शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक जाणीव दिवसागणिक कमी होतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 03:46 IST

समाजात पसरलेला भेदभाव आणि असमानता यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन होऊ नये म्हणूनच संयुक्त राष्ट्राने २० फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आणि तेव्हापासून तो या दिवशी साजरा होतही आहे. परंतु मागच्या काही दिवसात देशातील सामाजिक न्यायाची स्थिती बिघडते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. दादरी हत्याकांड, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयू प्रकरण या घटनांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. विविध संस्कृती व परंपरा असतानाही एकोप्याने नांदणाºया भारतात अशा घटना घडताना बघून तरुणाई स्तब्ध झाली आहे. सीएनएक्सने या विषयावर या तरुणाईला बोलते केले असता ती अगदी भरभरून व्यक्त झाली. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागत आहे. हे इतक्या तिव्रतेने पहिल्यांदा घडत आहे. आधी इतकी चिंता करणारी स्थिती नव्हती. आधी समाजातील कमकुवत गटांना मदत करणाºया कामाला तात्त्विक अधिष्ठान देणारे आणि व्यक्तिगत जगण्यात समाजाचा विचार का हवा याविषयी सांगणारे अनेक लोकं भेटायचे. आज मात्र कोणीच यावर बोलताना दिसत नाही. मी माझे घर, माझी जात, या पलीकडे जावून जोपर्यंत विचार केला जाणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार तरी कसे, असा प्रश्न या तरुणाईने उपस्थित केला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावाआपला समाज प्रभावी होण्यास त्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे आवश्यक आहे. हे अंमलात येण्यासाठी आवश्यक असलेले बारकावे हे समाजाला लक्षात आणून देण्यासाठी आज थोर विचारवंतांची गरज भासत आहे. मात्र आजच्या फास्ट लाईफ स्टाईलमुळे आपल्याला त्यांच्या विचारांची गरज असतानाही त्याकडे आपले लक्ष जात नाही. आज जे काही देशात घडत आहे हे बघून त्या थोर विचारवंतांची उणीव भासत आहे. - संवेदनशील मनच उरलेले दिसत नाहीसारेच विचित्र घडत आहे. ज्या विषयामुळे आपला देश प्रगतीपथाकडे जाईल त्या विषयाकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही. सामाजिक बांधिलकीची तर कुणी गोष्टही करताना दिसत नाही. समाजील दुर्बल घटकांप्रती असलेली संवेदनशीलताही कमी होत चालली आहे. काही राजकारणी आपले हित जोपासण्यासाठी समाजातील न्याय व्यावस्थेला खिंडार पाडत आहे. हे दुर्देवी आहे.      - मानवतावाद हा एकच धर्म व्हावा                   मानव ही एकच जात आहे. या सबंध मानवजातीसाठी मानवतावाद हा एकच एक धर्म आहे व त्यामुळे त्याला मानवधर्म असे म्हटले गेले पाहिजे. मानवजातीला या धर्मात स्पष्ट अशी ध्येये मात्र आहेत. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय. आजच्या युगात दया, माया अथवा त्यातूनच येणारा सामाजिक न्याय मिळणे फार कठीण होऊन बसले आहे.- अंजली टेकचंदानीसामाजिक बांधिलकी फक्त फोटोपुरती नको समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक विचारधारा हवी आहे. धर्म हा फार खासगी विषय आहे. त्याचा फटका इतरांना बसू नये. सामाजिक बांधिलकीची भावना फक्त फोटो काढण्यापुरती असू नये. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. म्हणूनच सामाजिक न्यायाची अपेक्षा असणाºया अनेकांना तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकशाही मूल्ये स्वीकारलेल्या राष्ट्रात असे काही घडणे निश्चितच योग्य नाही. -  अभिषेक शर्माजेएनयूत काय सुरू आहे बघ जरा!            देशातील सामाजिक शांततेचे वातावरण बिघडतेय हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल. जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांवर सुडबुध्दीने कारवाई केली जात आहे. त्यावर काही तोडगा अद्याप निघालेला नाही. न्यायासाठी आटापीटा करणाºयांना न्याय मिळत नाही. विनाकारण प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. समाजातील भेदभाव कमी व्हायची चिन्हे नाहीत. काय हाच तो भारत आहे जेथे समाजात शांतता नांदावी यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले? - अविनाश देऊळकरपटीयाला कोर्टातील उदाहरण ताजे न्याय व्यवस्था सांभाळणारी मंडळीच कायदा हातात घ्यायला लागली तर कसे होईल. एखाद्या गोष्टीला विरोध असेल तर तो विरोध दर्शविण्याची एक पद्धत असते. त्यासाठी हिंसक होण्याची गरज नाही. असे हिंसक होताना अनेकदा मूळ विषय बाजूला पडून व्यक्तीगत द्वेष आपल्यावर हावी होत असतो. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असे घडणे योग्य नाही. ? - निहाल गुप्ता

समाजात पसरलेला भेदभाव आणि असमानता यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन होऊ नये म्हणूनच संयुक्त राष्ट्राने २० फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आणि तेव्हापासून तो या दिवशी साजरा होतही आहे. परंतु मागच्या काही दिवसात देशातील सामाजिक न्यायाची स्थिती बिघडते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. दादरी हत्याकांड, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयू प्रकरण या घटनांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. विविध संस्कृती व परंपरा असतानाही एकोप्याने नांदणाºया भारतात अशा घटना घडताना बघून तरुणाई स्तब्ध झाली आहे. सीएनएक्सने या विषयावर या तरुणाईला बोलते केले असता ती अगदी भरभरून व्यक्त झाली. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागत आहे. हे इतक्या तिव्रतेने पहिल्यांदा घडत आहे. आधी इतकी चिंता करणारी स्थिती नव्हती. आधी समाजातील कमकुवत गटांना मदत करणाºया कामाला तात्त्विक अधिष्ठान देणारे आणि व्यक्तिगत जगण्यात समाजाचा विचार का हवा याविषयी सांगणारे अनेक लोकं भेटायचे. आज मात्र कोणीच यावर बोलताना दिसत नाही. मी माझे घर, माझी जात, या पलीकडे जावून जोपर्यंत विचार केला जाणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार तरी कसे, असा प्रश्न या तरुणाईने उपस्थित केला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावाआपला समाज प्रभावी होण्यास त्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे आवश्यक आहे. हे अंमलात येण्यासाठी आवश्यक असलेले बारकावे हे समाजाला लक्षात आणून देण्यासाठी आज थोर विचारवंतांची गरज भासत आहे. मात्र आजच्या फास्ट लाईफ स्टाईलमुळे आपल्याला त्यांच्या विचारांची गरज असतानाही त्याकडे आपले लक्ष जात नाही. आज जे काही देशात घडत आहे हे बघून त्या थोर विचारवंतांची उणीव भासत आहे. - संवेदनशील मनच उरलेले दिसत नाहीसारेच विचित्र घडत आहे. ज्या विषयामुळे आपला देश प्रगतीपथाकडे जाईल त्या विषयाकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही. सामाजिक बांधिलकीची तर कुणी गोष्टही करताना दिसत नाही. समाजील दुर्बल घटकांप्रती असलेली संवेदनशीलताही कमी होत चालली आहे. काही राजकारणी आपले हित जोपासण्यासाठी समाजातील न्याय व्यावस्थेला खिंडार पाडत आहे. हे दुर्देवी आहे.      - मानवतावाद हा एकच धर्म व्हावा                   मानव ही एकच जात आहे. या सबंध मानवजातीसाठी मानवतावाद हा एकच एक धर्म आहे व त्यामुळे त्याला मानवधर्म असे म्हटले गेले पाहिजे. मानवजातीला या धर्मात स्पष्ट अशी ध्येये मात्र आहेत. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय. आजच्या युगात दया, माया अथवा त्यातूनच येणारा सामाजिक न्याय मिळणे फार कठीण होऊन बसले आहे.- अंजली टेकचंदानीसामाजिक बांधिलकी फक्त फोटोपुरती नको समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक विचारधारा हवी आहे. धर्म हा फार खासगी विषय आहे. त्याचा फटका इतरांना बसू नये. सामाजिक बांधिलकीची भावना फक्त फोटो काढण्यापुरती असू नये. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. म्हणूनच सामाजिक न्यायाची अपेक्षा असणाºया अनेकांना तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकशाही मूल्ये स्वीकारलेल्या राष्ट्रात असे काही घडणे निश्चितच योग्य नाही. -  अभिषेक शर्माजेएनयूत काय सुरू आहे बघ जरा!            देशातील सामाजिक शांततेचे वातावरण बिघडतेय हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल. जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांवर सुडबुध्दीने कारवाई केली जात आहे. त्यावर काही तोडगा अद्याप निघालेला नाही. न्यायासाठी आटापीटा करणाºयांना न्याय मिळत नाही. विनाकारण प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. समाजातील भेदभाव कमी व्हायची चिन्हे नाहीत. काय हाच तो भारत आहे जेथे समाजात शांतता नांदावी यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले? - अविनाश देऊळकरपटीयाला कोर्टातील उदाहरण ताजे न्याय व्यवस्था सांभाळणारी मंडळीच कायदा हातात घ्यायला लागली तर कसे होईल. एखाद्या गोष्टीला विरोध असेल तर तो विरोध दर्शविण्याची एक पद्धत असते. त्यासाठी हिंसक होण्याची गरज नाही. असे हिंसक होताना अनेकदा मूळ विषय बाजूला पडून व्यक्तीगत द्वेष आपल्यावर हावी होत असतो. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असे घडणे योग्य नाही. ? - निहाल गुप्ता