शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित असण्यापेक्षा सिंगलच चांगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 17:13 IST

एका मानसशास्त्रज्ञाने दावा केला आहे की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकच जास्त चांगल्या प्रकारे आपले आयुष्य जगतात.

आपल्या समाज व्यवस्थेत अविवाहित असणे किती अवघड आहे हे तर आपण सर्व जण जाणतोच. मग तो पुरुष असो स्त्री, एका ठराविक वयानंतर दोघांवरही लग्न करण्याचा दबाव वाढू लागतो. लग्न केल्यामुळे व्यक्तीचे आयुर्मान वाढते, तो अधिक आनंदी आयुष्य जगतो अशी काहीशी समजुत असते.ती खोडून काढत एका मानसशास्त्रज्ञाने दावा केला आहे की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकच जास्त चांगल्या प्रकारे आपले आयुष्य जगतात.डेन्व्हर येथे संपन्न झालेली ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’च्या वार्षिक परिषदेमध्ये प्रा. बेला डीपाऊलो यांनी हा दावा केला आहे. अविवाहित लोकांवर मागील तीस वर्षांत केलेल्या ८०० पेक्षा जास्त संशोधनांचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. त्या म्हणतात, उपलब्ध निष्कर्षांवरून तरी असे दिसते की, जे लोक अविवाहित राहतात त्यांचे स्वत:बद्दल अवलोकन हे त्यांच्या विवाहित सहाकऱ्यांपेक्षा जास्त चांगले असते. एक व्यक्ती म्हणून त्यांची नियमित वृद्धी आणि शाश्वत विकास होत असतो.त्याबरोबरच सिंगल लोक आपल्या कामाबद्दल अधिक आदर बाळगतात, तसेच ते मोठ्या प्रमाणात स्वावलंबी असल्यामुळे नकारात्मक भावना, विचारांचा त्यांच्या कार्यक्षमतेवर जास्त परिणाम दिसून येत नाही. याउलट विवाहित लोकांची कहाणी आहे. तुम्हाला काय वाटते मग? लग्न करावे की नाही?इंग्लंडचा विचार केला असता तेथे आॅफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी १.६२ कोटी लोक सिंगल तर विवाहितांची संख्या २.३७ कोटी आहे. प्रा. डीपाऊलो सांगतात, लग्न न करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे कारण लोकांना सर्वोत्तम, अर्थपूर्ण आणि मोकळ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. या मानसशास्त्रज्ञदेखील अविवाहितच आहेत.