शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलासरखी भाजी घरी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 17:48 IST

हॉटेलसारखं जेवण तयार करणं म्हणजे जणू काही परीक्षाच. पण ही परीक्षा सोपी करण्याच्या युक्त्या आहेत. त्या स्वयंपाक करताना वापरल्या की प्रत्येक भाजी हॉटेलसारखी झक्कास झालीच म्हणून समजा!

ठळक मुद्दे* ग्रेव्ही व्यवस्थित उकळू देणे, ही देखील महत्वाची बाब आहे.* धने-जिरे हा भारतीय मसाल्यांचा तसाच हॉटेलमधील भाज्यांकरिता वापरण्यात येणा-या मसाल्यांचा आत्मा आहे असं म्हटलं तर हरकत नाही. यांच्याजोडीला आलं-लसूण-कांदा हे त्रिकूट असायलाच हवं.* मसाल्याकरिता जे घटक वापराल, ते ताजे असावेत. तरच त्याची चव चांगली येईन.

 

- सारिका पूरकर-गुजराथीचटकदार, तेजतर्रार जेवण म्हटलं की लगेचच हॉटेल, ढाब्यावर खाल्लेली शेवभाजी, डालतडका, पनीर मसाला, व्हेज कोफ्ता, मिक्स व्हेज, कोल्हापूरी व्हेज , पातोड्याची आमटी डोळ्यासमोर तरळते. वास्तविक हे पदार्थ घरोघरी देखील बनवले जातात. मात्र, बनवायला घेतले की प्रत्येकाची फर्माइश, इच्छा असते की ती भाजी, आमटी किंवा करी ही हॉटेलसारखी व्हायला हवी. चवीला आणि रंगालासुद्धा अगदी हॉटेलसारखीच असेल तर खायला मज्जा येणार नाही तर अजिबात नाही. त्यामुळे हॉटेलसारखं जेवण तयार करणं म्हणजे जणू काही परीक्षाच. पण ही परीक्षा सोपी करण्याच्या युक्त्या आहेत. त्या स्वयंपाक करताना वापरल्या की प्रत्येक भाजी हॉटेलसारखी झक्कास झालीच म्हणून समजा!

 

हॉटेलसारख्या चवीसाठी1) बेसिक घटक :- धने-जिरे हा भारतीय मसाल्यांचा तसाच हॉटेलमधील भाज्यांकरिता वापरण्यात येणा-या मसाल्यांचा आत्मा आहे असं म्हटलं तर हरकत नाही. यांच्याजोडीला आलं-लसूण-कांदा हे त्रिकूट असायलाच हवं. या मसाल्यांच्या यादीत आता एक नाव घाला ते म्हणजे साखर. होय, लालबुंद ग्रेव्हीत कशाला हवी साखर? तर मसाल्याचा झणझणीतपणा आणि रश्यातील मीठाची चव कमी करण्यासाठी म्हणून अगदी थोडी साखर प्रत्येक ग्रेव्हीत वापरली जाते. काही ग्रेव्हींमध्ये वेलची आणि हळदही वापरली जाते. ती देखील ट्राय करून पाहायला हवी.

2) लक्षात ठेवावं असं - मसाल्याकरिता जे घटक वापराल, ते ताजे असावेत. तरच त्याची चव चांगली येईन. तुम्ही जर मसाल्यांची पावडर वापरत असाल तर त्या हवाबंद डब्यात भरलेल्या असाव्यात, जेणेकरु न त्यांचा सुगंध कायम राहील. काही मसाले भरड, काही बारीक पूड तर काही अख्खे वापरले जातात. यामुळे पदार्थाला वेगळी चव, वेगळं टेक्श्चर येतं. मसाले फोडणीत घातल्यावर ते व्यवस्थित शिजू द्या तरच त्याचा फ्लेवर पदार्थात उतरेल. कांदा-लसूण नेहमी ताजेच वापरा. पेस्ट करून ठेवू नका. कोणत्याही ग्रेव्हीत, भाजीत मीठ शेवटी म्हणजेच ती पूर्ण उकळल्यावर घाला. एरवी आपण सुरुवातीलाच मीठ घालून मोकळे होतो पण तसं करू नये. काही भाज्यांची ग्रेव्ही जरा सैलसर चांगली लागते. ती पातळ करण्यासाठी पाण्याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक वापरा. यामुळे ग्रेव्हीला छान चव आणि सुगंध येतो.

 

3) शिजवण्याची पद्धत :- ग्रेव्ही व्यवस्थित उकळू देणे, ही देखील महत्वाची बाब आहे. रस्सा किंवा ग्रेव्ही चांगली झाल्याची एक टेस्ट आहे. ती म्हणजे, रस्सा/ ग्रेव्ही उकळून तिच्यावर तेलाचा तवंग दिसू लागला किंवा तिला तेल सुटू लागलं की समजावं रस्सा तयार आहे. त्यापूर्वी ती ग्रेव्ही/ रस्सा हा पूर्णपणे शिजलेला नसतो हे लक्षात असू द्यावा

4) रिचनेस वाढवा - काही शाही पदार्थांसाठी ( शाही कोफ्ता करी, काजू करी ) फेटलेली साय ग्रेव्हीत घातली जाते. जर फेटलेली साय वापरत असाल तर ती पदार्थ थोडा थंड झाल्यावर मग घाला. कारण फोडणीत ती घातली तर ती जळून कडवट चव येते. तसेच काही पदार्थांमध्ये काजूची पेस्ट घातली जाते. ही पेस्ट मात्र तेलात तेल सुटेपर्यंत परतून घ्यावी तरच ग्रेव्हीला चांगला दाटपणा येतो. कांद्याची पेस्ट वापरत असाल तर ती देखील चांगली शिजू द्यायला हवी. त्याकरिता किंचित मीठ घालून ती परतावी, म्हणजे मऊ होते.

 

5) वेगळे घटकही वापरा :- प्रत्येक रश्यासाठी टोमॅटो-कांदा वापरलाच पाहिजे असं नाहीये. साधी हिंग-मोहरीची फोडणी, आलं-हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस आणि कुस्करलेला बटाटा वापरूनही रस्सा चवदार होतो.

6) कुकरचा वापर करा :- छोले, राजमा यासारख्या उसळी शिजवण्यासाठी कूकरचा वापर करून योग्य प्रमाणात शिजवून घ्याव्यात. बोटचेपे होईपर्यंत शिजवायला हवेत. विविध पदार्थांसाठी शिजवण्याचा कालावधी वेगळा असतो. ते लक्षात घेऊन कूकर वापरावा.