शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

शिजवू नका कच्चं खा!

By madhuri.pethkar | Updated: January 3, 2018 19:12 IST

अन्न विविध प्रकारे शिजवण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थातल्या मूळ घटकांचं थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असतं. ब्रोकोली, पालेभाज्या, बेरी फळं, सुकामेवा, पेरू , मोड आलेली कडधान्यं हे पदार्थ कच्चे खाणं जास्त फायदेशीर असतात.

ठळक मुद्दे* ब्रोकोली फ्लॉवरसारखी उकळली तर त्यातलं 70 टक्के सफ्लोराफेन नष्ट होतं.* सुक्या खोब-यात किंवा डेसिकेटेड नारळात ओल्या नारळाची तत्त्वं शिल्लक राहात नाही.* भाजण्याच्या प्रक्रियेमध्ये सुकामेव्यातील लोह, खनिजं आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे घ्टक निघून जातात. त्यामुळे सुकामेवा तसाच खाणं उत्तम.

-माधुरी पेठकरशिजवलेलं अन्न हा शरीराच्या पोषणाचा मुख्य मार्ग आहे. उकळणं, वाफवणं, तळणं, भाजणं, परतवणं अशा विविध प्रक्रियेतून तयार होणारं अन्न आपण रोज खातो. पण सर्वच पदार्थ हे यापध्दतीनं शिजवलेले असायला हवेत असं नाही. काही पदार्थ हे कच्चे खाल्ले तर शरीराला जास्त पोषक घटक मिळतात. त्या पदार्थातले पोषक घटक कोणतीही हानी न होता थेट शरीरापर्यंत पोहोचतात.अन्न विविध प्रकारे शिजवण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थातल्या मूळ घटकांचं थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असतं. पण काही पदार्थ असे आहेत की त्यावर वाफवणे, उकळवणे, भाजणे, तळणे अशा काही प्रक्रिया केल्या तर त्यांच्यातल्या पोषण मूल्यांची खूपच हानी होते. जसे ब्रोकोली, पालेभाज्या, बेरी फळं, सुकामेवा, पेरू , मोड आलेली कडधान्यं हे पदार्थ कच्चे खाणं जास्त फायदेशीर असतात.

ब्रोकोली

या हिरव्यागार भाजीत क जीवनसत्त्वं आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय सल्फोराफेन नावाचा महत्त्वाचा घटक असतो जो हदययाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.जर ब्रोकोली फ्लॉवरसारखी उकळली तर त्यातलं 70 सफ्लोराफेन नष्ट होतं.त्यामुळे ब्रोकोली कच्ची खाणं जास्त उपयुक्त असतं.

 

 

ओलं खोबरं

ओल्या नारळात इलेक्ट्रोलाइटस असतात. ओल्या नारळात उपयुक्त आणि फायदेशीर फॅटस असतात. सुक्या  खोब-यात किंवा डेसिकेटेड नारळात ओल्या नारळाची तत्त्वं शिल्लक राहात नाही. त्यामुळे ओलं नारळ तसंच खावं.

 

सिमला मिरची

लाल पिवळ्या आणि हिरव्या सिमला मिरचीत क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. 375 अंश सेल्सिअसच्या तापमानावर जर सिमला मिरची शिजवली तर त्यातली सर्व पोषणमूल्य नष्ट होतात. आणि क जीवनसत्त्व तर उष्णतेला अतीसंवेदनशील असतं.

 

बेरी फळं

ओल्या बेरी फळांमध्ये रसाच्या स्वरूपात मोठा प्रमाणात पोषक तत्त्वं आणि खनिजं असतात. ही बेरी फळं वाळवली तर ही जीवनसत्त्वं आणि खनिजं कमी होतात.

 

सुकामेवा

काजू, बदाम, पिस्ते हे खारवलेल्या स्वरूपात खायला अनेकांना आवडतं. पण हे खारवताना त्यांना भाजलं जातं. भाजण्याच्या प्रक्रियेमध्ये सुकामेव्यातील लोह, खनिजं आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे घ्टक निघून जातात. त्यामुळे सुकामेवा तसाच खाणं उत्तम.

 

पेरूपेरू कच्चा खाणं जास्त चांगल. पेरूचे पदार्थ बनवताना पेरूवर शिजवण्याची प्रक्रिया केली जाते. पेरूचे पदार्थ लागतात उत्तम पण त्यात रसरूपात असलेली पोषक मूल्यं उडून जातात. म्हणूनच कच्चा किंवा पिकलेला पेरू खाणंच उत्तम.

 

मोड आलेल्या उसळी

मोड आलेल्या उसळींमध्ये क जीवनसत्त्वं, फायबर, तांबं, मॅग्नीजसारखी खनिजं असतात. शिजवण्याच्या प्रक्रियेत या घटकांचा नाश होतो. मोड आलेल्या उसळी कच्च्या खायला हव्यात.