शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mango: हाताचा आंब्याचा वास संध्याकाळपर्यंत हाेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 12:45 IST

Mango: मागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो.

- संजय मोने, अभिनेतेमागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो. लहानपणी दरवर्षी गावाला जात होतो. माझ्या आईने आमचे सगळे नातेसंबंध जपून ठेवले होते. वडिलांना अमुक एक भाऊ किंवा बहीण आणि इतर नाती असावीत, असा अंदाज असायचा. त्यामुळे कधीतरी ‘अहो! आत्ते नाही मामेभाऊ आहे तुमचा. नाव अशोक नाही सदानंद आहे’, असा आईचा आवाज कानावर पडायचा. त्यावर ‘तोच तो!’, असं बाबा म्हणायचे. आजही तीच परंपरा मी चालवली आहे आणि माझी पत्नी तशीच सुधारणा करत असते. असो! तर रत्नागिरीला प्रयोग होता. मी गावाला गेलो होतो. आता माझी आई हयात नाही; पण माझ्या सगळ्या काकू ती उणीव जाणवू देत नाही. मोठी काकू (तिचे नाव सुधा होते) होती, त्यानंतर शोभाकाकू मग रोहिणीकाकू आणि अनघाकाकू. सगळ्यांचा स्वयंपाक जणू माझ्या आईच्या धाकट्या बहिणी असल्यासारखा उत्कृष्ट आणि एकसाची होता. मी जरा ब्राम्हणी आमटीच्या बाबतीत फारच चिकित्सक आहे; पण सगळ्या काकूसारखी (झेरॉक्स) आमटी करायच्या. दोन दिवस प्रयोग सांभाळून घरचं जेवण झालं. उन्हाळा असल्यामुळे आमरस, घरचा भात, आंबोशीचं लोणचं (हे खायला कोकणातला जन्म असायला लागतो) खाऊन शेवटच्या दिवशी रत्नागिरी शहरात प्रयोगाला पोचलो. नेहमीप्रमाणे उकाड्याने जीव हैराण झाला होता. प्रयोग संपला आणि जेवायला दत्त नावाच्या कार्यालयात पोचलो. साधारण दीड-दोन वाजले होते. प्रयोग संपवून घरी परत जायचे होते. म्हणून जे काय असेल ते पोटात ढकलायचं आणि निघायचं एवढं ठरलं होतं. पानं मांडली गेली आणि काय आश्चर्य! ताटात स्वर्ग! उत्तम पडवळ डाळिंब्यांची उसळ, मऊसूत पोळ्या, पंचामृत, टोमॅटोचा रस्सा ताक आणि फणसाच्या बियांची (आठळ्या म्हणतात त्याला.) भाजी.. मस्त शिजलेल्या आठळ्या. साधी फोडणी, साधा गोडा मसाला. वर ओलं खोबरं.. इतकं सुंदर जेवण की, ते उत्तम भटजी नावाचे दत्त उपाहारगृहाचे चालक म्हणाले, ‘अहो! हापूसचा रस आहे माझ्या दारचा तोही खाऊन बघा!’ मी त्यांना म्हणालो ‘उत्तम भटजी! माझ्या घरचा आलोय की खाऊन’. ते ही कोकणातले खट, म्हणाले; ‘प्रत्येक आंब्याचे पान निराळे आणि रसही निराळा’, आग्रहाखातर फक्त चार वाट्या रस प्यायलो. पुढे आठवतं ते इतकंच, मुंबईत सात वाजता आलो. हाताला येणारा आंब्याचा वास संध्याकाळीही दरवळत होता.

टॅग्स :MangoआंबाSanjay Moneसंजय मोने