शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

परदेशी वृक्षलागवडीमुळे बिघडला पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 15:35 IST

नितीन भगवान पन्हाळा : कोल्हापूर जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या पन्हाळ्यात गेल्या पाच वर्षांपासून येथील उन्हाळा असह्य झाला आहे. ...

ठळक मुद्देपरदेशी वृक्षलागवडीमुळे बिघडला पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल पर्यावरणतज्ज्ञांनी केला दावा

नितीन भगवान

पन्हाळा : कोल्हापूर जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या पन्हाळ्यात गेल्या पाच वर्षांपासून येथील उन्हाळा असह्य झाला आहे. चालू वर्षी ३८ ते ३९ तापमान गेल्याने पन्हाळा थंड हवेचे ठिकाण राहिला नसल्याचे जाणवू लागले आहे. पर्यावरणतज्ज्ञांनी या तापमान वाढीचा अभ्यास केल्यानंतर गेल्या २० वर्षांत ग्लिरिसिडीया किंवा गिरिपुष्प या वृक्षलागवडीमुळे पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळेच येथील तापमानात वाढ होते आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

पन्हाळा शहर समुद्र सपाटीपासून ३,१२७ फूट उंचीवरचे ठिकाण आहे. याला ऐतिहासिक महत्त्व पूर्वीपासून असल्याने याच्या सभोवतालची जागा रिकामी राहिली आहे. या सभोवतालच्या जागेत पारंपरिक वृक्ष होते. मधल्या काही काळात ही वृक्षसंपदा नष्ट झाली. याठिकाणी नव्याने पारंपरिक झाडे न लावता वनविभागाने मोठ्या प्रमाणात गिरिपुष्प झाडांची लागवड केली.

ही झाडे दिसायला हिरवीगार आणि त्यांची वाढ झपाट्याने होऊ लागली. डोळ्याला हिरवीगार झाडी दिसू लागली; पण याचे घातक परिणाम हळूहळू जाणवू लागले. या झाडांच्या जंगलात प्राणी, पक्षी, माणूस कोणीही जात नाही. या झाडांपासून मोठ्या प्रमाणात विषारी वायू उत्सर्जित होऊ लागला. याच्या पानगळीमुळे जमिनी नापीक होऊ लागल्या. या सर्व कारणाने पर्यावरणाचा समतोल बिघडला आणि पन्हाळा शहराचा तीनही ऋतूंचा समतोल बिघडला आहे. यापूर्वी सरासरी २००० मि.मी. पडणारा पाऊस ३००० पेक्षा जादा पडू लागला, तोही अनियमित. थंडीचे प्रमाण कमी झाले, तर फेब्रुवारीपासूनच उन्हाळा जाणवू लागला तो जून अखेरपर्यंत.

याला एकमेव कारण पारंपरिक वृक्षसंपदा हटवून परदेशी ग्लिरिसिडीया ही झाडे लावल्याने झाले आहे, असे पर्यावरण तज्ज्ञांनी मत मांडले आहे. या झाडांचा बिमोड करून नव्याने पारंपरिक झाडे लावणे गरजेचे असले, तरी शासनाची ती मानसिकता दिसुन येत नाही. त्यामुळे पन्हाळ्याचा उन्हाळा दिवसेंदिवस असह्य होणार असल्याने पन्हाळा थंड हवेचे ठिकाण हे नाव कदाचित पुसले जाणार आहे

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डाॅ. मधुकर बाचुळकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, ग्लोबल वाॅर्मिंगचे परिणाम सर्वत्रच जाणवत असले, तरी आपल्याला इतक्या तापमानाची सवय नसल्याने वाढते तापमान घातक स्वरूपाचे आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी वन विभागाने जी परदेशी झाडे लावलीत, ती आता मोठी झाल्याने त्यांचा 'बाश्पोश्वास' आपल्याला घातक ठरतोय. त्यांनी परदेशी झाडे शेकडो एकर लावली आहेत.

यात गिरिपुष्प झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली. या वृक्षाचे परिणाम घातक झाले आहेत. या झांडामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. या झाडांचा बिमोड करून लगेच वाढणारी कदंब, बहावा यासारख्या झाडांची लागवड केली, तर पर्यावरणाच्या समतोलाबरोबरच वन्य प्राणी, पक्षी यांचीसुद्धा संख्या वाढेल आणि येणारे पावसाळे, उन्हाळे व थंडी सुसह्य होईल.

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर