शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंजीर : फळ कसे, हे तर फुलच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:06 IST

Fig : अंजिराचा उल्लेख बायबलमध्येही आहे. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हने जेव्हा गार्डन ऑफ ईडन सोडले, तेव्हा स्वतःचे शरीर झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा वापर केला. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या कथेतही अंजिराचा उल्लेख आहे.

जगातले सगळ्यात प्राचीन फळ कुठले? असा प्रश्न विचारला तर प्रामुख्याने ज्या फळाचे नाव घेतले जाते, ते फळ म्हणजे अंजीर. वड, पिंपळ, उंबर आणि अंजीर ही एकाच वंशातील फळे. आदीमानवाने अंजिराची लागवड सुरू केली. त्याच्या लक्षात आले की, हे झाड लावायला सोपे आहे. अंजिराची झाडे लावताना बियांची गरज लागत नव्हती. एक फांदी तोडून लावली की झाड रुजत होते. हे फळ आदीमानवाला आवडले. त्याने त्याची लागवड सुरू केली.

अंजिराचा उल्लेख बायबलमध्येही आहे. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हने जेव्हा गार्डन ऑफ ईडन सोडले, तेव्हा स्वतःचे शरीर झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा वापर केला. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या कथेतही अंजिराचा उल्लेख आहे. सुरूवातीला आशियाई खंडात लागवड झालेल्या या फळाने रोमन साम्राज्यात फार महत्त्वाचे स्थान पटकावले, इतके की रोमन झेंड्यावर अंजिराची पाने होती. रोमन लोक अंजिराला बाचूस किंवा मदिरा आणि मादकतेच्या देवाकडून माणसाला मिळालेली भेट मानत. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून सुरू झालेली अंजिराची आवड आजही कायम आहे.  

एकेकाळी अंजिराला गरीब माणसाचे ‘सुपरफूड’ मानण्यात येत असे. रोमन आणि ग्रीक साम्राज्यात गुलामांसाठी जे जेवण तयार होत असे, त्यात अंजिराचे प्रमाण खूप असे. कारण त्याचे पोषणमूल्य खूप आहे याची जाणीव त्याकाळच्या लोकांना झाली होती. गुलामांच्या खडतर आयुष्यात हे सुपरफूड त्यांना मजबूत बनवी. मराठी विश्वकोशानुसार, अंजिराचे पोषणमूल्य उच्च असते. त्यापासून कॅल्शिअम मिळते. तसेच यात फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन (अ जीवनसत्त्व) आणि क जीवनसत्त्व असते.

इतर कोणत्याही फळापेक्षा अंजिरात तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जड असेल तर अंजिराचा समावेश आहारात करायला हवाच. अंजीर ॲन्टिऑक्सिडंट म्हणूनही फार उपयोगी आहे. भारतासह पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान वगैरे देशांत मोठ्या प्रमाणात अंजिराचे पीक घेतले जाते. गंमत म्हणजे मानवी इतिहासातले हे पहिले फळ तांत्रिकदृष्ट्या फळच नाही. एक अंजीर म्हणजे हजार कलिका आहेत, बाहेरच्या बाजूला न फुलता, आतल्या आत राहिलेल्या!

टॅग्स :foodअन्न