आंघोळ करतानाच कशा सुचतात अचाट कल्पना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 19:41 IST
आंघोळ करताना आपल्या अशा काही अचाट आणि कल्पना सुचतात की स्वत:लाच विश्वास बसत नाही.
आंघोळ करतानाच कशा सुचतात अचाट कल्पना?
सकाळी सकाळी मस्त पैकी गरम पाण्याने आंघोळ करताना आपल्या अशा काही अचाट आणि कल्पना सुचतात की स्वत:लाच विश्वास बसत नाही. असा अनुभव आपणा सर्वांनाचा आलेला असेल. अशा ‘शॉवर अनुभूती’चे रहस्य आता उलगडले आहे.‘सायन्स आॅफ अस’नुसार आपण जेव्हा एखादा प्राब्लेम सोडवत असतो तेव्हा मेंदू वापरत असलेली विचार प्रणाली आंघोळ करतानाच्या प्रणालीपेक्षा एकदम वेगळी असते. त्यामुळे कधीकधी परीक्षेत प्रश्न सोडवताना न सुचणारे उत्तर आंघोळ करताना अचानक सुचते.संशोधकांनी काही स्वयंसेवकांना शाब्दिक आणि छायाचित्रांची कोडी सोडविण्यास दिली. त्यावेळी असे दिसून आले की, कोड्याचे उत्तर जेव्हा क्षणार्धात सुचते तेव्हा यशस्वीतेचे प्रमाण 94 टक्के एवढे होते. विचार करून करून डोके खर्ची केल्यावर कोड्याचे उत्तर मिळण्याचे प्रमाण केवळ 78 टक्के होते.याचे कारण की, जेव्हा आपण प्रश्नावर हेतूपूर्वक विचार करत असतो तेव्हा आपण जास्तीत जास्ती चुक टाळण्याकडे लक्ष देत असतो. परंतु आंघोळ करताना आपण अभाविपणे विचार करत असतो. त्यामुळे चुक होण्याच्या भीतीऐवजी आपण अचुक उत्तरावर मेंदूचे लक्ष केंद्रित असते.तसेच आंघोळीला आपण एकटेच असल्यामुळे ती वेळ केवळ स्वत:साठी असते. अशावेळी आपला मेंदू अधिक तल्लखपणे काम करत असतो. तर मग येथून पुढे काही सुचत नसेल लगेच आंघोळीला जा. काय सांगता एखादी जग बदलणारी कल्पना तुमच्या डोक्यात येईल.