शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वजन कमी करायचंय तर मग हे प्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:15 IST

आहारातलं काहीही कमी जास्त न करताही वजन कमी करणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही पेयं नक्कीच मदत करू शकतात.

ठळक मुद्दे* वजन कमी करण्यात पाण्याची भूमिका मोठी असते.* भाज्या उकडून ते पाणी जि-यामि-याची फोडणी देवून, चवीपुरती मीठ घालून सूप म्हणून पिल्यास त्याचा वजन कमी होण्यास चांगला फायदा होतो.* ग्रीन टी हे वजन नियंत्रित करणारं महत्त्वाचं पेय आहे.जर दिवसातून दोन वेळेस ग्रीन टी पिल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

- माधुरी पेठकर.जगातली सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वजन कमी करणं. वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायामशैलीत जी नियमितता लागते तीच ठेवणं, नियम पाळणं अवघड असतं. वजन कमी करण्याचा संकल्प जास्तीत जास्त चार दिवस टिकू शकतो. पुढे मग ती आपल्या बस की बात होत नाही. आणि वजन घटवणं हे अपूर्ण स्वप्न आणि अतृप्त इच्छाच राहाते.वजन कमी करण्यासाठी अमूक खा, एवढंच खा, तमूक अजिबात खाऊ नका असा नियम लावला की तो पाळणं कठीण होतं. व्यायाम तर नकोसाच वाटतो. हे असं असेल तर वजन कमी होणार कसं?पण आहारातलं काहीही कमी जास्त न करताही वजन कमी करणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही पेयं नक्कीच मदत करू शकतात. 

 

1) पाणी

पाणी हे आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायला नको. पण वजन कमी करण्यातही पाण्याची भूमिका मोठी असते. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन क्रिया व्यवस्थित काम करते. त्यामुळे वजन कमी करण्याचा उपाय म्हणून पाण्याचाही उपाय करता येतो. व्यायामापूर्वी पाणी पिताना ते कोमट आणि त्यात लिंबू पिळून घेतल्यास व्यायामात अधिक फॅटस कमी होतात. 

2) भाज्यांचं सूप

भाज्या उकडून ते पाणी जि-यामि-याची फोडणी देवून, चवीपुरती मीठ घालून सूप म्हणून पिल्यास त्याचा वजन कमी होण्यास चांगला फायदा होतो. एकतर या भाज्या उकडलेल्या पाण्यामध्ये खूप पोषणमूल्यं असतात . आणि जेवणाआधी हे सूप घेतल्यानं जेवणं करताना आपोआपच ते मर्यादित प्रमाणात घेतलं जातं. 

 

3) ग्रीन टी

ग्रीन टी हे वजन नियंत्रित करणारं महत्त्वाचं पेय आहे. हा चहा पिल्यानं शरीरातील साखर नियंत्रित राहाते. जर दिवसातून दोन वेळेस ग्रीन टी पिल्यास त्याचा उत्तम फायदा होतो. ग्रीन टी पिल्यानं केवळ वजनच नियंत्रित राहातं असं नाही तर ग्रीन टीमधले घटक आपल्या शरीराचं वेगवेगळ्या रोगापासून संरक्षण करतं. तसेच आपली रोगप्रतिकाराशक्तीही वाढवते. 

 

4) भाज्यांचं ज्यूस.

जो फायदा भाज्यांच्या सूपमुळे शरीरास मिळतो तोच फायदा भाज्यांचं ज्यूस प्यायल्यानं मिळतो. त्यामुळे भाज्यांचं सूप हे पावसाळा आणि हिवाळ्याच्या काळात प्यावं तर भाज्यांचं ज्यूस हे उन्हाळ्यात प्यावं. भाज्यांचं ज्यूस घेताना त्यात सोडियमचं प्रमाण जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. 

 

 

5) कोरी कॉफीअनेकदा पोट बिघडल्यानंतर कोरी कॉफी घेतात. पण हीच कोरी कॉफी वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. को-या कॉफीमुळे चयापचय क्रिया सुधारते. को-या कॉफीनं चरबी वेगानं कमी होते. तसेच को-या कॉफीमुळे जास्त उष्मांक जळतात. बैठी जीवनशैली असल्यास वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कोरी कॉफी ही उत्तमच. पण कोरी कॉफी जर उपाशी पोटी घेतल्यास किंवा दोन पेक्षा जास्त वेळी घेतल्यास त्याचा चयापचयक्रियेवर नकारात्मक परिणाम होवू शकतो. 

 

 

6) सायविरहित दूध.

सायविरहित दूध प्यायल्यानं शरीरास दूध पिण्याचे जे फायदे मिळायचे असतात ते मिळतात. शरीरास आवश्यक असे प्रोटीन मिळतात. हाड मजबूत करणारी जीवनसत्त्वं मिळतात. शिवाय साय नसल्यानं वजन वाढवणारे उष्मांक मिळत नाही.