शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

रसयात्रा : हजारो वर्षांची साखर, तिच्याहून थोरला गूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 10:03 IST

jaggery : उसाचा रस आटून घट्ट झाला की अत्यंत गोड लागतो आणि टिकवून ठेवता येतो. निरीक्षणातून लागलेल्या या शोधामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली.

आज जगात सर्वाधिक घेतलं जाणारं पीक कोणतं ?  - कोणी म्हणेल गहू, मका, बटाटे ; पण उत्तर आहे ऊस ! माणूस मुळात गोडघाशा. प्रागैतिहासिक काळात त्याची गोडाची आवड फळं, मध अशा आयत्या मिळणाऱ्या जिन्नसांवर भागत असावी पण त्याने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर शोधून काढलेले गोड पदार्थ म्हणजे गूळ आणि साखर. ऊस ही गवतवर्गीय वनस्पती मूळची ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेच्या न्यू गिनी बेटावरची आणि तिथेच आठेक हजार वर्षांपूर्वी माणसाला साखरेचा शोध लागला असं मानलं जातं. उसाचा रस आटून घट्ट झाला की अत्यंत गोड लागतो आणि टिकवून ठेवता येतो. निरीक्षणातून लागलेल्या या शोधामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली.

भारतीय उपखंडात उसाच्या आगमना आधीपासूनच गूळ अस्तित्वात होता. पूर्व भारतात म्हणजे आताच्या बंगाल, ओरिसा या प्रांतातल्या लोकांना ताड वर्गीय झाडांच्या चिकापासून स्वादिष्ट गूळ तयार करण्याची कला अवगत होती. याला म्हणत गुड ;, त्यावरूनच या प्रांताला गौड म्हटलं जाऊ लागलं. गोड हा आपला शब्द त्यावरूनच आला. ताडगूळ, खजूरगूळ, पातालीगूळ अशा नावांनी ओळखला जाणारा हा मधूमधुर पदार्थ संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होता. अजूनही आहे. पण हा गूळ तसा कष्टसाध्य आणि सर्वच हवामानात होऊ न शकणारा. 

उसाला मात्र जगभरात अनेक देशातलं वातावरण मानवलं. ऊस शेती जगात सर्वत्र पसरली, भारतातही स्थिरावली. त्याच्या रसापासून शर्करा म्हणजे साखर तयार करण्याचं तंत्र भारतीयांनी तीन-साडेतीन हजार वर्षांपूर्वी विकसित केलं, तिथून अरबस्तानात पसरलं. इजिप्शियनांनी साखरेचे शुभ्र स्फटिक निर्माण करण्यात आघाडी घेतली. सहाव्या शतकापासून आयुर्वेदात आणि जगातल्या इतर वैद्यकशास्त्रात औषधांसाठी साखर पाक वापरणं सुरू झालं.

तरीही, अगदी साताठशे वर्षांपूर्वीपर्यंत रोजच्या आहारात साखरेचा वापर बिलकुल नव्हता. कारण ती अगदी कमी प्रमाणात बनत असे. पण गोडाची चटक लागलेल्या मानवाचा हव्यास प्रचंड वाढला. चौदाव्या शतकानंतर साखरेच्या वाढत्या मागणीमुळे ऊस शेती, साखर कारखाने झपाट्याने वाढत गेले.जगात सर्वत्रच साखरेच्या माधुर्याला आणि चमकदार शुभ्रतेला गुलामगिरी, वेठबिगारी, आर्थिक विषमतेच्या इतिहासाची काळी किनार आहे.

टॅग्स :foodअन्न