शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

​SHOCKING : ‘ब्रेक-अप’ होण्याची आहेत ही १० कारणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 15:35 IST

नाते कुठलेही असो त्या नात्याचा शेवट हा प्रत्येकासाठी त्रासदायकच असतो. कंटाळवाणे व निरस वाटू लागले की नात्यात ब्रेक-अप होतो.

-Ravindra Moreनाते कुठलेही असो त्या नात्याचा शेवट हा प्रत्येकासाठी त्रासदायकच असतो. कंटाळवाणे व निरस वाटू लागले की नात्यात ब्रेक-अप होतो. याशिवाय अजूनही बरीच कारणे आहेत ज्यामुळे गोड आणि चांगल्या नात्यात दुरावा निर्माण होतो. मग काय आहेत ती कारणे ज्यामुळे आपण वेगळे होतो.संवादाचा अभाव-एखादे नाते जर सुदृढ असेल तर त्या नात्यात संवाद चांगला आहे हे समजावे, मात्र संवादाचा अभाव असल्यास त्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला लागतो. काही तज्ज्ञांच्या मते, पार्टनर कामामुळे अथवा मित्रमैत्रिणींमुळे दूर राहू लागल्यास व दोघांमध्ये सुसंवाद नसल्यास नाते तुटण्यास वेळ लागत नाही.खोटे बोलणे-पार्टनरचा विश्वास कमी होण्याचे कारण म्हणजे खोटे बोलणे. वारंवार खोटे बोलल्याने आपल्या पार्टनरच्या मनात आपल्या बद्दल आदरही कमी होतो. जेव्हा पार्टनर कामाच्या वेळेबाबत, मेसेजेस, फोन कॉल्स बाबत तुमच्यासोबत खोटे बोलू लागतो तेव्हा त्याच्या तुमच्या नात्यातील गोडवा कमी झाला आहे असे ओळखा. सतत भांडणे-दोघांमध्ये जर सतत भांडत किंवा वादविवाद होत असतील तर समजावे की आपल्या नात्यातील गोडवा कमी झाला आहे. असेच जर नेहमी होत राहिले तर नाते लवकर तुटण्याची दाट शक्यता असते.आदर कमी होणे-भावनिक दृष्ट्या मनाने वेगळे होण्याचे कारण म्हणजे एकमेकांबाबत आदर कमी होणे. आदर नसल्याने एकमेकांवर सहज संशय घेतला जातो त्यामुळे नात्यात दरी निर्माण होते. खूप बंधने लादणे-नाते सजग असायला हवे. पण बºयाचदा अति बंधने लादली जातात, त्यामुळे त्या नात्याचा कंटाळा येतो. जेव्हा जोडीदार तुमच्या बाबत ओव्हर पजेसिव्ह असतो अथवा तुम्हाला सतत बंधनात ठेवतो तेव्हा ते तुमच्या ब्रेक-अपचे एक लक्षण असू शकते.स्वार्थी विचार करणे-आपल्या पार्टनरची काळजी घेतली किंवा त्याचा विचार केल्यास ते नाते अधिक सुदृृढ होते. मात्र जेव्हा तुम्ही फक्त स्वत:चाच विचार करता तेव्हा दुसºयाला तुमच्यापासून दूर जावे असे वाटू लागते.प्रेमासाठी वेळ न देणे-शारीरिक जवळीक असल्यामुळे नाते टिकून राहते यासाठी जोडप्यांनी काही काळ जाणिवपूर्वक एकत्र घालवणे आवश्यक आहे. शारीरिक जवळीक नसणे हे देखील नाते तुटण्यामागचे एक कारण असू शकते. फसवणे-एकमेकांना जर तुम्ही वारंवार फसवत असाल तर ते नाते लवकर संपू शकते. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला फसवता तेव्हा तुम्हाला नाते टिकवायचे नाही असा संकेत मिळतो.छळ करणे-शारीरिक अथवा सेक्शुअल छळ केल्यानेही नाते संपुष्टात येऊ शकते. तर आपला पार्टनर जर आपल्याशी असे वागत असेल तर समजावे की त्यांच्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे. गरज नसणे-तज्ज्ञांच्या मते, दोघांनाही एकमेकांची गरज असावी. जेव्हा जोडीदारांना एकमेंकाची गरज नसल्यासारखे वाटू लागले, तेव्हा तुमचे नाते लवकरच तुटण्याची शक्यता आहे हे समजावे.