शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्लॅस्टिक विल्हेवाटीची परिणामकारक पद्धती; जाणून घ्या, नक्की फायदा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:54 IST

9400 टन प्लॅस्टिक हे कुठेही टाकले जात असल्याने दररोज माती, नाले आणि भूजल स्त्रोत प्रदूषित होतात.

जगभरात काही टनांमध्ये प्लॅस्टिकचा वापर होत आहे आणि त्या वापरलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट पर्यावरणास अनुकूल नसलेल्या मार्गाने करण्यात येत असल्याचा समज आहे. एका अभ्यासानुसार भारतात वर्षाला 9.4 दशलक्ष टन प्लॅस्टिकचा वापर केला जातो. यापैकी जवळपास 5.6 दशलक्ष टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाते. तर उरलेले 3.8 दशलक्ष टन प्लॅस्टिक इतरत्र फेकले जाते. याचाच अर्थ 9400 टन प्लॅस्टिक हे कुठेही टाकले जात असल्याने दररोज माती, नाले आणि भूजल स्त्रोत प्रदूषित होतात.

प्लॅस्टिकची विल्हेवाट लावून त्याचा पुनर्वापर करणे हाच एक योग्य पर्याय आहे आणि भारतात याला मोठा वाव आहे. भारतात सध्याच्या घडीला 33 हजार पुनर्प्रक्रिया प्रकल्प आहेत. उद्योग वाढल्यामुळे रोजगाराच्या बर्‍याच संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच पुनर्प्रक्रिया उद्योगामध्ये सध्या 40 लाख लोक काम करत आहेत. त्यांचा उद्देश हा पुनर्वापरासाठी प्लॅस्टिक गोळा करणे हाच आहे. त्यामुळे पर्यावरणाला मदत करण्याशिवाय नोकरीच्या लाखो संधी निर्माण होऊ शकणार आहेत. पण प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याची कल्पना अद्याप देशवासियांमध्ये रुजलेली नाही. सद्य: स्थिती अशी आहे की सर्व कचरा एकाच वेळी गोळा केला जातो. सर्व प्रकारच्या कचर्‍यासाठी एकच पिशवी वापरली जाते. जेव्हा हा कचरा गोळा केला जातो तेव्हा तेथे कोणतेही विभाजन केले जात नाही. तसाच हा कचरा जमिनीवर टाकला जातो. यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. जमिनीमध्ये मिसळलेला कचरा विषारी पदार्थ मातीमध्ये टाकतो यामुळे तिच्या सुपिकतेवर परिणाम होत आहे. 

या समस्येच्या निराकरणासाठी आम्हाला कचरा व्यवस्थापनाची एक कार्यक्षम आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. परंतु जेव्हा आपण आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सवय बदलू तेव्हाच हे शक्य होईल. याची सुरूवात आधी आपल्याच घरापासून करायला हवी. कारण घरे हीच सर्वाधिक प्लॅस्टिक कचरा निर्माण करतात. 

पहिली पायरी म्हणजे कचर्‍याचे स्त्रोत विभाजन करणे, हा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या विभाजनामुळे कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे विभाजन होईल आणि प्रमाणही कमी होईल. विल्हेवाट लावण्यापूर्वी, प्लॅस्टिक कचरा प्रथम स्वच्छ करून वेगळ्या डब्यात ठेवावा. हा कचरा नंतर स्थानिक कचरा गोळा करणारे किंवा घरकाम करणार्‍या कर्मचार्‍यांद्वारे पुनर्वापरासाठी पाठवावा. अशा प्रकारे कचरा विल्हेवाट लावण्याची पद्धतशीर प्रक्रिया निर्माण होईल.यामुळे केवळ कचरा व्यवस्थापन सोपे होते एवढेच नाही तर पर्यावरणाला अनुकूलही ठरते. कचराभूमीवर कमी कचरा गेल्याने आपसूकच प्रदूषणही कमी होते. शिवाय पुनर्वापर प्रक्रियेचे फायदेही आहेत. ते परवडणारे तर आहेच पण, कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइडची निर्मितीही रोखते. तसेच जीवाश्म इंधनाचा वापरही कमी करते. 

पर्यावरणास अनुकूल अशी कचरा विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया स्थापित करणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी बिसलेरी कंपनीने 'बॉटल्स फॉर चेंज' ही मोहिम सुरू केली आहे. नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्लास्टिक कचर्‍याचा पुनर्वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून नजीकच्या कबाड्याशी संपर्क साधता येणार आहे. यानंतर तो येऊन प्लॅस्टिक कचरा गोळा करणार आहे. 

हा उचललेला कचरा कंपनीने नियुक्त केलेल्या संस्थेकडे जमा केला जाणार आहे. यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येईल. हा उपक्रम दिल्ली, चेन्नई आणि बेंगळुरुसारख्या शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कंपन्या नावनोंदणी करू शकणार आहेत. या द्वारे आम्ही सुलभ कचरा पुनर्वापर प्रक्रियाचा नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहोत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीenvironmentपर्यावरण