शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

​नवरात्र- स्त्री शक्तीचा जागर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:10 IST

एकंदरीत नवरात्रीचे महत्त्व म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर चित्रपटातही दाखविण्यात आला आहे.

नवरात्रीच्या उत्सवात सर्वत्र गरबा आणि दांडियाची धमाल असते. संपूर्ण देशात लोक पारंपरिक वेशभूषेत या विशेष नृत्य शैलीचा मनसोक्त आनंद घेतात. विशेषत: बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्येही नवरात्रीच्या धुनवर बरीच गाणे चित्रित केले आहेत. ३७ वर्षापूर्वीचा चित्रपट ‘सुहाग’ मध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘माता शेरेवाली....’ हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे. एकंदरीत नवरात्रीचे महत्त्व म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर चित्रपटातही दाखविण्यात आला आहे. भारतातील काही विद्वानांनीही म्हटले होते की, कोणत्याही देशाची किंवा समाजाची किंवा देशाची प्रगती मोजायची असेल, तर प्रथम त्या देशातील किंवा समाजातील स्त्रियांची प्रगती मोजावी लागेल. म्हणजेच स्त्रियांची जर प्रगती झाली तरच देशाची किंवा समाजाची प्रगती होते. गेले सतरा वर्ष नौकरीच्या निमित्ताने ग्रामीण- शहरी,  शिक्षित-अशिक्षित अशा समाजातील विविध स्तरातील महिलांच्या प्रगतीचा अनुभव मी घेत आहे. स्त्रीयांच्या प्रगतीसाठी महत्वाचा घटक म्हणजे स्त्रीशिक्षण. क्रांतिज्योती सावित्रीबाई नी लावलेले हे स्त्रीशिक्षणाचे बीज समाजात वाटवृक्षासारखे बहरले व स्त्रियांच्या प्रगतीला गती प्राप्त झाली. या सोबतच सरकारने वेळोवेळी राबविलेले महिला धोरण, सबलीकरण कार्यक्रम,  विविध योजना व कायद्याचीही महत्वाची भूमिका आहे. परिणाम स्वरूप आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे, ज्याचा प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे.याचा अर्थ स्त्रियांच्या समस्या संपल्या असं आपण म्हणू शकणार नाही. अजूनही स्त्रियांपुढे काही गंभीर समस्या आहेतच. पण शिक्षण या जादूच्या कांडीने सोडविली जाणार नाही अशी एकही समस्या नाही. पण त्यासोबतच आवश्यक आहे स्त्रीकडे बघण्याचा समाजातील लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची. विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष हे समाजरूपी पक्षाचे दोन पंख आहेत आणि हे दोनही पंख जोपर्यंत सारख्या क्षमतेचे असणार नाही तोपर्यंत समाजरूपी पक्षी भरारी घेऊ शकणार नाही.  त्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने मला एकच सांगावस वाटत की स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिचा सन्मान, आणि हा सन्मान जर प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिला गेला तर तिचे मानवी हक्क तिला अनुभवता येईल अशी समाजव्यवस्था निर्माण होईल आणि हाच खरा स्रीशक्तीचा जागर असेल.                                                                                                                                                                           -सारिका डफरे                                                                                                                                                                          शिक्षणाधिकारी                                                                                                                                                       द. ठे. राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड                                                                                                                                                              श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार                                                                                                                                                                    प्रादेशिक संचलनालाय, नाशिक