शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

रसयात्रा : हजारो वर्षांची साखर, तिच्याहून थोरला गूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 10:03 IST

jaggery : उसाचा रस आटून घट्ट झाला की अत्यंत गोड लागतो आणि टिकवून ठेवता येतो. निरीक्षणातून लागलेल्या या शोधामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली.

आज जगात सर्वाधिक घेतलं जाणारं पीक कोणतं ?  - कोणी म्हणेल गहू, मका, बटाटे ; पण उत्तर आहे ऊस ! माणूस मुळात गोडघाशा. प्रागैतिहासिक काळात त्याची गोडाची आवड फळं, मध अशा आयत्या मिळणाऱ्या जिन्नसांवर भागत असावी पण त्याने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर शोधून काढलेले गोड पदार्थ म्हणजे गूळ आणि साखर. ऊस ही गवतवर्गीय वनस्पती मूळची ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेच्या न्यू गिनी बेटावरची आणि तिथेच आठेक हजार वर्षांपूर्वी माणसाला साखरेचा शोध लागला असं मानलं जातं. उसाचा रस आटून घट्ट झाला की अत्यंत गोड लागतो आणि टिकवून ठेवता येतो. निरीक्षणातून लागलेल्या या शोधामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली.

भारतीय उपखंडात उसाच्या आगमना आधीपासूनच गूळ अस्तित्वात होता. पूर्व भारतात म्हणजे आताच्या बंगाल, ओरिसा या प्रांतातल्या लोकांना ताड वर्गीय झाडांच्या चिकापासून स्वादिष्ट गूळ तयार करण्याची कला अवगत होती. याला म्हणत गुड ;, त्यावरूनच या प्रांताला गौड म्हटलं जाऊ लागलं. गोड हा आपला शब्द त्यावरूनच आला. ताडगूळ, खजूरगूळ, पातालीगूळ अशा नावांनी ओळखला जाणारा हा मधूमधुर पदार्थ संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होता. अजूनही आहे. पण हा गूळ तसा कष्टसाध्य आणि सर्वच हवामानात होऊ न शकणारा. 

उसाला मात्र जगभरात अनेक देशातलं वातावरण मानवलं. ऊस शेती जगात सर्वत्र पसरली, भारतातही स्थिरावली. त्याच्या रसापासून शर्करा म्हणजे साखर तयार करण्याचं तंत्र भारतीयांनी तीन-साडेतीन हजार वर्षांपूर्वी विकसित केलं, तिथून अरबस्तानात पसरलं. इजिप्शियनांनी साखरेचे शुभ्र स्फटिक निर्माण करण्यात आघाडी घेतली. सहाव्या शतकापासून आयुर्वेदात आणि जगातल्या इतर वैद्यकशास्त्रात औषधांसाठी साखर पाक वापरणं सुरू झालं.

तरीही, अगदी साताठशे वर्षांपूर्वीपर्यंत रोजच्या आहारात साखरेचा वापर बिलकुल नव्हता. कारण ती अगदी कमी प्रमाणात बनत असे. पण गोडाची चटक लागलेल्या मानवाचा हव्यास प्रचंड वाढला. चौदाव्या शतकानंतर साखरेच्या वाढत्या मागणीमुळे ऊस शेती, साखर कारखाने झपाट्याने वाढत गेले.जगात सर्वत्रच साखरेच्या माधुर्याला आणि चमकदार शुभ्रतेला गुलामगिरी, वेठबिगारी, आर्थिक विषमतेच्या इतिहासाची काळी किनार आहे.

टॅग्स :foodअन्न