शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

पाक कलावंतांना विरोध नित्याचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:55 IST

 गुलाम अली यांच्या आधीदेखील अनेक कलाकारांना अशा प्रकारच्या विरोधाला सामोरे 

 गुलाम अली यांच्या आधीदेखील अनेक कलाकारांना अशा प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. नुकतीच पाकिस्तानी अभिनेत्री माहिराचा चित्रपट बिन रोए याला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ दिले नाही. आता माहिरा पुढील वर्षी येणार्‍या शाहरुख खानचा चित्रपट रईसमध्ये त्याची अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. आता हे पाहावे लागेल की, रईसबाबत शिवसेना आणि मनसेचा काय पावित्रा राहतो.याआधी पाकिस्तानातूनआलेला कॉमेडियन शकीलला देखील परत जावे लागले आहे. शकीलला तर चित्रीकरणादरम्यानच तीव्र विरोधामुळे सेट सोडावा लागला आणि मुंबईदेखील. कॉमेडी शोमध्ये शकीलशिवाय रऊफ लाला आणि अनेक दुसरे पाकिस्तानी कलाकार आले, मात्र विरोधामुळे त्यांनाही परत जावे लागले. पाकिस्तान येथून आलेली व बिग बॉस अतिथी बनलेली विना मलिक हिलाही भारतातून परतावे लागले, तर मीरालादेखील अशाच विरोधाचा सामना करावा लागला. मीराला महेश भट्ट यांनी हिंदी चित्रपटात आणले होते. तिच्यासोबत नजर चित्रपट बनविल्यानंतर भट्ट तिला पुन्हा घेऊ इच्छित होते मात्र, विरोधामुळे महेश भट्ट यांना आपला विचार बदलवावा लागला. आपल्या कव्वालिसाठी जगभरात नाव कमविलेले नुसरत फतह अली खान यांचे पुत्र राहत अली खान यांच्या गायनास भारताच्या संगीतप्रेमींनी खूप पसंत केले, मात्र येथे होणार्‍या विरोधामुळे त्यांचे येणेही जवळजवळ बंद झाले आहे. राहत फतह अली खान सध्या दुबईत जाऊन बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी गाण्यांचे रेकॉर्डिंग करीत असता. पाकिस्तानचे आणखी एक गायक अतिफ असलम यांनादेखील विरोधामुळे भारतात येण्याचा विचार बदलावा लागला. पाकिस्तानातून आलेल्या सर्व कलाकांरासोबत असेच असे झाले आहे. अली जाफर सलग बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करीत आहे आणि त्याच्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीही अडचण आली नाही. खूबसूरत चित्रपटात सोनम कपूरचा नायक बनलेल्या फवाहद खानला देखील अशा समस्येचा सामना करावा लागलेला नाही. तो अजूनही बॉलिवूडच्या तीन चित्रपटांमध्ये काम करीत आहे.आणखी एक पाकिस्तानी कलाकार इमरान अब्बास विक्रम भट्टचा चित्रपट क्रिचरमध्ये दिसला होता. सध्या तो करण जाैहरचा नवीन चित्रपट ए दिल है मुश्किल मध्ये काम करीत आहे.नुकताच सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये भर दे झोली. गाणारे अदनान सामी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहेत आणि त्यांना कोणतीच अडचण आली नाही. गझल गायक गुलाम अली यांचा मुंबई येथे होणारा गझल गायनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे अखेर रद्द झाला आहे. परंतु असे पहिल्यांदाच झालेले नाही. गुलाम अली यांचा हा चौथा कार्यक्रम आहे, ज्याला शिवसेनाच्या विरोधामुळे रद्द करण्यात आले. पाकिस्तानकडून भारतात दहशतवाद पसरविला जात असल्यामुळे शिवसेना अनेक वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना येथे चित्रपट आणि टीवी शोमध्ये काम करण्यास विरोध करीत आली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील अशा प्रकारच्या विरोधासाठी अनेकदा पुढाकार घेतला आहे.