शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

​ आर्चीची पहिल्याच दिवशी शाळेला दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:07 IST

१५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. उन्हाळी सुटी संपून आर्चीची शाळाही सुरू झाली.

१५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. उन्हाळी सुटी संपून आर्चीची शाळाही सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी ‘सैराट’ फेम आर्चीच्या स्वागातसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र रिंकू शाळेत उपस्थित राहणार नसल्याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व मनसुबे फोल ठरले.‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरू शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे तिच्या वर्ग मित्र-मैत्रिणींसोबतच संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. रिंकूने यंदा इयत्ता दहावीत प्रवेश केला आहे. रिंकू राजगुरु ‘सैराट’ चित्रपटामुळे रिंकूच्या आयुष्याला स्टारडमचे वलय निर्माण झाले असल्यामुळे तिला सध्या सुरूवातीसारखे अगदी सहज कुठेही फिरता येत नाही. ती जिथे जाते तिथे ‘सैराट’ चाहते एकच गर्दी करतात. शाळेच्या पहिल्या दिवशी देखील अगदी तसेच वातावरण पाहायला मिळाले. रिंकू शाळेतील प्रत्येक विद्यार्थी ती येण्याची वाट पाहत होता. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी रिंकूने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेले नव्हते. इयत्ता नववीत तिने ८१ टक्के गुण मिळवले. पण ‘सैराट’ला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर रिंकू स्टार झाली असल्याने तिच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल घडून आलेले पाहायला मिळत आहेत. वाचा: ‘सैराट’ पाहिल्यानंतर वरुण धवन आणि करण जोहर काय म्हणाले? रिंकू शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहणार नसल्याची कल्पना नव्हती. तिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. एक खास सरप्राईज देखील ठेवले होते. पण आमची निराशा झाली. तरीसुद्धा आम्ही इतक्यात तिचे सरप्राईज उघड करणार नाही. ती जेव्हा शाळेत येईल तेव्हा तिचे आम्ही छान स्वागत करु, असे रिंकूची वर्गमैत्रिण वैशाली कुंभार हिने सांगितले.