शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

20 हजार कोटी रुपयांची राजेशाही समेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 14:03 IST

दोन वर्षांपूर्वी गायकवाड कुटुंबातील दोन चुलत भावांनी दोन दशकांपासून चालत आलेले भांडण संपुष्टात आणले. 

राजेशाही आणि अब्जाधीश कुटुंबातील वाद तशी नवी गोष्ट नाही. अंबानी बंधूंचा वाद तर सर्वश्रुत आहे. संपत्ती आणि वारस हक्कांवरून होणारे मतभेद अनेक वेळा टोकाला जातात आणि पीढी दर पीढी कुटुंबातील सदस्यांचे वैमनस्य वाढत जाते.अशा कुटुंबानी बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याकडून शिकवण घेतली पाहिजे. दोन वर्षांपूर्वी गायकवाड कुटुंबातील दोन चुलत भावांनी सुमारे दोन दशकांपासून चालत आलेले भांडण गुण्यागोविंदाने संपुष्टात आणले.वीस हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर हा वाद सुरू होता. समरजीतसिंह आणि प्रतापसिंह गायकवाड या बंधूनी कुटुंबात शांती आणि पुढच्या पीढीला या वादाची झळ न बसू देण्यासाठी समेट घडवून आणली.नुकतेच एका कार्यक्रमात प्रतापसिंह यांनी कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सांगितले की, ‘प्रत्येक  सदस्याने संपूर्ण कुटुंबाच्या हिताचा विचार करून वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवावेत. आमच्या घराण्याच्या वादाबद्दल सांगायचे तर, एवढी वर्षे वाद लांबल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या दैनंदिन जीवनावर होत होता. रोज सकाळी उठले की त्याच त्याच गोष्टींचे विचार मनात घोळत असल्यामुळे वातावरण नकारात्मक होऊ लागले. शांतपणे विचार करून मग आम्ही यावर कायमचा तोडगा काढण्याचे ठरवले.’