शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे कसे; जमेल तिथे बांधली घरटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:50 IST

अस्तित्वासाठी स्वीकारला ‘ॲडाप्टेशन’चा नियम

- निशांत वानखेडेनागपूर :  लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये  ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना आई अंगणात वावरणाऱ्या चिऊताईला सहज दाखवायची. परंतु, आज ही चिऊताई दिसेनासी झाली आहे. माणसांमध्ये न भिता, बिनधास्त वावरणारी चिऊताई अचानक माणसांना सोडून कुठे फुर्र झाली आहे, असे वाटते ना. पण नाही, ती कुठे गेली नाही, फक्त बस्तान बदलवले आहे. माणसांनी निर्माण केलेल्या परिस्थितीवर मात करत ती पण जगायला शिकली आहे. शास्त्रीय भाषेत चिमण्यांनी ‘ॲडाप्टेशन’ स्वीकारले आहे. तज्ज्ञांच्या मते चिमण्यांनी नवा अधिवास स्वीकारला आहे. चिमणी हा जगभरात सर्वाधिक आवडणारा पक्षी आहे. तसा ताे भारतातही सर्वश्रूत आहे. ॲडाप्टेशन म्हणजे असलेल्या परिस्थितीत स्वत:मध्ये शारीरिक व बाह्य बदल करून जगणे हाेय. माणसांप्रमाणे चिमण्यांनीही ताे नियम स्वीकारल्याचे तज्ज्ञांनी अभ्यासातून मांडले आहे. आधीपासून माणसांमध्ये राहणे, हासुद्धा त्याचाच प्रकार आहे. कृत्रिम घरटी, प्लास्टिक पाईप्सपक्षी अभ्यासक डाॅ. आशिष टिपले यांच्या मते इतर प्राण्यांप्रमाणे चिमण्यांनीही स्वत:ला ॲडाप्ट केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात विद्याभारती काॅलेजतर्फे १०० घरटी सेलू शहरात वितरित केली व ती व्यापणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास केला. यामध्ये चिमण्यांनी सर्वाधिक अधिवास जमविला, पिल्ले जन्माला घातली. याशिवाय घराच्या परसबागेत, झाडांवरही त्यांनी बस्तान बसविले आहे. एवढेच नाही तर घरातील अडगळीची जागा किंवा प्लास्टिकच्या पाईपमध्येही चिमण्यांचे बस्तान दिसून येते. डाॅ. आशिष टिपले यांनी स्वत:च्या घरी ‘बर्ड फिडर’ लावले आहे. त्यात धान्य टाकलेले असते. पक्ष्यांना धान्य टिपण्याची व्यवस्था असते. येथील धान्य टिपण्यासाठी चिमण्यांची दिवसभर गर्दी राहत असल्याचे त्यांनी सांगितले.गाव, शहराच्या वेशीवरमहाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी महत्त्वाचे निरीक्षण नाेंदविले आहे. चिमण्या एका वर्षात तीन ते चार वेळा अंडी देतात. मिलन काळात मातीत अंघोळ करतात. घरटी करण्यासाठी गवत व नैसर्गिक साहित्य जर असेल तर ‘अंड्यां’चे नैसर्गिकरीत्या तापमान नियमन होते. शहरात माती, गवत, काडीकचरा मिळत नसल्याने त्यांनी शहराच्या वेशीवर बस्तान मांडले आहे.पक्षीप्रेमी डाॅ. पिंपळापुरे यांच्या मते चिमण्यांच्या संवर्धनासाठी शास्त्रीय अभ्यास आवश्यक आहे.चिमण्यांची गणना हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या काेणत्या भागात, किती प्रमाणात दिसतात, त्यांची घरटी कुठेकुठे आहेत, याचा अंदाज घेता येईल.