राहूल गांधींनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या 'त्या' विधानानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:53 AM2024-02-22T11:53:03+5:302024-02-22T11:54:33+5:30

राहूल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिनेत्री ऐश्वर्या रायला उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. (Rahul Gandhi, Amitabh Bachchan)

After Rahul Gandhi's statement about Aishwarya Rai, Amitabh Bachchan's post | राहूल गांधींनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या 'त्या' विधानानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...

राहूल गांधींनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या 'त्या' विधानानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...

राहूल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान भारतभ्रमंती करत आहेत.  राहूल ठिकठिकाणी जनतेला संबोधित करत आहेत. अशातच राहूल यांनी उत्तर प्रदेशमध्ये असताना ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन यांना उद्देशून एक विधान केलं. ज्याची चांगलीच चर्चा रंगली. राहूल गांधींच्या विधानानंतर अमिताभ यांनी ट्विटरवर एक पोस्ट केलीय जी चर्चेत आहे.

अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट करुन लिहीलंय की, "आता व्यायामाची वेळ झालीय. शरीराची लवचिकता अन् मनाची प्रसन्नता यामुळे मिळते. मग वाट कशाची बघताय." बिग बिंनी या पोस्टमध्ये कोणाचं नाव घेतलं नसलं तरीही अनेकांना ही पोस्ट राहूल गांधींना उद्देशून आहे, असं वाटतंय. 

राहूल गांधी यांनी काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे जनतेला संबोधित करताना भाजपावर टिका केली. राहूल गांधी म्हणाले, "अयोध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपती होते पण त्यात एकही OBC नव्हता. शिवाय टीव्ही चॅनलवाल्यांना ऐश्वर्या रायचं नृत्य दाखवण्यात जास्त रस असतो. पण गोरगरीब जनतेच्या प्रश्नांशी त्यांचं काही देणंघेणं नसतं."

Web Title: After Rahul Gandhi's statement about Aishwarya Rai, Amitabh Bachchan's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.