शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

World Biodiversity Day : ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या घटना नियंत्रणात येण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:49 IST

ज्ञानगंगा अभयारण्यात लॉकडाउनमुळे उन्हाळ््यात लागणाºया आगींच्या संख्येत घट झाली असून त्यामुळे या जंगलाचे दरवर्षी होणारे मोठे नुकसान टळले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरासह जवळपास चार तालुक्यांसाठी आॅक्सीजन पार्कची भूमिका निभावणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्यात लॉकडाउनमुळे उन्हाळ््यात लागणाºया आगींच्या संख्येत घट झाली असून त्यामुळे या जंगलाचे दरवर्षी होणारे मोठे नुकसान टळले आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील ही वनसंपदा एक प्रकारे रॉ नेजर अर्थात अनडिस्टप फॉरेस्ट म्हणून गणल्या गेल्याने येथे जैविविधतेची भरमार दिसून येत. लॉकडाउनमुळे या अभयारण्यातून जाणारा बुलडाणा-खामगाव मार्गावरील जड वाहतूकही जवळपास बंद झाल्याने जंगलातील वन्य प्राणी हे रस्त्यावरही आता दिवसा बिनदिक्कतपणे फिरत आहे. हा मोठा बदल गेल्या दोन महिन्यात जाणवत आहे. त्यामुळे टीपेश्वरमधून ज्ञानगंगामध्ये आलेल्या टी-वन सी-वनला येथे स्थिरावण्यास मदत मिळाली आहे. हे येथील समृद्ध अन्न साखळीचे द्योतकच मानावे लागेल. जंगलातील वर्दळ कमी झाल्यामुळे उन्हाळ््यातील आगींच्याही घटनांमध्ये घट झाली आहे. प्रादेशिक वनविभागाने तर यंदा आग लागण्याच्या कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी टास्क फोर्स तयरा केला आहे. ज्ञानगंगामध्ये उन्हाळ््यात बहावा, पळस, मोह, मुरड शेंग, बेहडा, कवच बीच यासह आयुर्वेदात उल्लेख असलेल्या अन्य औषधी वनस्पतींची भरमार फुलपाखरांचेही येथे जवळपास २८ पेक्षा अधिक प्रकार आढळून येतात. ग्रास येलो, ड्रॅगन प्लाय, पॅन्सी अशी फुलपाखरे व किटक आहेत.‘रॉ’ नेचरमुळे जैवविविधता समृद्धरॉ नेचर आणि औद्योगिकी करणामुळे जंगलामध्ये होणार हस्तक्षेप बुलडाणा जिल्ह्यात अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथे समृद्ध जैवविविधता आहे. भौतिक दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या बुलडाणा जिल्हा हा डी प्लस मध्ये असला तरी समृद्ध जैविविधतेच बुलडाणा जिल्ह्याचा वरचा क्रमांक आहे.बुलडाणा जिल्ह्यात अंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार पक्षी अभयारण्य असे तीन अभयारण्य आहेत. अंबाबरवामध्ये दोन वाघ असून यवतमाळातील टीपेश्वरमधील टी-वन सी-वन ज्ञानगंगात वास्तव्याला आहे. तर लोणार सरोवर हे राज्यातील छोट्या पक्षी अभयारण्यापैकी एक आहे. त्यामुळे येथे जैवविविधतेची भरमार आहे. लॉकडाउनमुळे ज्ञानंगगासह अंबाबरवा अभयारण्यात वन्य प्राण्यांची अन्न साखळी विकसीत होण्यास मदत झाली आहे.

वन समृद्धीसाठी उपयुक्तउन्हाळ््यात प्रादेशिक व वन्यजीव अंतर्गत येणाºया जंगलामध्ये दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी आगी लागल्यामुळे वनसंवर्धनास मदत होत असून प्रामुख्याने पवण्या गवत, घाणेरी, चोरबोर, गुंजाचा पाला या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला नाही. वनसमृद्धीसह जैविविधता निर्मितीसाठी ही बाब दिलासादायक म्हणावी लागले. त्यामुळे प्राण्यांनाही त्याचा लाभ झाल्याचे एकंदरीत चित्र आहे.ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाºया रस्त्यावरील जड वाहतूक बंद झाल्याचा प्राण्यांच्या व जंगलाच्या समृद्धीसाठी फायदा होत असले तर बोथा रस्ता कायमस्वरुपी उंद्रीकडून वळविल्यास जैविविधता समृद्ध होण्यास मदत होवून आग लागणे व अन्य गैरप्रकार टळतील.-प्रा. अलोक शेवडे, जिल्हा जैवविविधता समिती सदस्य किटक अभ्यासक, बुलडाणा

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य