शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे कसे; जमेल तिथे बांधली घरटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:50 IST

अस्तित्वासाठी स्वीकारला ‘ॲडाप्टेशन’चा नियम

- निशांत वानखेडेनागपूर :  लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये  ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना आई अंगणात वावरणाऱ्या चिऊताईला सहज दाखवायची. परंतु, आज ही चिऊताई दिसेनासी झाली आहे. माणसांमध्ये न भिता, बिनधास्त वावरणारी चिऊताई अचानक माणसांना सोडून कुठे फुर्र झाली आहे, असे वाटते ना. पण नाही, ती कुठे गेली नाही, फक्त बस्तान बदलवले आहे. माणसांनी निर्माण केलेल्या परिस्थितीवर मात करत ती पण जगायला शिकली आहे. शास्त्रीय भाषेत चिमण्यांनी ‘ॲडाप्टेशन’ स्वीकारले आहे. तज्ज्ञांच्या मते चिमण्यांनी नवा अधिवास स्वीकारला आहे. चिमणी हा जगभरात सर्वाधिक आवडणारा पक्षी आहे. तसा ताे भारतातही सर्वश्रूत आहे. ॲडाप्टेशन म्हणजे असलेल्या परिस्थितीत स्वत:मध्ये शारीरिक व बाह्य बदल करून जगणे हाेय. माणसांप्रमाणे चिमण्यांनीही ताे नियम स्वीकारल्याचे तज्ज्ञांनी अभ्यासातून मांडले आहे. आधीपासून माणसांमध्ये राहणे, हासुद्धा त्याचाच प्रकार आहे. कृत्रिम घरटी, प्लास्टिक पाईप्सपक्षी अभ्यासक डाॅ. आशिष टिपले यांच्या मते इतर प्राण्यांप्रमाणे चिमण्यांनीही स्वत:ला ॲडाप्ट केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात विद्याभारती काॅलेजतर्फे १०० घरटी सेलू शहरात वितरित केली व ती व्यापणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास केला. यामध्ये चिमण्यांनी सर्वाधिक अधिवास जमविला, पिल्ले जन्माला घातली. याशिवाय घराच्या परसबागेत, झाडांवरही त्यांनी बस्तान बसविले आहे. एवढेच नाही तर घरातील अडगळीची जागा किंवा प्लास्टिकच्या पाईपमध्येही चिमण्यांचे बस्तान दिसून येते. डाॅ. आशिष टिपले यांनी स्वत:च्या घरी ‘बर्ड फिडर’ लावले आहे. त्यात धान्य टाकलेले असते. पक्ष्यांना धान्य टिपण्याची व्यवस्था असते. येथील धान्य टिपण्यासाठी चिमण्यांची दिवसभर गर्दी राहत असल्याचे त्यांनी सांगितले.गाव, शहराच्या वेशीवरमहाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी महत्त्वाचे निरीक्षण नाेंदविले आहे. चिमण्या एका वर्षात तीन ते चार वेळा अंडी देतात. मिलन काळात मातीत अंघोळ करतात. घरटी करण्यासाठी गवत व नैसर्गिक साहित्य जर असेल तर ‘अंड्यां’चे नैसर्गिकरीत्या तापमान नियमन होते. शहरात माती, गवत, काडीकचरा मिळत नसल्याने त्यांनी शहराच्या वेशीवर बस्तान मांडले आहे.पक्षीप्रेमी डाॅ. पिंपळापुरे यांच्या मते चिमण्यांच्या संवर्धनासाठी शास्त्रीय अभ्यास आवश्यक आहे.चिमण्यांची गणना हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या काेणत्या भागात, किती प्रमाणात दिसतात, त्यांची घरटी कुठेकुठे आहेत, याचा अंदाज घेता येईल.