शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

घोषणा जोरदार, पण वास्तवातही उतराव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 08:09 IST

रेल्वे प्रवास सुखकर व्हावा एवढेच मत तरुणाईने व्यक्त केले. 

- रेल्वे अर्थसंकल्पावर तरुणाईच्या प्रतिक्रिया फेब्रुवारी महिना हा देशाच्या आगामी वर्षभराचा धावता आढावा घेणारा असतो. देशाचा निरंतर विकास व्हावा यासाठी तरतूद करण्याचा कोणता प्रयत्न सरकारच्या वतीने सुरू आहे हे सांगण्याचे काम बजेटच्या माध्यमातून केले जाते. देशाचा विकास कशा पद्धतीने होईल हे स्पष्ट करणारा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्याची झलक रेल्वे अर्थसंकल्पातून पहावयास मिळते.कोट्यवधी प्रवाशांना व वस्तूंना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचविणारी रेल्वे भारतीय दळणवळणाचा कणा आहे. रेल्वे हे देशातील दळणवळणाचे व प्रवासी वाहतुकीचे सर्वांत मोठे माध्यम असल्याने त्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करून विकासात्मक भूमिका स्पष्ट केली जाते. 2016-17 या वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केला. या रेल्वे अर्थसंकल्पात दोन गोष्टी प्रकर्षाने जाणविल्या त्या म्हणजे कोणत्याही नव्या गाड्या त्यांनी सुरू करण्याची व प्रवासी व मालवाहतूक भाड्यात वाढ करण्याची घोषणा केली नाही. दुसरी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा प्रवाशांना देण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे सांगितले. काही गाड्यांची घोषणा त्यांनी केली मात्र त्या गाड्या कधी सुरू होतील याबाबत कोणतेच सुतोचाव केले नाही.सरकारने रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर विरोधकांना या अर्थसंकल्पात नाविण्य नसल्याचा आरोप केला आहे. सीएनएक्सने रेल्वे अर्थसंकल्पाविषयी तरुणांची मते जाणून घेतली. यावेळी रेल्वे प्रवास सुखकर व्हावा एवढेच मत तरुणाईने व्यक्त केले. टीअर टू व थ्री शहरांसाठी काहीच नाहीदेशातील पाच-सहा मोठी शहरे सोडली तर बहुतेक शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे हाच सर्वांत चांगला पर्याय आहे. यामुळेच टीअर टू व टीअर थ्री शहरांपासून मेट्रो शहरांपर्यंतच्या प्रवासासाठी नव्या गाड्या हव्या होत्या. ज्या गाड्या जाहीर करण्यात आल्या त्या केवळ 300 ते 500 कि लोमीटर अंतरावर प्रवास करणाºयांसाठी फायदेशीर आहेत. नागपूरसारख्या शहरांचा यात विचारच केला नाही.  - अश्विन अमृते रेल्वे भाड्यात सवलत हवी होतीरेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्या सोयी मिळतच आहे. रेल्वे स्थानकावर वाय-फाय सेवा देण्याची घोषणा थोडी विचित्र वाटते. आज स्मार्टफोन वापरणारे डाटा पॅकसाठी खर्च करतात. आजकाल सर्वच ठिकाणी मोबाईलची चांगली रेंज असते. अशावेळी फ्री-वाय फाय सेवा देणे म्हणजे नुसतीच भूलथाप म्हणता येईल. यापेक्षा थोडी सवलत रेल्वे भाड्यात द्यायला हवी होती.  - महेश मेंघरे सुरक्षेची हमी नाहीच प्रवाशांना सुरक्षा व चांगल्या सेवा देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजवाणी कशी होईल याबाबत शंका आहे. रेल्वेतून प्रवाशांच्या वस्तूंची व मालवाहतूक करताना जीन्नसांची चोरी रोखण्यासाठी सुरक्षा यत्रंणेत सुधारणा करण्यावर भर द्यायला हवा होता.  - शुभांगी वाघ प्रवाशांना सुविधा मिळेलया रेल्वे अर्थसंकल्पात विशेष असे काही दिसत नसले तरी देखील मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. गरिबांसाठी नव्या गाड्या सुरू करण्यात येणार आहे. गाड्यांमध्ये मोबाईल चार्जर, वातानुकुलित तृतिय श्रेणीचे डबे सोयीचे ठरतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रवाशी भाडे वाढले नाही. रेल्वेने चांगल्या सुविधा द्याव्यात यासाठी हा बजेट तयार करण्यात आला हे स्पष्ट दिसते. - दीक्षा वासनिक