शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडीलांच्या भांडणांचा मुलांवर दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 22:30 IST

कोणत्या ना कोणत्या कारणावरून आई -वडील भांडत असतील तर मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.  

मुलांच्या विकासासाठी घरात शांतता आणि संस्कारमय वातावरण असले पाहिजे. पण, जर कोणत्या ना कोणत्या कारणावरून आई -वडील भांडत असतील तर मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.  मुले जेव्हा आई-वडीलांना भांडतांना पाहतात तेव्हा ते त्यांना पाहूनच भांडण करायला शिकतात. मुलांना त्यांचे निरागस भावविश्व या आई वडीलांच्या भांडणांमुळे गमवावे लागते. यामध्ये आई-वडीलांनीही त्यांच्या मनाचा विचार करायला हवा.त्यांच्यासमोर कधीही भांडण केले नाही पाहिजे. तुमच्यात काही वाद असतील तर चार भिंतींच्या आतच ती मिटवायला हवी. याचा दुरगामी परिणाम असाही आहे की, ते खुप कमी वयात स्वत:ला सावरतात आणि त्यांचे निरागस बालमन हरवून बसतात. त्यांच्या मानसिक तेवरही परिणाम होतो.आई-वडीलांची भांडणे पाहून मुले नैराश्यात जाण्याची शक्यता असते. नेहमी त्यांना कशाची तरी भीती ही वाटतच असते. कधी आई-वडील भांडतील आणि आपल्याला मारतील असे काहीही विचार त्यांच्या मनात येतात. घरात जर नेहमी चिंतेचे, भांडणाचे वातावरण असेल तर लहान मुलेही मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊ न जातात.त्यांनाही आपण काय करावे हे कळत नाही. कधीकधी त्यांना असेही वाटते की, आपण आपल्या आईवडीलांना जड झालो आहोत म्हणून ते आपल्याला अशी वागणूक देतात. आई-वडीलांच्या भांडणाचे कारण ते स्व:लाच समजतात. कोणत्याच व्यक्तीवर त्यांचा विश्वास उरत नाही. प्रत्येक  व्यक्ती त्याला वाईट आणि भांडणाराच वाटू लागतो.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते चिडचिडे होतात. त्यांना वाटते की, परिस्थिती आपल्या हातात नाही. ते परिस्थितीसमोर हतबल होतात आणि इप्सित साध्य प्राप्त न करू शकल्याने रागीट होतात.