शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

​...आणि ती फक्त मैत्री असते !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 18:07 IST

‘मैत्रीला काही गंध नसतो, मैत्रीला फक्त छंद असतो,

-रवींद्र मोरे ‘मैत्रीला काही गंध नसतो,  मैत्रीला फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी, त्यातच जीवनाचा खरा आनंद असतो...!’खरा मित्र आपण जी गोष्ट सांगतोय ती ऐकूण घेईल, ती समजून घेईल, दु:ख असताना आपल्याला वेळ देईल, गरज असल्यावर लगेच धावत येईल, प्रत्येक गोष्टीत सहकार्य करेल. फक्त फ्रेंडशिप  बेल्ट बांधणे म्हणजे मैत्री नव्हे. मित्र हे केवळ बाहेरचेच नसून रक्ताच्या नात्यातदेखील खरे मित्र असू शकतात. त्यात आई, वडील, बहिण, भाऊ, आजी, आजोबा हे देखील चांगली आणि खरी मैत्री निभवू शकतात. मग खरा मित्र कोण व कसा असावा आणि तो कसा ओळखावा, याबाबत आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसानिमित्त ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा...आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे प्रत्येक वर्षी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. आपल्या समोर प्रशंसा आणि पाठीमागे निंदा करणारा कधीही खरा मित्र असू शकत नाही. खरा मित्र तोच, जो आपल्याला गरजेच्या वेळी मदत करतो, आपल्या चांगल्याचा विचार करेल. असा ओळखा खरा मित्रचांगल्या गोष्टींवर लक्ष देतोखरा मित्र आपल्यातील चांगल्या गुणांवर लक्ष देतो. तो कधीही आपली दुसºयांसमोर निंदा करीत नाही, तर नेहमी आपल्या गुणांंची प्रशंसा करतो.खोटं बोलत नाहीखरा मित्र आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही आणि नाटकही क रीत नाही. आपण त्याच्या समोर हसू शकता, रडू शकता, तसेच वेगवेगळे हावभाव करू शकता. एवढे करुनही त्याच्याकडून आपण प्रत्येकवेळी मिळवाल फक्त प्रेम आणि स्रेह. दयावानखरा मित्र आपल्या संक टाच्या वेळी नेहमी आपल्या सोबत असतो. तो कधीही संकट प्रसंगी आपला सहवास सोडून जात नाही. चुक झाली तरी क्षमा असतेखरा मित्र आपल्या चुकांना समजू शकतो. त्यांना कधीही मोठा इश्यू करीत नाही, तर तो त्या चुका सहज क्षमा करतो. मात्र ही चुक पुन्हा नव्हे, अशा मैत्रीपूर्ण भावात समजूतही देतो. म्हणणे ऐकूण आणि समजून घेतोखरा मित्र आपल्या समस्यांना लक्षपूर्वक ऐकतो, समजूनही घेतो आणि योग्य तो सल्ला देतो. तो मध्येच टोकत नाही. धनाचा लोभ नसतो खºया मैत्रीत पैसे किंवा धनाचा विषयच नसतो. त्याची नजर कधीही आपल्याजवळ असलेल्या धनसंपत्तीवर नसते. तो गरजेच्या वेळी स्वत:जवळचे पैसे खर्च करून मदत करण्यास तयार असतो. प्रोत्साहन देतो तो जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी आपणास पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल. आपल्या सुप्त गुणांना चालना देऊन आपले ध्येय गाठण्यासाठी आपणास समर्थन देईल. ईर्षा ठेवणार नाहीआपल्याला मिळालेल्या यशाबाबत कधीही ईर्षा ठेवणार नाही, तर आपल्या सुखात सहभागी होईल. त्याचे वागणे प्रत्येक दिवसासारखे सामान्य असेल. वाईट मित्र कसा ओळखाल नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्याच्या आयुष्यात खरा मित्र असतो तो इतरांपेक्षा काही वर्ष जास्त जीवन जगतो. कारण तो येणाºया प्रत्येक संकटावर सहज मात करतो. मग आपण चांगला आणि वाईट यातील फरक जाणता का? खºया मैत्रीमुळे आपले जीवन सुखकर होते तर दुसरीकडे वाईट मित्रांमुळे आयुष्यात समस्या उद्भवतात. तर खालील काही बाबींद्वारे आपण वाईट मित्र ओळखू शकता.वरचढ आणि बॉसगिरी करणाराजो नेहमी आपल्यावर वरचढ आणि बॉसगिरी करतो तो कधीच आपला खरा मित्र नसतो. याप्रकारचा मित्र, मित्र नसून तो हुकूमशहाच असतो. म्हणून अशांशी चुकूनही कधी मैत्री करू नये. अपमानीत करणारा आपला मित्र जर सर्वांसमोर आपली कमजोर बाजूचे प्रदर्शन करु न खिल्ली उडवितो आणि चांगल्या गोष्टींपासून लांब राहण्यास वारंवार सांगत असेल अशा मित्रांशी कु ठलेही नाते आपल्यासाठी घातक ठरेल. अशा मित्रांना त्वरीत आपल्या यादीतून आऊट करा. स्वार्थी मित्रांपासून लांब रहाकाही मित्र फक्त गरज असते तेव्हाच आठवण करतात आणि आपल्याशी नाते ठेवतात. असे स्वार्थी मित्र आपले मन वळविण्यात हुशार असतात. त्यांच्या जवळ अनेक कारणेही असतात. अशा लोकांपासून चार हात लांब राहणेच कधीही योग्य. ईर्षा करणारे काही मित्रांना आपणास मिळालेल्या यशाबाबत ईर्षा होत असते. त्यांना कधीही आपली प्रगती सहन होत नाही. असे लोक खूपच घातक असतात. ते कधीही आपणास इजा पोहचू शकतात. म्हणून अशा मित्रांपासून नेहमी सतर्क रहा अन्यथा त्याच्याशी मैत्री ठेऊच नका. शेवटी एकच सांगावेसे वाटते की, ‘ सुखाच्या प्रसंगी हात धरणे म्हणजे मैैत्री नव्हे... तर दु:खाच्या काळात हात न सोडणे म्हणजे खरी मैत्री !!!’