पण सगळ्या काकूसारखी (झेरॉक्स) आमटी करायच्या. दोन दिवस प्रयोग सांभाळून घरचं जेवण झालं. उन्हाळा असल्यामुळे आमरस, घरचा भात, आंबोशीचं लोणचं (हे खायला कोकणातला जन्म असायला लागतो) खाऊन शेवटच्या दिवशी रत्नागिरी शहरात प्रयोगाला पोचलो. नेहमीप्रमाणे उकाड्याने जीव हैराण झाला होता. प्रयोग संपला आणि जेवायला दत्त नावाच्या कार्यालयात पोचलो. साधारण दीड-दोन वाजले होते. प्रयोग संपवून घरी परत जायचे होते. म्हणून जे काय असेल ते पोटात ढकलायचं आणि निघायचं एवढं ठरलं होतं. पानं मांडली गेली आणि काय आश्चर्य! ताटात स्वर्ग! उत्तम पडवळ डाळिंब्यांची उसळ, मऊसूत पोळ्या, पंचामृत, टोमॅटोचा रस्सा ताक आणि फणसाच्या बियांची (आठळ्या म्हणतात त्याला.) भाजी.. मस्त शिजलेल्या आठळ्या. साधी फोडणी, साधा गोडा मसाला. वर ओलं खोबरं.. इतकं सुंदर जेवण की, ते उत्तम भटजी नावाचे दत्त उपाहारगृहाचे चालक म्हणाले, ‘अहो! हापूसचा रस आहे माझ्या दारचा तोही खाऊन बघा!’ मी त्यांना म्हणालो ‘उत्तम भटजी! माझ्या घरचा आलोय की खाऊन’. ते ही कोकणातले खट, म्हणाले; ‘प्रत्येक आंब्याचे पान निराळे आणि रसही निराळा’, आग्रहाखातर फक्त चार वाट्या रस प्यायलो. पुढे आठवतं ते इतकंच, मुंबईत सात वाजता आलो. हाताला येणारा आंब्याचा वास संध्याकाळीही दरवळत होता.

टॅग्स :MangoआंबाSanjay Moneसंजय मोने