'कौआ बिर्याणी'मुळे प्रचंड चर्चेत आलेला विजय राज कुठे गायब झालाय? पाहा सध्या काय करतो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 07:00 AM2022-06-17T07:00:00+5:302022-06-17T07:00:10+5:30

Vijay raaz: विजय राज आजही कलाविश्वात सक्रीय असून विनोदी भूमिकांसह त्याने काही आव्हानात्मक, गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत.

अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांची मुख्य भूमिका असलेला रन चित्रपट आठवतो का? हा चित्रपट त्याकाळी बऱ्यापैकी लोकप्रिय झाला होता.

या चित्रपटात या दोन्ही कलाकाराव्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे विजय राज.

या चित्रपटात कौआ बिर्याणी खाऊन हा अभिनेता विशेष चर्चेत आला होता. विनोदाचं उत्तम टायमिंग आणि विजय राजच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे हा सीन चांगलाच गाजला होता.

या चित्रपटानंतर विजय राज अनेक चित्रपटांमध्ये झळकला. मात्र, या रनमधील त्याची भूमिका कोणीही विसरणं शक्य नाही. त्यामुळे सध्या हा अभिनेता काय करतो असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

लोकप्रियता मिळवणाऱ्या या अभिनेत्याचा हा प्रवास सोपा नव्हता. कलाविश्वात येण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.

५ जून १९६३ मध्ये दिल्लीतील एका सर्वसामान्य कुटुंबात विजय राज यांचा जन्म झाला. त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्याला अभिनयाची गोडी लागली.

विजय राज आजही कलाविश्वात सक्रीय असून विनोदी भूमिकांसह त्याने काही आव्हानात्मक, गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत.

विजय राजने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गली बॉय या चित्रपटात तो झळकला होता. तसंच त्याने रमा, अनवर, वेलकम, धमाल, रन, चुरा लिया है तुमने, कंपनी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.