शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Mango: हाताचा आंब्याचा वास संध्याकाळपर्यंत हाेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 12:45 IST

Mango: मागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो.

- संजय मोने, अभिनेतेमागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो. लहानपणी दरवर्षी गावाला जात होतो. माझ्या आईने आमचे सगळे नातेसंबंध जपून ठेवले होते. वडिलांना अमुक एक भाऊ किंवा बहीण आणि इतर नाती असावीत, असा अंदाज असायचा. त्यामुळे कधीतरी ‘अहो! आत्ते नाही मामेभाऊ आहे तुमचा. नाव अशोक नाही सदानंद आहे’, असा आईचा आवाज कानावर पडायचा. त्यावर ‘तोच तो!’, असं बाबा म्हणायचे. आजही तीच परंपरा मी चालवली आहे आणि माझी पत्नी तशीच सुधारणा करत असते. असो! तर रत्नागिरीला प्रयोग होता. मी गावाला गेलो होतो. आता माझी आई हयात नाही; पण माझ्या सगळ्या काकू ती उणीव जाणवू देत नाही. मोठी काकू (तिचे नाव सुधा होते) होती, त्यानंतर शोभाकाकू मग रोहिणीकाकू आणि अनघाकाकू. सगळ्यांचा स्वयंपाक जणू माझ्या आईच्या धाकट्या बहिणी असल्यासारखा उत्कृष्ट आणि एकसाची होता. मी जरा ब्राम्हणी आमटीच्या बाबतीत फारच चिकित्सक आहे; पण सगळ्या काकूसारखी (झेरॉक्स) आमटी करायच्या. दोन दिवस प्रयोग सांभाळून घरचं जेवण झालं. उन्हाळा असल्यामुळे आमरस, घरचा भात, आंबोशीचं लोणचं (हे खायला कोकणातला जन्म असायला लागतो) खाऊन शेवटच्या दिवशी रत्नागिरी शहरात प्रयोगाला पोचलो. नेहमीप्रमाणे उकाड्याने जीव हैराण झाला होता. प्रयोग संपला आणि जेवायला दत्त नावाच्या कार्यालयात पोचलो. साधारण दीड-दोन वाजले होते. प्रयोग संपवून घरी परत जायचे होते. म्हणून जे काय असेल ते पोटात ढकलायचं आणि निघायचं एवढं ठरलं होतं. पानं मांडली गेली आणि काय आश्चर्य! ताटात स्वर्ग! उत्तम पडवळ डाळिंब्यांची उसळ, मऊसूत पोळ्या, पंचामृत, टोमॅटोचा रस्सा ताक आणि फणसाच्या बियांची (आठळ्या म्हणतात त्याला.) भाजी.. मस्त शिजलेल्या आठळ्या. साधी फोडणी, साधा गोडा मसाला. वर ओलं खोबरं.. इतकं सुंदर जेवण की, ते उत्तम भटजी नावाचे दत्त उपाहारगृहाचे चालक म्हणाले, ‘अहो! हापूसचा रस आहे माझ्या दारचा तोही खाऊन बघा!’ मी त्यांना म्हणालो ‘उत्तम भटजी! माझ्या घरचा आलोय की खाऊन’. ते ही कोकणातले खट, म्हणाले; ‘प्रत्येक आंब्याचे पान निराळे आणि रसही निराळा’, आग्रहाखातर फक्त चार वाट्या रस प्यायलो. पुढे आठवतं ते इतकंच, मुंबईत सात वाजता आलो. हाताला येणारा आंब्याचा वास संध्याकाळीही दरवळत होता.

टॅग्स :MangoआंबाSanjay Moneसंजय मोने