शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केस गळतीऐवजी कॅन्सरच्या पेशंट्सचे केस झाले काळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 19:17 IST

कसा झाला हा चमत्कार? पेशंट आनंदात, तर डॉक्टर उत्तराच्या शोधात..

- मयूर पठाडेकॅन्सर पेशंटचा मुख्य प्रॉब्लेम काय असतो? एकतर आधीच ते दुर्धर आजारानं त्रस्त असतात, शिवाय त्यांच्या डोक्यावरचे सारे केस उडून जातात. डॉक्टरांंचं तर म्हणणं आहे की, प्रत्यक्ष आजारापेक्षा बरेच रुग्ण त्यांच्या उडालेल्या केसांनीच अधिक खचतात आणि आपलं आता काही खरं नाही, आता आपले थोडेच दिवस राहिलेत अशा मानसिकतेत ते जातात.केमोथेरपीनंतर सगळ्यांचेच केस जातात, पण संशोधकांना नुकताच एक आश्चर्यजनक प्रकार पाहायला मिळाला. केमोथेरपीनंतर एका पेशंटच्या डोक्यावरील केस जाणं तर सोडा, उलट त्या पेशंटच्या डोक्यावरील पांढरे केस काळे झाले!ही अपवादात्मक घटना असेल असं अगोदर शास्त्रज्ञांना वाटलं होतं, पण त्यांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केला, शोध घेतला तर त्यांना आढळून आलं, असे तब्बल १४ पेशंट आहेत, ज्यांच्या डोक्यावरचे केस केमोथेरपीनंतर जाण्याऐवजी उलट त्यांच्या केसांचा रंग बदलला. म्हणजे ज्यांचे केस पांढरे, करडे होते त्यापैकी काहींचे ब्राऊन झाले, तर काहींचे काळे!कसं काय झालं असं?हा काय चमत्कार आहे?संशोधकांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, कॅन्सरवर मात करण्यासाठी या साऱ्या रुग्णांवर नव्या प्रकारच्या थेरपीने उपचार करण्यात येत होते. त्याच थेरपीचा परिणाम म्हणून या साऱ्यांचे केस काळे झाले!यातील अनेकांनी पांढऱ्या केसांचे आपले जुने आणि काळ्या केसांचे नवे फोटो आनंदानं शेअरही केले.

पण त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नव्या पद्धतीने उपचार घेणाऱ्या साऱ्याच रुग्णांचे केस काळे झाले नाहीत. तरीही हे प्रमाण बऱ्यापैकी होतं. कॅन्सरच्या एकूण ४२ रुग्णांवर ही थेरपी वापरण्यात आली, त्यापैकी १४ जणांचे केस काळे झाले.आता ते नेमके कशामुळे झाले, केवळ त्यांचेच का झाले, इतरांचे का झाले नाही, या कारणानं शास्त्रज्ञ डोकं खाजवताहेत.त्यातलं आणखी एक गौडबंगाल म्हणजे हेच औषध याच आजारावर म्हणजे कॅन्सरवर वापरलं जात होतं, तेव्हा केमोथेरपीनंतर पेशंट्सचे केस गळत होते. मग आता असं काय झालं, की या रुग्णांना केसगळतीऐवजी काळ्या केसांचा उपहार मिळाला!

(फोटो सौजन्य- असोसिएटेड प्रेस)शास्त्रज्ञ त्याबद्दल अजूनही आपलं डोकं खाजवताहेत, पण त्याबद्दल त्यांचा अंदाज असा आहे, ज्या रुग्णांचे केस काळे झाले, ते सारे रुग्ण फुफ्फुसाच्या कॅँन्सरचे होते. इतर पेशंटही कॅन्सरनेच त्रस्त होते, पण त्यांचा कॅन्सर वेगळ्या प्रकारचा होता. आणि ही जी नवी थेरपी या रुग्णांवर वापरली गेली, त्यात असे काही घटक असावेत, की केसांतले मुळ रंगद्रव्य पुन्हा निर्माण करीत असावेत..या साऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यात सध्या ते गुंतले आहेत, पण ज्या रुग्णांचे केस गळण्याऐवजी उलट काळे झाले, ते रुग्ण मात्र आनंदात आहेत. या किमयेमुळे ते पहिल्यापेक्षा अधिक तजेलदार आणि तरुणही दिसायला लागले आहेत...