शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 1:31 PM

त्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे.पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे.

 

- अमृता कदम

देवभूमी उत्तराखंडला तीर्थक्षेत्रं आणि निसर्गसौंदर्य या दोन्ही गोष्टींमुळे कायमच पर्यटकांची गर्दी असते. पण उत्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर इथल्या लहरी निसर्गामुळे पर्यटनाच्या आनंदापेक्षा आपत्तीला तोंड द्यावं लागू शकतं. विशेषत: पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाकडून इथल्या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीसंदर्भात काही विशेष सूचना जाहीर केल्या जात नाहीत. आणि प्रत्यक्ष उत्तराखंडला जाऊन आलेल्या लोकांचे अनुभव आपण गांभीर्याने घेतोच असं नाही.

जास्त जोराचा पाऊस झाला तर नैनितालहून बाहेर पडण्याचे महत्त्वाचे मार्ग बंद होतात. नैनिताल-कलदुंगी आणि नैनिताल बायपास पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. प्रचंड वेगानं कोसळणारे धबधबे आणि उतारावरु न कोसळणाऱ्या दरडींमुळे या मार्गांवर अडथळे निर्माण होतात. उत्तराखंडची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून असल्यानं आणि चार वर्षांपूर्वी केदारनाथ प्रलयानंतर अधिकारी आणि रेस्क्यू टीम ही कायमच दक्ष असली , स्वत: मुख्यमंत्री पर्यटनस्थळांच्या सुरक्षेसंदर्भाचा आढावा घेत असले तरी पावसाळ्यात उत्तराखंडमधल्या काही ठिकाणांना भेटी देणं टाळणंच इष्ट!

चोप्टा

निसर्गसौंदर्य आणि हिमालयाचं होणारं दर्शन यांमुळे पर्यटक चोप्टाला आवर्जून भेट देतात. मात्र चोप्टाला जाणारा मार्ग हा उकीमठवरून जातो आणि पावसाळ्यामध्ये इथे भूस्खलनाचा धोका असतो.

 

वान व्हिलेज

समुद्रसपाटीपासून 8000 फूट उंचीवर वसलेलं हे छोटंसं गाव चामोली जिल्ह्यामध्ये आहे. ट्रेकिंगसाठी उत्तराखंडमध्ये येणाऱ्या ट्रेकर्ससाठी हा एक महत्त्वाचा बेस कॅम्प आहे. इथे आलीचं कुरण, रूपकुंडचा गोठलेला तलाव, बेदनीचं कुरण, होमकुंडचा ट्रेक अशी आकर्षणं आहेत. मात्र भूस्खलन, रस्ते खचणं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पावसाळ्यात वानला भेट देण्याचा धोका न पत्करलेलाच चांगला.

 

कॉर्बेट धबधबा

गेल्या काही वर्षांपासून कॉर्बेट धबधबा उत्तराखंडमधलं महत्त्वाचं पर्यटनस्थळं म्हणून विकसित होत आहे. हा धबधबा कॉर्बेट नॅशनल पार्कच्या अगदी जवळ आहे. हे पार्क मान्सूनमध्ये बंद राहते. पण पर्यटक धबधब्याला आवर्जून भेट देतात. धुवाँधार पावसामुळे पाण्याची पातळी धोकादायक पद्धतीनं वाढत असल्यानं इथले स्थानिक मान्सूनमध्ये या धबधब्याला भेट न देण्याचाच सल्ला देतात.

द्रोणागिरी ट्रेक

यावर्षीच्या सुरूवातीलाच उत्तराखंड पर्यटन विभागानं द्रोणागिरी ट्रेकला ‘ट्रेक आॅफ द इयर’ म्हणून घोषित केलं आहे. गढवाल रांगांमध्ये वसलेला हा द्रोणागिरी पर्वत साहसाची, थ्रीलिंग अनुभवाची हौस असलेल्यांना नेहमीच खुणावतो. समुद्रसपाटीपासून या ठिकाणाची उंची 22000 फूट इतकी आहे. पण तुम्ही कितीही साहसी असला तरी द्रोणगिरीला जाण्यापूर्वी तुमच्या साहसाला आवर घाला. कारण भूस्खलन आणि पर्वतरांगातून अत्यंत वेगानं वाहणाऱ्या छोट्या-छोट्या नद्यांनी हा ट्रेक अतिशय धोकादायक ठरु शकतो.

 

धरचुला

हे गाव भारत-नेपाळ बॉर्डरला अगदी लागून आहे. पिठोरागढ जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांसाठी जणू नंदनवनच आहे. पण मान्सूनमध्ये इथे भेट देणं हे जाणूनबुजून धोका पत्करण्यासारखं आहे. कारण पावसाळ्यात पिठोरागढ राष्ट्रीय महामार्ग वारंवार बंद होतो. शिवाय वाहनांवर मातीचे ढिगारे किंवा कड्यांचे अवशेष कोसळ्याचीही शक्यता असते.

 

पावसाळ्यात साहस टाळाच!

 

पावसाळ्यात हटके डेस्टिनेशन निवडून ट्रीप प्लॅन करण्याचा कल आजकाल वाढत आहे. विशेषत: तरूणाईला साहसाला आव्हान देणाऱ्या ठिकाणांना भेट देण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. मात्र आपल्या आनंदाबरोबरच स्वत:ची सुरक्षितताही महत्त्वाची असते हे लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणूनच पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करताना कुठे जायचं हे नक्की करण्याबरोबरच कुठे जायचं नाही हे ठरवणंही अत्यंत आवश्यक आहे. या मान्सूनला तुम्ही वेगळ्या ठिकाणी जायचं म्हणून उत्तराखंडची निवड करत असाल तर आधी इथल्या ठिकाणांची, भौगोलिक परिस्थितीची आणि हवामानाची माहिती घेऊनच ठिकाणं निश्चित करा.