मला तुमचा एक रूपयाही नको...; सामंथाने का नाकारली 200 कोटींची पोटगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:02 PM2021-10-03T12:02:08+5:302021-10-03T12:15:11+5:30

घटस्फोटानंतर सामंथाने नागा चैतन्यकडून घेतलेल्या पोटगीच्या रकमेची चर्चा रंगलीये....

साउथचे लोकप्रिय कपल नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि सामंथा रूथ प्रभु (Samantha Prabhu) यांनी अखेर घटस्फोट घेत असल्याचं जाहिर केलंय.

काल शनिवारी सामंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय.

या घटस्फोटानंतर सामंथाने नागा चैतन्यकडून घेतलेल्या पोटगीच्या रकमेची चर्चा रंगलीये. नागा चैतन्यकडून सामंथाने 50 कोटी रूपयांची पोटगी घेतल्याची चर्चा आहे.

काही वृत्तात नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबियांकडून सामंथाला तब्बल 200 कोटी रुपयांची पोटगी ऑफर करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. होय,सामंथाने म्हणे पोटगी घ्यायला नकार दिला आहे. मला नागा चैतन्य वा त्याच्या कुटुंबीयांकडून एक रूपयाही नको, असं तिनं म्हटल्याचं कळतंय.

सामंथा साऊथची मोठी अभिनेत्री आहे. साऊथमध्ये तिच्या नावाचा दबदबा आहे. त्यामुळे पोटगीच्या रकमेची तिला गरज नाहीये, असं म्हटलं जातंय.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं.

जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते.

40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं.

चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.