शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

लहान मुलांसोबत प्रेमाने वागा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 19:56 IST

मुलांना प्रामणीक बोलण्याची सवय लावणे आवश्यक आहे

 लहान मुले मातीच्या चिकलासारखे असतात. त्यांच्यावर जसे संस्कार केले जातात, तसे ते घडतात.. शाळेत जायला लागल्यानंतर ते जास्त वेळ घराबाहेर राहतात. व वेगवेगळ्या मुलांसोबत त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे ते चांगल्या व वाईट या दोन्हीही गोष्टी शिकत असतात. खोटे बोलणेही ते यामधून शिकतात. खासकरुन लहान मुले हे शिक्षा होईल, या भितीपोटी खोटे बोलतात. त्याकरिता त्यांना लहानपणापासूनच त्यांना सर्व गोष्टीबद्दल बोलण्याचे स्वातंत्र देणे आवश्यक आहे.  प्रत्येक गोष्ट ही वाईट व चांगली कशी आहे, हे समजून सांगावे.  त्यामुळे मुले हे तुमची प्रत्येक गोष्ट ऐकायला लागतील. ३ ते ७ वर्ष वयोगटातील मुले हे थोड्याफार प्रमाणात खोटे बोलतात.आई वडिल व शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना आपण एखादे वचन दिले तर ते नक्की निभावणे आवश्यक आहे. आपण त्यांच्यावर विश्वास करतो असे त्यांना वाटणे आवश्यक आहे. त्यामुळे ते वाईट गोष्टीकडे वळणार नाहीत किंवा कोणतीही गोष्टी आपल्याला सांगण्याचा संकोच बाळगणार नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते तुमची परवानगी घेतील. व नेहमी प्रामाणीकपणे  बोलतील. मुलांचे सर्वात पहिले गुरु हे आईवडिल असतात. ते जर खोटे बोलत असेल तर मुलांनाही त्यांचीच सवय लागते. आपण मुलांसमोर रोल मॉडल आहोत, हे आईवडिलांनी कधीही विसरु नये. एखाद्या परिस्थितीत खोटे बोलावे लागले तर त्यांना यामागचे कारण सांगावे. मुलांच्या प्रामाणीक बोलण्याचे व कामाचे कौतुक करावे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. काळानुसार आईवडिलांनी आपल्या मानसीकतेत बदल करणे आवश्यक आहे. पूर्वीसारखे मुलांना मारण्याचे दिवस राहिले नसून, उलट प्रेमाने त्यांना समजावून सांगावे.