लग्नानंतर ऐश्वर्या नारकर यांनी बदललं नाव, त्यांचं खरं नाव माहितीये का?

By कोमल खांबे | Updated: April 29, 2025 18:21 IST2025-04-29T18:17:17+5:302025-04-29T18:21:26+5:30

अभिनेत्रीचं ऐश्वर्या नारकर हे खरं नाव नाही. लग्नानंतर त्यांनी नाव बदललं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्यांनी केला.

ऐश्वर्या नारकर या आजही त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. रुपाची खाण असलेल्या ऐश्वर्या म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्यवतीच.

पण, अभिनेत्रीचं ऐश्वर्या नारकर हे खरं नाव नाही. लग्नानंतर त्यांनी नाव बदललं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्यांनी केला.

लग्नानंतर अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या यांचं नाव बदललं होतं. मात्र हे नाव अविनाश यांनी नव्हे तर त्यांच्या बहिणीने त्यांना सांगितलं होतं.

"माझ्या बहिणीला ऐश्वर्या राय आवडायची. त्यामुळे तिने मला सांगितलं होतं की ऐश्वर्या असं नाव ठेव", असं अविनाश नारकर म्हणाले.

आत्तापर्यंत जे अस्तित्व होतं ते वेगळं होणारे, वेगळी ओळख मिळणारे याची सुरुवात नावापासूनच होऊ दे या उद्देशाने ऐश्वर्या यांनी लग्नानंतर नाव बदललं होतं.

ऐश्वर्या यांचं मूळ नाव हे पल्लवी असं आहे. पल्लवी अठले असं त्यांचं लग्नापूर्वीचं नाव होतं.

याच नावाने त्यांना सिनेसृष्टीत लोक ओळखत होते. ऐश्वर्या नारकर यांनी हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

'या सुखांनो या', 'स्वामिनी', 'लेक माझी लाडकी', 'श्रीमंतघरची सून', 'ये प्यार ना होगा कम', 'घर की लक्ष्मी बेटियां' या हिंदी-मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.