SEE PICS:'लेडी लव्ह' अनुष्का शर्मासाठी विराट आहे बराच पझेसिव्ह, या घटना आहेत त्याचा पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 09:30 AM2017-12-14T09:30:30+5:302017-12-14T15:00:30+5:30
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा रेशीमगाठीत अडकले आहेत. सगळीकडे सध्या त्यांच्या लग्नाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. गेल्या 4 वर्षापासून ...
व राट कोहली आणि अनुष्का शर्मा रेशीमगाठीत अडकले आहेत. सगळीकडे सध्या त्यांच्या लग्नाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. गेल्या 4 वर्षापासून सुरु असलेल्या अफेअरचं आता एका प्रेमळ नात्यात रुपांतर झालं आहे. 2013 साली एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा दोघं एकत्र आले. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एकमेकांना ते डेट करु लागले. सुरुवातीपासूनच विराटचं अनुष्कावर जीवापाड प्रेम होतं. अनुष्काबाबत विराट जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळालं. आपल्या लेडी लव्हसाठी विराटने कशाचीही पर्वा केली नाही. अनुष्काचा अपमान करणा-याचा तर त्याने थेट शिवीगाळ करत पानउतारा करायलाही मागे पुढे पाहिलं नाही. अनेकदा तर अनुष्काच्या प्रेमासाठी त्याने क्रिकेटच्या नियमांचंही उल्लंघन केलं. एक क्षण असा होता की अनुष्काच्या प्रेमात तो इतका बुडाला की त्याने कुणाचाही विचार केला नाही. अनुष्कासाठी त्याने थेट एका पत्रकाराशी पंगा घेतला होता. 2015 क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान सराव करुन विराट ड्रेसिंग रुमकडे जात होता. त्यावेळी त्याची नजर एका पत्रकारावर पडली. विराट त्याच्या जवळ गेला आणि त्याच्यावर भडकला. एका दैनिकात अनुष्का संदर्भात एक वृत्त प्रसिद्ध झालं होते. ते वृत्त त्या पत्रकाराने दिले असा विराटचा समज झाला होता. मात्र सत्य परिस्थिती समजल्यावर विराटने त्या पत्रकाराची माफी मागितली होती. आपल्या लेडी लव्हसाठी विराटने तर क्रिकेटच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले.
आयपीएल-8 मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरु आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यात मॅच सुरु होती. त्यावेळी पावसामुळे मॅच थांबण्यात आली. मॅच थांबल्याने बॅट्समन विराट आणि गेल पॅव्हेलियनकडे परतले. मात्र काही क्षणानंतर विराट लगेचच आपली गर्लफ्रेंड अनुष्कासह व्हीआयपी बॉक्समध्ये दिसून आला.
मॅचचा निर्णय होत नाही तोवर क्रिकेटर खेळण्याची जागा, पॅव्हेलियन सोडून जाऊ शकत नाही.मात्र अनुष्कासाठी विराटने या नियमाचीही पर्वा केली नाही. 2016च्या सुरुवातीला विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या.टी-20 वर्ल्ड कप दरम्यान विराटची कामगिरी चांगली होत होती. मात्र महत्त्वाच्या मॅचला तो साजेशी कामगिरी करु शकला नाही.
त्यामुळे क्रिकेट फॅन्सनी अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे विराट चांगलाच संतापला.त्याने ट्विट करुन सगळ्या प्रकाराचा निषेध केला. शिवाय अनुष्कापासून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळते असं त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं.
आयपीएल-8 मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरु आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यात मॅच सुरु होती. त्यावेळी पावसामुळे मॅच थांबण्यात आली. मॅच थांबल्याने बॅट्समन विराट आणि गेल पॅव्हेलियनकडे परतले. मात्र काही क्षणानंतर विराट लगेचच आपली गर्लफ्रेंड अनुष्कासह व्हीआयपी बॉक्समध्ये दिसून आला.
मॅचचा निर्णय होत नाही तोवर क्रिकेटर खेळण्याची जागा, पॅव्हेलियन सोडून जाऊ शकत नाही.मात्र अनुष्कासाठी विराटने या नियमाचीही पर्वा केली नाही. 2016च्या सुरुवातीला विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या.टी-20 वर्ल्ड कप दरम्यान विराटची कामगिरी चांगली होत होती. मात्र महत्त्वाच्या मॅचला तो साजेशी कामगिरी करु शकला नाही.
त्यामुळे क्रिकेट फॅन्सनी अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे विराट चांगलाच संतापला.त्याने ट्विट करुन सगळ्या प्रकाराचा निषेध केला. शिवाय अनुष्कापासून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळते असं त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं.