शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

‘इनब्रिडिंग’मुळे वाघांची नवी पिढी कमकुवत होण्याचा धोका; संशोधकांच्या रिपोर्टमध्ये निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 06:03 IST

संशोधन : संचार मार्ग खंडित झाल्याचा परिणाम, ‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॅल्युशन’ या आंतरराष्ट्रीय जैवविज्ञान पत्रिकेत प्रकाशित एका शोधप्रबंधाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देभारतीय संशोधकांसह इतर देशांतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष त्यात मांडले आहेत.केवळ वाघच नव्हे, तर इतरही वन्यप्राण्यांचे संचार मार्ग खंडित झाल्याने हा धोका निर्माण झाला आहेवाघांच्या अधिवासात मानवाची लाेकसंख्या ५७ टक्क्यांनी वाढली.

निशांत वानखेडेनागपूर : भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही जगात गौरवाची बाब ठरली आहे. मात्र, आता एक नवीच समस्या निर्माण होत आहे. समूहातील प्रजननाची (इनब्रिडिंग) शक्यता बळावल्याने वाघांची नवी पिढी कमकुवत, आजारग्रस्त होण्याची तसेच अनुवंशिक वैविधता संपण्याची आणि कालांतराने वाघांची एक प्रजातीच नाहीशी होण्याची भीती वाढली आहे. भारतासह काही देशांतील संशोधकांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.

‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॅल्युशन’ या आंतरराष्ट्रीय जैवविज्ञान पत्रिकेत प्रकाशित एका शोधप्रबंधाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनुभब खान, समीर फळके, अनुप चुगानी, अरुण झकारिया, उदयन बोरठाकूर, अनुराधा रेड्डी, यादवेंद्र झाला, उमा रामक्रिष्णन या भारतीय संशोधकांसह इतर देशांतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष त्यात मांडले आहेत. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी या शोधप्रबंधावर प्रकाश टाकला.

पाटील यांच्या मते, केवळ वाघच नव्हे, तर इतरही वन्यप्राण्यांचे संचार मार्ग खंडित झाल्याने हा धोका निर्माण झाला आहे. दहा वर्षांत देशातील वाघांची संख्या १४०० वरून २९०० च्यावर गेली. मात्र, वाघांच्या अधिवासात मानवाची लाेकसंख्या ५७ टक्क्यांनी वाढली. जंगलातून महामार्ग, रेल्वेमार्ग काढणे यामुळे वाघांचे एका जंगलातून दुसरीकडे जाणारे भ्रमणमार्गही खंडित झाले आहेत.

माणसांमध्ये एका कुळात सहसा लग्न हाेत नाही, त्याचप्रमाणे प्राण्यांचेही हाेऊ नये. वाघांचे इनब्रिडिंग झाले तर जेनेटिक डिफेक्ट येण्याची शक्यता असते. काही बछड्यांना मेंटल डिफेक्ट, बहिरेपणा, आंधळेपणा, पाठीच्या कण्यामध्ये डिफेक्टची शक्यता असते. - डाॅ. हेमंत जैन, व्हेटरनरी सर्जन

काय हाेतात दुष्परिणाम

  • आपल्याच कुळातील वाघांच्या मिलनातून जन्माला आलेल्या बछड्यांचे मागचे पाय अर्धांगवायू झाल्याप्रमाणे कमजाेर असणे. शेपटी गळून पडणे.
  • कमजाेर ब्रिड तयार झाल्याने शिकारीच्या मूळ स्वभावावर परिणाम हाेण्याची शक्यता.
  • कालांतराने सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजाती नाहीशा हाेण्याचीही शक्यता. 
टॅग्स :Tigerवाघ