शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

तोंडाला पाणी सुटेल असं पाणीपुरी पुराण! कुठे पुचका, कुठे गोलगप्पा तर कुठे पानीपुरी; 'सहिष्णू' पदार्थाची रसरशीत स्टोरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:55 IST

टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही.

>> शुभा प्रभू-साटम

मनुष्य प्राण्याचा आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास पाहिला तर त्यातून खाद्यसंस्कृतीला वेगळं काढता येत नाही. मानवाची ही खाद्ययात्रा रंजक आहे. तिला इतिहास तर आहेच, पण भूगोलही आहे. या सदरातून त्याचा पाक्षिक वेध घेतला जाईल.......

आज खाण्यापिण्याचे जे करोडो प्रकार आहेत त्यांचा पूर्वज कोण? म्हंजे आता पाणीपुरी घ्या.. उगा पुरणपोळी आणि मोदक अशा पदार्थांचे शिवधनुष्य नको हा दिसायला टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही. भले जगातील अद्वितीय पदार्थांचे स्टॉल असोत या पदार्थांचा ठसका कमी होत नाही. लोक प्रथम तिची काही आवर्तने करून मग मुख्य यज्ञकर्माला सुरुवात करतात. नवे सदर आहे आणि त्याची बोहोनी पाणीपुरी या पदार्थाने करतेय. 

पु.ल. यांचे चिरोट्यांबद्दल मत माहीत नसेल असा मध्यमवयीन मराठी माणूस नसावा. खारी बिस्कीट फसले. त्यावर साखर घालून चतुर गृहिणीने नवऱ्याला बनवले... तसे काही पुरीबाबत झाले असावे, असा माझा चवदार अंदाज आहे. म्हंजे पुरी बेत ठरला असावा, पण काही पुऱ्या स्वतंत्र कणखर व्यक्तिमत्त्वाच्या निघून मोडेन; पण वाकणार नाही या भावनेने फुगून राहिल्या असाव्यात. पुरी कोडे इथे थोडे सुटले, पण मग त्याची जोडी भूतलावरील त्या अमृततुल्य पाण्याशी कशी कोणी जुळवली? मुळात असे पाणी करायचे हे कसे सुचले? 

जगातील अनेक चविष्ट पदार्थांचे उगम किंवा जन्म अपघाताने झाले असे मानले जाते. हे काहीअंशी खरे आहे, पण पाणीपुरी हा अपघाती पदार्थ नसावा. कोणीतरी इरसाल, आंबटशौकीन व्यक्तीने याची निर्मिती केली असावी... आणि तो माणूस अनिकेत मुसाफिर असणार. कारण या पदार्थाचा बेस किंवा मूळ अगदी सुटसुटीत आहे. परत मागणीनुसार बदल होतो. तिखा जादा चाहिए... मिळेल! तिखा मिठा बराबर... मिळेला खट्टा बढाओ... वाढतो। पाणी ज्यादा, रगडा कम... होते. स्वयंपाकघरात शिजलेला कोणताही पदार्थ इतका सहिष्णू नसतो. आमटी जरा अधिक पातळ हवी, मिळेल का विचारून बघा... लंघन करण्याचा अनुभव न मागता मिळेल. 

मुद्दा असा की पूर्ण भारतात हा पदार्थ जबरदस्त लोकप्रिय; पण इतिहास मात्र अस्पष्ट. अर्थात त्याने काही फरक पडत नाही म्हणा. तशी मी कट्टर मुंबईकर. पण पाणीपुरी खावी ती कोलकात्यात या मताची. भेळ मुंबईची, विषय संपला, पण पुचका/पाणीपुरीबाबतीत कोलकाता अनभिषिक्त सम्राट. एकतर पुन्या अगडबंब... डेंटिस्टने त्या आपल्याकडे ठेवाव्यात... पार टॉन्सिल दिसतील असे तोंड उघडावे लागते, ते पण राजीखुशीने. आणि ते पाणी... सागर मंथनातून आलेले अमृत आणि सुरा यात दानवांनी सुरा का निवडली हे उमगते. प्रथम थोडे आंबट, मग हलके गोड आणि पुरी गिळता गिळता सणसणीत तिखट.. काय अ‌द्भुत मिश्रण असते राव! दिल्लीमधील गोलगप्पे पुन्हा वेगळे.... इथे मध्यम मार्ग नाही. अगदी साउथ दिल्लीतील अथवा खान मार्केट गैंगपण तिखट आंबटगोड या क्रमाने असणारे पाणी ओरपत असते. मुंबईमधील पाणीपुरी तशी मवाळ. मुंबईसारखी सहिष्णू... मागणी तसा पुरवठा. बाकी भारतात पण पाणीपुरी मिळते; पण ही तीन शहरे बिनीचे शिलेदार. 

तर मूळ मुद्दा काय होता? पदार्थांचा उगम कसा, कुठे कधी झाला? मी उत्तर शोधतेय... तोपर्यंत तुम्ही खायची आवर्तन सुरू ठेवा. आणि हो... यज्ञयाग संपला की सुकी पुरी विसरू नका... अलिखित हक्क असतो तो आपला!