शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शिजवू नका कच्चं खा!

By madhuri.pethkar | Updated: January 3, 2018 19:12 IST

अन्न विविध प्रकारे शिजवण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थातल्या मूळ घटकांचं थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असतं. ब्रोकोली, पालेभाज्या, बेरी फळं, सुकामेवा, पेरू , मोड आलेली कडधान्यं हे पदार्थ कच्चे खाणं जास्त फायदेशीर असतात.

ठळक मुद्दे* ब्रोकोली फ्लॉवरसारखी उकळली तर त्यातलं 70 टक्के सफ्लोराफेन नष्ट होतं.* सुक्या खोब-यात किंवा डेसिकेटेड नारळात ओल्या नारळाची तत्त्वं शिल्लक राहात नाही.* भाजण्याच्या प्रक्रियेमध्ये सुकामेव्यातील लोह, खनिजं आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे घ्टक निघून जातात. त्यामुळे सुकामेवा तसाच खाणं उत्तम.

-माधुरी पेठकरशिजवलेलं अन्न हा शरीराच्या पोषणाचा मुख्य मार्ग आहे. उकळणं, वाफवणं, तळणं, भाजणं, परतवणं अशा विविध प्रक्रियेतून तयार होणारं अन्न आपण रोज खातो. पण सर्वच पदार्थ हे यापध्दतीनं शिजवलेले असायला हवेत असं नाही. काही पदार्थ हे कच्चे खाल्ले तर शरीराला जास्त पोषक घटक मिळतात. त्या पदार्थातले पोषक घटक कोणतीही हानी न होता थेट शरीरापर्यंत पोहोचतात.अन्न विविध प्रकारे शिजवण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थातल्या मूळ घटकांचं थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असतं. पण काही पदार्थ असे आहेत की त्यावर वाफवणे, उकळवणे, भाजणे, तळणे अशा काही प्रक्रिया केल्या तर त्यांच्यातल्या पोषण मूल्यांची खूपच हानी होते. जसे ब्रोकोली, पालेभाज्या, बेरी फळं, सुकामेवा, पेरू , मोड आलेली कडधान्यं हे पदार्थ कच्चे खाणं जास्त फायदेशीर असतात.

ब्रोकोली

या हिरव्यागार भाजीत क जीवनसत्त्वं आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय सल्फोराफेन नावाचा महत्त्वाचा घटक असतो जो हदययाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.जर ब्रोकोली फ्लॉवरसारखी उकळली तर त्यातलं 70 सफ्लोराफेन नष्ट होतं.त्यामुळे ब्रोकोली कच्ची खाणं जास्त उपयुक्त असतं.

 

 

ओलं खोबरं

ओल्या नारळात इलेक्ट्रोलाइटस असतात. ओल्या नारळात उपयुक्त आणि फायदेशीर फॅटस असतात. सुक्या  खोब-यात किंवा डेसिकेटेड नारळात ओल्या नारळाची तत्त्वं शिल्लक राहात नाही. त्यामुळे ओलं नारळ तसंच खावं.

 

सिमला मिरची

लाल पिवळ्या आणि हिरव्या सिमला मिरचीत क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. 375 अंश सेल्सिअसच्या तापमानावर जर सिमला मिरची शिजवली तर त्यातली सर्व पोषणमूल्य नष्ट होतात. आणि क जीवनसत्त्व तर उष्णतेला अतीसंवेदनशील असतं.

 

बेरी फळं

ओल्या बेरी फळांमध्ये रसाच्या स्वरूपात मोठा प्रमाणात पोषक तत्त्वं आणि खनिजं असतात. ही बेरी फळं वाळवली तर ही जीवनसत्त्वं आणि खनिजं कमी होतात.

 

सुकामेवा

काजू, बदाम, पिस्ते हे खारवलेल्या स्वरूपात खायला अनेकांना आवडतं. पण हे खारवताना त्यांना भाजलं जातं. भाजण्याच्या प्रक्रियेमध्ये सुकामेव्यातील लोह, खनिजं आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे घ्टक निघून जातात. त्यामुळे सुकामेवा तसाच खाणं उत्तम.

 

पेरूपेरू कच्चा खाणं जास्त चांगल. पेरूचे पदार्थ बनवताना पेरूवर शिजवण्याची प्रक्रिया केली जाते. पेरूचे पदार्थ लागतात उत्तम पण त्यात रसरूपात असलेली पोषक मूल्यं उडून जातात. म्हणूनच कच्चा किंवा पिकलेला पेरू खाणंच उत्तम.

 

मोड आलेल्या उसळी

मोड आलेल्या उसळींमध्ये क जीवनसत्त्वं, फायबर, तांबं, मॅग्नीजसारखी खनिजं असतात. शिजवण्याच्या प्रक्रियेत या घटकांचा नाश होतो. मोड आलेल्या उसळी कच्च्या खायला हव्यात.