शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाला पाणी सुटेल असं पाणीपुरी पुराण! कुठे पुचका, कुठे गोलगप्पा तर कुठे पानीपुरी; 'सहिष्णू' पदार्थाची रसरशीत स्टोरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:55 IST

टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही.

>> शुभा प्रभू-साटम

मनुष्य प्राण्याचा आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास पाहिला तर त्यातून खाद्यसंस्कृतीला वेगळं काढता येत नाही. मानवाची ही खाद्ययात्रा रंजक आहे. तिला इतिहास तर आहेच, पण भूगोलही आहे. या सदरातून त्याचा पाक्षिक वेध घेतला जाईल.......

आज खाण्यापिण्याचे जे करोडो प्रकार आहेत त्यांचा पूर्वज कोण? म्हंजे आता पाणीपुरी घ्या.. उगा पुरणपोळी आणि मोदक अशा पदार्थांचे शिवधनुष्य नको हा दिसायला टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही. भले जगातील अद्वितीय पदार्थांचे स्टॉल असोत या पदार्थांचा ठसका कमी होत नाही. लोक प्रथम तिची काही आवर्तने करून मग मुख्य यज्ञकर्माला सुरुवात करतात. नवे सदर आहे आणि त्याची बोहोनी पाणीपुरी या पदार्थाने करतेय. 

पु.ल. यांचे चिरोट्यांबद्दल मत माहीत नसेल असा मध्यमवयीन मराठी माणूस नसावा. खारी बिस्कीट फसले. त्यावर साखर घालून चतुर गृहिणीने नवऱ्याला बनवले... तसे काही पुरीबाबत झाले असावे, असा माझा चवदार अंदाज आहे. म्हंजे पुरी बेत ठरला असावा, पण काही पुऱ्या स्वतंत्र कणखर व्यक्तिमत्त्वाच्या निघून मोडेन; पण वाकणार नाही या भावनेने फुगून राहिल्या असाव्यात. पुरी कोडे इथे थोडे सुटले, पण मग त्याची जोडी भूतलावरील त्या अमृततुल्य पाण्याशी कशी कोणी जुळवली? मुळात असे पाणी करायचे हे कसे सुचले? 

जगातील अनेक चविष्ट पदार्थांचे उगम किंवा जन्म अपघाताने झाले असे मानले जाते. हे काहीअंशी खरे आहे, पण पाणीपुरी हा अपघाती पदार्थ नसावा. कोणीतरी इरसाल, आंबटशौकीन व्यक्तीने याची निर्मिती केली असावी... आणि तो माणूस अनिकेत मुसाफिर असणार. कारण या पदार्थाचा बेस किंवा मूळ अगदी सुटसुटीत आहे. परत मागणीनुसार बदल होतो. तिखा जादा चाहिए... मिळेल! तिखा मिठा बराबर... मिळेला खट्टा बढाओ... वाढतो। पाणी ज्यादा, रगडा कम... होते. स्वयंपाकघरात शिजलेला कोणताही पदार्थ इतका सहिष्णू नसतो. आमटी जरा अधिक पातळ हवी, मिळेल का विचारून बघा... लंघन करण्याचा अनुभव न मागता मिळेल. 

मुद्दा असा की पूर्ण भारतात हा पदार्थ जबरदस्त लोकप्रिय; पण इतिहास मात्र अस्पष्ट. अर्थात त्याने काही फरक पडत नाही म्हणा. तशी मी कट्टर मुंबईकर. पण पाणीपुरी खावी ती कोलकात्यात या मताची. भेळ मुंबईची, विषय संपला, पण पुचका/पाणीपुरीबाबतीत कोलकाता अनभिषिक्त सम्राट. एकतर पुन्या अगडबंब... डेंटिस्टने त्या आपल्याकडे ठेवाव्यात... पार टॉन्सिल दिसतील असे तोंड उघडावे लागते, ते पण राजीखुशीने. आणि ते पाणी... सागर मंथनातून आलेले अमृत आणि सुरा यात दानवांनी सुरा का निवडली हे उमगते. प्रथम थोडे आंबट, मग हलके गोड आणि पुरी गिळता गिळता सणसणीत तिखट.. काय अ‌द्भुत मिश्रण असते राव! दिल्लीमधील गोलगप्पे पुन्हा वेगळे.... इथे मध्यम मार्ग नाही. अगदी साउथ दिल्लीतील अथवा खान मार्केट गैंगपण तिखट आंबटगोड या क्रमाने असणारे पाणी ओरपत असते. मुंबईमधील पाणीपुरी तशी मवाळ. मुंबईसारखी सहिष्णू... मागणी तसा पुरवठा. बाकी भारतात पण पाणीपुरी मिळते; पण ही तीन शहरे बिनीचे शिलेदार. 

तर मूळ मुद्दा काय होता? पदार्थांचा उगम कसा, कुठे कधी झाला? मी उत्तर शोधतेय... तोपर्यंत तुम्ही खायची आवर्तन सुरू ठेवा. आणि हो... यज्ञयाग संपला की सुकी पुरी विसरू नका... अलिखित हक्क असतो तो आपला!