शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

​बेंगलोरमध्ये रंगणार ‘काव्य महोत्सव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 22:48 IST

बेंगलोरात पुढील महिन्यात प्रथमच ‘काव्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

काविता व्यक्तीच्या मनातील भावना व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरू नये. कारण काव्याची तरलता आपल्या भावनाविश्वाला साजेशी असते. सध्या मात्र कवितेला बुद्धीवादी किंवा अभिरुची संपन्न वर्गाच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देशभक्तांच्या नसांमध्ये भरणारी ही कविता आता मात्र केवळ पाठ्यपुस्तकांच्या पानांपुरती मर्यादित झाली आहे.काव्याविषयी जनसामान्यांत रुची उत्पन्न व्हावी यासाठी बेंगलोरात पुढील महिन्यात प्रथमच ‘काव्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक आणि नव्या कवींना जावेद अख्तर, पियुश मिश्रांसारख्या नावाजलेल्या कवींसोबत आपली कविता सादर करण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. सहा ते सात आॅगस्ट दरम्यान लीला पॅलेस येथे हा काव्य महोत्सव रंगणार आहे.महोत्सवाचे आयोजक, सुबोध शंकर यांनी सांगितले की, कविता ही स्वत:ला व्यक्त करण्याचे सक्षम माध्यम आहे. पण अनेक साहित्य संमेलनांमध्ये कवितेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. एखाद-दोन कार्यक्रम वगळता अशा संमेलनांमध्ये कवितेला विशेष स्थान नसते. परंतु आपल्या देशातील अनेक क वी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडत असताना संपूर्णपणे कवितेला वाहिलेला महोत्सव आयोजित करण्याची आम्हाला गरज वाटली.बेंगलोर शहरातील विविध काव्य ग्रुप्सच्या सहकार्याने हा महोत्सव साकरत आहे. यामध्ये काव्य वाचन, काव्यशास्त्र, काव्यअभिरुची, संगीत प्रधान कविता आणि काव्य प्रकाशन अशा विविध विषयांवर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.