शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Ganesh Festival 2019 : मूर्ती विसर्जन पर्यायी कुंडांमध्येच करायला हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 09:52 IST

सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक नको अशी प्रबोधन चळवळ हळूहळू रुजते आहे.

उदय गायकवाड

कोल्हापूर - गणपतीची आराधना करताना पंचमहाभुतांची पूजा आपण करतोच. मात्र, त्याच महाभुतांना आपण प्रदूषित करतो आणि स्वत: वर संकट ओढवून घेतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्सवाच्या निमित्ताने पाण्याचे, हवेचे, आवाजाचे, प्रकाशाचे, जमिनीचे प्रदूषण होते. ही बाब आता आपल्या लक्षात आली आहे. शाडूची लहान मूर्ती वनस्पतीजन्य रंगात रंगवून पूजेसाठी वापरणारा आणि त्याचे घरच्या घरी विसर्जन करणारा मोठा वर्ग कोल्हापूरमध्ये तयार झाला आहे. ३० वर्षे प्रबोधनाची सुरू असलेली चळवळ घट्ट रुजली आहे.

१९८८ पासून निर्माल्य व मूर्ती विसर्जन जलस्रोतांमध्ये न करता ते पर्यायी कुंडांमध्ये करण्याची मानसिकता नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्याचे कोल्हापूरमध्ये दिसून येते. चाळीस लाखांच्या जिल्ह्यात गेल्या वर्षी चार लाख ६७ हजार मूर्ती जलस्रोतांमध्ये विसर्जित न होता पर्यायी व्यवस्थेमध्ये विसर्जित झाल्या, ही खूप मोठी बाब आहे. कोल्हापूरमध्ये मिरवणुकीत गुलाल किंवा रंग वापरला जात नाही. घरगुती पातळीवर काही प्रमाणात फटाके फोडले गेले तरी ते प्रमाण नगण्य आहे. पारंपरिक वाद्य वापरण्याकडे बहुतेक मंडळे गेली आणि त्यांनी आता डॉल्बीला नकार दिला आहे. प्रकाशझोताचा खर्च पाहता काही मंडळे वगळता इतरांनी पाठ फिरवली आहे.

चळवळ रुजतेय

सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक नको अशी प्रबोधन चळवळ हळूहळू रुजते आहे. नैसर्गिक पाने-फुले, कापड, कागद यांचा वापर करून केलेली सजावट आकर्षक ठरते हे लोकांना पटले आहे.

सृजनशील आविष्कार प्रदर्शित करायला ही उत्तम संधी मानणारा एक युवा वर्ग प्रयत्न करीत आहे. खरे तर ही एक व्यावसायिक संधी म्हणून पाहायला हरकत नाही.

प्लास्टिक नाकारा!

ज्या बाबी आता समजल्या आहेत त्यापेक्षा नव्याने काही मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे. प्रसाद, महाप्रसादाच्या निमित्ताने प्लास्टिक प्लेट, ग्लास, वाट्या, द्रोण नाकारून धातूचे किंवा वनस्पतींचे साहित्य वापरले पाहिजे.

खाद्यपदार्थ बनवताना आणि विकत घेताना त्यामध्ये रंग हा वनस्पतीजन्य असावा याकडेही लक्ष दिले पाहिजे. या सर्व मुद्यांकडे लक्ष देऊन जल, जमीन, हवा, प्रकाश, अन्न, अग्नी अशा महाभुतांना प्रदूषित न करता साजरा केलेला उत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक असेल.

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेशोत्सव