शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

हिवाळ्यात त्वचा उत्तम ठेवायचीय असेल तर आधी आपल्या ताटाकडे पाहा!

By madhuri.pethkar | Updated: January 11, 2018 18:50 IST

हिवाळ्यात त्वचा उत्तम ठेवण्यासाठी आपला आहार खूप मदत करतो. हिवाळ्यात त्वचेचं नुकसान होवू नये यासाठी आपला आहारही हिवाळ्याचा सामना करण्यास पूरक असायला हवा. त्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही आहारीय घटकांचा समावेश आवर्जून करायला हवा.

ठळक मुद्दे* हिवाळा सुरू झाला की दूध आणि दूधाचे पदार्थ जास्त प्रमाणात आहारात असायला हवेत.* हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार भाज्यांची बहार असते. बाजारात जेवढ्या प्रकारच्या भाज्या मिळतात त्या सर्व पोटात जायलाच हव्यात.* दूध, फळं, भाज्या, सुकामेवा यासोबतच त्वचेसासाठी ओमेगा 3 हेही खूप महत्त्वाचं असतं.

- माधुरी पेठकरहिवाळ्यात त्वचा खराब होते हे खरं असलं तरी हे अर्धसत्य आहे. कारण हिवाळ्यात त्वचा खराब व्हायलाच हवी असं मात्र नाही. हिवाळ्यात आपली त्वचा जर जास्तच शुष्क, खडबडीत , खाजरी होत असेल तर आधी आपण काय खातो याचा जरा विचार करायला हवा.

हिवाळ्यात त्वचा उत्तम ठेवण्यासाठी आपला आहार खूप मदत करतो. हिवाळ्यात त्वचेचं नुकसान होवू नये यासाठी आपला आहारही हिवाळ्याचा सामना करण्यास पूरक असायला हवा. 

 

हिवाळ्यात काय खाल?1) हिवाळा सुरू झाला की दूध आणि दूधाचे पदार्थ जास्त प्रमाणात आहारात असायला हवेत. दुधासोबतच चीज, बटर, ताजं फळांचं योगर्ट, पनीर हे पदार्थ हिवाळ्यात खाणं आवश्यक आहे.

2) सुका मेवा खायलाच हवा. हिवाळा संपेपर्यंत सुकामेवा न चुकता खायला हवा. यासाठी एक सोपा प्रयोग करावा. दर आठवड्याला एका डब्यात सर्व प्रकारचा सुकामेवा तुकडे करून एकत्र करून ठेवावा. आणि सात दिवस तो न चुकता खावा. हिवाळ्यात 7-8 बदाम, 2 अंजीर आणि 5 आक्रोड हे खायलाच हवेत.

3) हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार भाज्यांची बहार असते. बाजारात जेवढ्या प्रकारच्या भाज्या मिळतात त्या सर्व पोटात जायलाच हव्यात. पालक, ब्रोकोली, घेवडा, मटार, मेथी, सेलेरी, लेट्यूस हे सर्व आपल्या आहारात असण्याचा नियम हिवाळ्यात प्रत्येकानं पाळायला हवा.

 

4) रसदार फळं खाल्ल्याचा उपयोग त्वचा छान ओलसर राहण्यास होतो. दिवसातून फळांच्या किमान तीन फोडी खायला हव्यात. किंवा मग एक सफरचंद/ एक संत्री/ वाटीभर डाळिंबाचे दाणे/ वाटीभर पपईच्या फोडी यापैकी एक काहीही खाल्लं तरी त्वचेच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.

5 ) दूध, फळं, भाज्या, सुकामेवा यासोबतच त्वचेसासाठी ओमेगा 3 हेही खूप महत्त्वाचं असतं. जवसामधून ते मोठ्या प्रमाणात मिळतं. हिवाळ्यात चिमूटभर जवस रोज खायला हवेत. नुसते खायला आवडत नसतील तर उपमा, दलिया यांच्यावर भुरभूरून खाल्ले तरी चालतील.

 

 

6) त्वचेच्या आरोग्यासाठी पाणी पिण्याचं महत्त्वं हिवाळ्यातही कमी होत नाही. पाणी हे त्वचेसाठी अमृतासारखं आहे. हिवाळा आहे तहान लागत नाही ही सबब सांगून जर आपण पाणी कमी पित असू तर त्याचं मोठं नुकसान हिवाळ्यासारख्या कोरड्या थंड ॠतूत त्वचेला सहन करावं लागतं. कडाक्याच्या थंडीत त्वचा रसरशीत, ओलसर ठेवण्यासाठी रोज 8- 10 ग्लास पाणी प्यायलाच हवं.