शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

​ आर्चीची पहिल्याच दिवशी शाळेला दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:07 IST

१५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. उन्हाळी सुटी संपून आर्चीची शाळाही सुरू झाली.

१५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. उन्हाळी सुटी संपून आर्चीची शाळाही सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी ‘सैराट’ फेम आर्चीच्या स्वागातसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र रिंकू शाळेत उपस्थित राहणार नसल्याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व मनसुबे फोल ठरले.‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरू शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे तिच्या वर्ग मित्र-मैत्रिणींसोबतच संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. रिंकूने यंदा इयत्ता दहावीत प्रवेश केला आहे. रिंकू राजगुरु ‘सैराट’ चित्रपटामुळे रिंकूच्या आयुष्याला स्टारडमचे वलय निर्माण झाले असल्यामुळे तिला सध्या सुरूवातीसारखे अगदी सहज कुठेही फिरता येत नाही. ती जिथे जाते तिथे ‘सैराट’ चाहते एकच गर्दी करतात. शाळेच्या पहिल्या दिवशी देखील अगदी तसेच वातावरण पाहायला मिळाले. रिंकू शाळेतील प्रत्येक विद्यार्थी ती येण्याची वाट पाहत होता. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी रिंकूने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेले नव्हते. इयत्ता नववीत तिने ८१ टक्के गुण मिळवले. पण ‘सैराट’ला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर रिंकू स्टार झाली असल्याने तिच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल घडून आलेले पाहायला मिळत आहेत. वाचा: ‘सैराट’ पाहिल्यानंतर वरुण धवन आणि करण जोहर काय म्हणाले? रिंकू शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहणार नसल्याची कल्पना नव्हती. तिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. एक खास सरप्राईज देखील ठेवले होते. पण आमची निराशा झाली. तरीसुद्धा आम्ही इतक्यात तिचे सरप्राईज उघड करणार नाही. ती जेव्हा शाळेत येईल तेव्हा तिचे आम्ही छान स्वागत करु, असे रिंकूची वर्गमैत्रिण वैशाली कुंभार हिने सांगितले.