शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरीच तयार करा गोड गोड काजू कतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 18:17 IST

बर्फी म्हटलं की, सर्वांच्या तोंडी नाव येतं ते म्हणजे काजू कतलीचं. प्रत्येकाला आवडणारी ही काजू कतली उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. एखाद्या समारंभासाठी किंवा फेस्टिव्ह सिझनसाठी अनेकदा काजू कतली घरी आणण्यात येते.

बर्फी म्हटलं की, सर्वांच्या तोंडी नाव येतं ते म्हणजे काजू कतलीचं. प्रत्येकाला आवडणारी ही काजू कतली उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. एखाद्या समारंभासाठी किंवा फेस्टिव्ह सिझनसाठी अनेकदा काजू कतली घरी आणण्यात येते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? बाजारातून काजू कतली विकत आणण्याऐवजी तुम्ही घरीच काजू कतली तयार करू शकता. जाणून घेऊया काजू कतली तयार करण्याची रेसिपी...

साहित्य :

  • काजूची पावडर 2 कप
  • तूप 2 चमचे
  • अर्धा कप पाणी
  • चांदीचा वर्ख 
  • साखर एक कप
  • दूध 2 चमचे

 

कृती :

- सर्वात आधी काजू मिक्सरमध्ये बारिक करून स्मूथ पावडर तयार करून घ्या. 

- काजूची पेस्ट तयार करण्यासाठी मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यामध्ये पाणी गरम करा. त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून पुर्णपणे विरघळवून घ्या. 

- साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये काजूची पावडर टाका आणि व्यवस्थित एकत्र करा. 

- हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं एकत्र केल्यानंतर घट्ट होऊ लागेल. त्यानंतर लगेच गॅस बंद करा. 

- तयार काजूची पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने त्याचा एक गोळा तयार करून लाटण्याच्या मदतीने लाटून घ्या. एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये लाटलेलं मिश्रण टाका. 

- पूर्णपणे थंड झाल्यानंतर डायमंड शेपमध्ये कापून घ्या.

- गोड गोड काजू कतली खाण्यासाठी तयार आहे. 

टॅग्स :Receipeपाककृती