शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

​दिव्यांनी सजवा दिवाळी...!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 16:34 IST

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव होय. दिवाळीतील प्रकाश दिव्यांशिवाय अपूर्णच आहे. झगमगणारे दिवे आपल्या घराला उत्सवाचे रुप देत असतात. या दिवाळीला जर आपण काही नवीन करु इच्छित असाल आणि आपणास काही सुचत नसेल तर दिव्यांचा वापर करुन काहीतरी क्रिएटिव्हीटी दाखवू शकता

-Ravindra Moreदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव होय. दिवाळीतील प्रकाश दिव्यांशिवाय अपूर्णच आहे. झगमगणारे दिवे आपल्या घराला उत्सवाचे रुप देत असतात. या दिवाळीला जर आपण काही नवीन करु इच्छित असाल आणि आपणास काही सुचत नसेल तर दिव्यांचा वापर करुन काहीतरी क्रिएटिव्हीटी दाखवू शकता. प्रत्येकवर्षी घरात एकसारखे दिवे लावून आपण आणि पाहणारेदेखील कंटाळतात. यासाठी यावर्षी दिवाळीला नवीन प्रकारच्या दिव्यांचा प्रयोग कसा करावा याबाबत जाणून घेऊया...सर्वप्रथम बाजारातून मातीचे दिवे खरेदी करुन त्यांना रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यातील मातीमध्ये पाणी झिरपते आणि अतिरिक्त रंगदेखील पाण्यात निघून जातो. यानंतर दिवा तेल जिरवू शकणार नाही. पुढील दिवशी दिव्यांना बाहेर काढून कापडाने स्वच्छ करा आणि त्यानंतर दिव्यांवर पेंट किंवा मनासारखी डिझाईन काढा. दिव्यांना रंगविण्याअगोदर पांढरा रंग किंवा प्रायमरचा वापर करा, जेणेकरुन केलेले रंगकाम उठावदार दिसेल. प्रायमर कोरडे झाल्यानंतर मनासारख्या रंगाने दिव्यावर पेंट करु शकता. यासाठी लाल, मरून, पिवळा, हिरवा, नारंगी आणि निळ्या रंगाचा वापर करा, ज्याने आपला दिवा ट्रॅडिशनल दिसेल. रंग कोरडा झाल्यानंतर ब्रशने त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाने आवडेल ती डिझाईन काढू शकता. अशाने आपल्या दिव्यांना एथनिक लूकदेखील मिळेल. जर आपण मेहंदी लावण्यात एक्स्पर्ट असाल तर आपले हे कौशल्य दिव्यांना सजविण्यासाठी देखील वापरा. सिरॅमिक कोनमध्ये रंग भरून दिव्यांवर बारिक डिझाईन बनवा. फूल, पाने, मोर यांची चित्रे बनवून या दिव्यांवर लावले जाऊ शकतात. फक्त डिझाईन व्यतिरिक्त जर आपण दिव्यांना अजून वेगळा लूक देऊ इच्छित असाल, तर मोती, कुंदन व काच यांचा वापर करुन अधिक आकर्षक बनवू शकता. रांगोळी तसेच रंगीबेरंगी मोती, कुंकू, तांदूळ आणि कागदाचे फूल वापरुन देखील दिव्यांना सजवू शकता. सकारात्मक उर्जेचे प्रतिक दिवाहिंदू धर्मात दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व असून, दिवाळीत सर्वत्र प्रकाशमय वातावरण असते. या विशेष दिवशी नकारात्मकतेला दूर करण्यासाठी आणि सकारात्मक उर्जेच्या स्वागतासाठी दिवे लावले जातात. यासाठीच दिवाळीला दीपोत्सवदेखील म्हटले जाते.    दिवाळीचे हे पावित्र्य जपण्यासाठी आपण बनविलेला दिवा शास्त्रशुद्ध पद्धतीने पेटविल्यास आपली दिवाळी अधिकच सुखकर ठरेल. यासाठी दिवाळीच्या दिवशी दिवा पेटविण्यासाठी शुद्ध तूप किंवा जवसाच्या तेलाचा वापर करा. तसेच दिव्यात किमान चार वाती असाव्यात, एक वात लक्ष्मी, दुसरी गणेश, तिसरी कुबेर आणि चौथी इंद्र देवासाठी. शुद्ध तुपाचे किमान पाच दिवे तरी असावेत. एक दिवा किचनमध्ये, दुसरा बेडरुममध्ये, तिसरा लिव्हिंग रुममध्ये, चौथा वॉशरुम आणि पाचवा घरातील अन्य खोलीत लावावा.